शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

महिलांना प्राधान्य द्यायलाच पाहिजे

By admin | Updated: September 20, 2015 01:11 IST

औरंगाबाद : ‘कोणत्याही मंगलकार्याची तयारी ही महिलाच करतात. तरीसुद्धा त्यांना आपण योग्य तो दर्जा देत नाही. सर्व कार्यांत महिलांना सहभागी करून घेतले, तर सगळी कार्ये संपन्न होतात

औरंगाबाद : ‘कोणत्याही मंगलकार्याची तयारी ही महिलाच करतात. तरीसुद्धा त्यांना आपण योग्य तो दर्जा देत नाही. सर्व कार्यांत महिलांना सहभागी करून घेतले, तर सगळी कार्ये संपन्न होतात, असे वाणी नवीनचंद्र रेड्डी यांनी ‘लोकमत’तर्फे सुरू केलेल्या ‘ती’च्या गणपती आरतीच्या वेळी म्हटले. या मंगलप्रसंगी विशाखा समितीच्या अध्यक्ष अर्चना गोंधळेकर व डॉ. आशा साकोळकर यांची उपस्थिती लाभली होती. त्याबरोबरच ‘ती’च्या गणपतीच्या उद्देशाने प्रभावित होऊन आर.आर. बाहेती शाळेच्या अंध विद्यार्थ्यांनी यावेळी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली.सर्वार्थाने महिलांच्या सहभागाने आयोजित ‘ती’चा गणपती हा महिलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. यावेळी अर्चना गोंधळेकर म्हणाल्या की, ‘पुरुषप्रधान समाजात स्त्रीला स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी लढा द्यावा लागणार आहे. जगाशी जर स्पर्धा करायची असेल तर महिलांना समान वागणूक आणि मान देण्याची गरज आहे.मूल्य हरवत चाललेल्या समाजाला एक स्त्रीच योग्य दिशा देऊ शकते आणि २०२० मध्ये भारताचे जागतिक महासत्ता बनायचे स्वप्न नारी शक्तीच्या जोरावर पूर्ण होऊ शकते. म्हणून ‘ती’च्या गणपतीमुळे समाजात या दृष्टीने नक्कीच प्रेरणादायी संदेश जाईल.’ डॉ. आशा साकोळकर म्हणाल्या की, ‘प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना प्राधान्य दिले पाहिजे. महिलांना समाजात दर्जा आणि संधी दिली तर समाजाचा सर्वांगीण विकास होईल. स्त्री ही अष्टपैलू असते. हे रोजच्या वागण्यातून सिद्ध होते. मूल, बाळ आणि नवऱ्याची काळजी घेत घराचा योग्यरीतीने सांभाळ करते. सामाजिक भान बाळगून अशा कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन करण्यात आले पाहिजे.’आई, बहीण, मैत्रीण, पत्नी अशा विविध रूपांत आपल्या जीवनात आनंद भरणाऱ्या स्त्रीचा सन्मान करणे आपले प्रथम कार्य आहे.आपल्या महान संस्कृतीमध्ये स्त्रीला सर्वोच्च स्थान आहे. म्हणूनच ‘लोकमत’ने कृती, निर्मिती आणि संस्कृती हे ब्रीदवाक्य मनी ठेवून ‘तीच्या’ गणपतीचा अनोखा उपक्रम सुरू केला. आपल्या गणेश मंडळात जर ‘ती’चा गणपतीसारखा उपक्रम राबविण्यात येत असेल, तर महिला आरती करीत असलेले छायाचित्र लोकमत इव्हेन्ट विभाग, लोकमत भवन, औरंगाबाद येथे पाठवावे. ‘लोकमत’तर्फे असे छायाचित्र प्रकाशित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. अधिक महितीसाठी ९८५०४०६०१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.