शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

नोकरीच्या आमिषाने महिलेला सातारा परिसरात नेऊन कारमध्येच केला अत्याचार, आरोपीचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 14:39 IST

Women raped in car at Satara area of Aurangabad : कारमध्येच दारू पिऊन शरीरसंबंधाची मागणी केली. त्यास नकार दिल्यावर त्याने बळजबरी अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले.

ठळक मुद्देआरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पीडितेची पोलिसात तक्रार देण्याची हिंमत झाली नाहीअत्याचाराची पोलिसात तक्रार केली तर नोकरीचे काम करणार नाही, असा दम भरला.

औरंगाबाद: लॉकडाऊनमुळे खानावळीचा व्यवसाय ठप्प झालेल्या महिलेला सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सातारा परिसरातील निर्जनस्थळी नेऊन कारमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आला. जानेवारी महिन्यात रात्री ८ वाजता ही घटना घडली. आरोपीने पीडितेला धमकी दिल्याने ती तक्रार देऊ शकली नव्हती. ओळखीच्या महिलेने धीर दिल्याने १३ जुलै रोजी तिने सातारा ठाणे गाठून गुन्हा नोंदविला.

अरुण अग्रवाल (रा. जालना) असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील पीडिता खानावळ चालविते. आरोपी अरुण हा दोन वर्षापासून तेथे जेवायला येत होता. लॉकडाऊनमुळे खानावळ बंद झाल्याने ती घरातून जेवणाचा डबा देत असे. लॉकडाऊनमुळे व्यवसायावर परिणाम झाला. यापुढे खानावळ पूर्वीसारखी सुरू होईल, हे सांगता येत नाही. मी तुम्हाला जालना जिल्हा परिषद अथवा औरंगाबाद महापालिकेत नोकरीस लावून देतो, असे आरोपी अग्रवाल याने तिला सांगितले. सरकारी नोकरी लागल्यावर तुझ्या मुलांचे भविष्य चांगले होईल, असेही तो म्हणाला. त्याच्या बोलण्यावर पीडितेचा विश्वास बसला होता.

जानेवारी महिन्यात तो तिच्या घरी कार घेऊन गेला. तुमच्या नोकरीसाठी आपल्याला एका साहेबांना भेटायला जायचे आहे, असा बहाणा त्याने केला. त्याच्यावर विश्वास ठेवून महिला त्याच्यासोबत कारमध्ये गेली. तो त्यांना घेऊन बीड बायपास परिसरातील एमआयटी कॉलेजजवळ गेला. रात्रीचे सुमारे ८ वाजले असतील. त्याने कुणाला तरी कॉल केला आणि आम्ही एमआयटी कॉलेजजवळ येऊन थांबलो आहे, तुमची वाट पाहत आहे, असे म्हणून त्याने फोन ठेवला. साहेबांना यायला उशीर होईल, तोपर्यंत कुठेतरी थांबू असे म्हणून तो कार घेऊन परिसरातील निर्जनस्थळी गेला. तेथे त्याने कारमध्येच दारू पिऊन शरीरसंबंधाची मागणी केली. त्यास नकार दिल्यावर त्याने बळजबरी अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले. यानंतर त्याने जीवे मारण्याची धमकी देत कारमधून ढकलून दिले आणि तो कार घेऊन तेथून निघून गेला.

...अखेर पोलिसात तक्रारआरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पीडितेची पोलिसात तक्रार देण्याची हिंमत झाली नाही, शिवाय तेव्हापासून तो तिला भेटला नाही. काही दिवसापूर्वी त्याने नोकरीचे काम करणार आहे, असा निरोप त्याच्या मित्रांमार्फत तिला पाठविला. पोलिसात तक्रार केली तर नोकरीचे काम करणार नाही, असा दम भरला. दरम्यान, तिच्या खानावळीत काम करणाऱ्या महिलेला हा प्रकार सांगितल्यावर तीने धीर दिल्याने पोलिसात तक्रार नोंदविली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद