शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

जालना जिल्ह्यात वीज पडून महिला ठार; औरंगाबादेत दोन तरुण वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:33 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे सारोळा परिसरातील अंजना नदीला मोठा पूर आला. यात दोघे तरूण वाहून गेले.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे सारोळा परिसरातील अंजना नदीला मोठा पूर आला. यात दोघे तरुण वाहून गेले. यातील एकाला वाचविण्यात यश आले. दुसऱ्या घटनेत जालना जिल्ह्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला.कन्नड तालुक्यात सारोळा -नाचनवेल रस्त्यावरील पुलावरून वाहणा-या पुराचा आनंद घेत असताना सत्तार पठाण व सचिन राजू माकवान (३२, रा. सारोळा) हे दोन तरुण वाहून गेले. पोहता येत असल्याने सत्तार हा कडेवर पोहोचला. त्याला नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने बाहेर काढल्याने तो बचावला. मात्र सचिनला पोहता येत नसल्याने तो पुराच्या प्रवाहात वाहून गेला. पिशोरचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार, जमादार परमेश्वर दराडे, पो.ना. किसन गवळी यांनी गावकºयांच्या मदतीने कोल्हापुरी बंधाºयात शोध घेतला, मात्र रात्रीची वेळ असल्याने सचिन मिळून आला नाही. नदीकाठच्या गावातील पोलीस पाटलांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून शनिवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार असल्याचे सपोनि. पवार यांनी सांगितले. जखमी सत्तारला उपचारासाठी सिल्लोडला हलविण्यात आले आहे.जालना तालुक्यातील गुंडेवाडी परिसरात दुपारी तीनच्या सुमारास वीज पडून सुमनबाई रावसाहेब गजर (४०) या जागीच ठार झाल्या, तर त्यांच्या सोबत असलेली त्यांची मुलगी पूजा रावसाहेब गजर (१७) आणि मोनाबाई मुरलीधर गजर (३५) या गंभीर जखमी झाल्या. पाऊस आल्याने शेतातील काम थांबवून या सर्वजणी झाडाखाली थांबल्या होत्या. जमखींना येथील खासगी रूग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अंबड व परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. जालना तालुक्यातील मानदेवूळगाव व परिसरात तसेच भोकरदन व परिसरातही पावसाने हजेरी लावली.हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊसहिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांपासून शेतकºयांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. अखेर शुक्रवारी रात्री ८. ३० वाजता जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप पिकास जिवदान मिळाले आहे. तर हिंगोली शहरात रस्ते जलयम झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. शेतकरी मागील आठ दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होते. मात्र उशिरा का होईना मेघ गर्जनेसह झालेल्या पावसाने शेतकºयांना धिर आला आहे. जिल्ह्यात सेनगाव, डोंगरकडा, बासंबा, खुडज, कळमनुरी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर काही भागात वीज पुरवठाही खंडीत झाल्याने ग्रामस्थांना मात्र रात्र अंधारात काढावी लागली. तर अनेक भागात नदी, नाले दुथडी भरुन वाहत होते. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता.बीड जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीबीड : शुक्रवारी सायंकाळी बीड शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारी चारच्या सुमारास शिरूर, धारूर व गेवराई तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शिरूर शहरातील रस्त्यांवर गटारीचे पाणी वाहून दुर्गंधी पसरली होती. याचा त्रास नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. ऐन शाळा सुटण्याच्या सुमारास पावसास सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत घरी जावे लागले. गेवराई येथेही पावसामुळे गटारी तुंबल्या होत्या, तर बस स्थानक परिसरात पाणी साचले होते. जिल्ह्यात १ ते २२ जूनदरम्यान सरासरी ९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ १४ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे.

टॅग्स :Deathमृत्यू