शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
4
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
5
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
6
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
7
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
8
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
9
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
10
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
11
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
12
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
13
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
14
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
15
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
16
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
17
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
18
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
19
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
20
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

गावे बदलल्याशिवाय देशाचा विकास अशक्य

By admin | Updated: March 28, 2016 00:11 IST

उमरगा : गावे बदलल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. गावांचा सर्वांगिण विकास, अर्थकारण पाण्यावर अवलंबून असते. ज्या गावात जास्त पाणी ते गाव श्रीमंत अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

उमरगा : गावे बदलल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. गावांचा सर्वांगिण विकास, अर्थकारण पाण्यावर अवलंबून असते. ज्या गावात जास्त पाणी ते गाव श्रीमंत अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. जमिनीतील पाणीसाठे कायम ठेवण्यासाठी कुपनलिका बंद ठेवाव्या लागणार आहेत. कुपनलिकामुळेच जमिनीतील पाणी साठ्यात घट झाली आहे. गाव हे विकासाचे केंद्र मानून माथ्यापासून पायथ्यापर्यंत पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवा असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.उमरगा तालुक्यातील कवठा सेवाग्राम येथील भारत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाच कोटी लिटरच्या पहिल्या टप्प्यातील अडीच कोटी वॉटर बँकेची उभारणी केली आहे. या वॉटर बँकेच्या पाण्याचे जलपूजन रविवारी आण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राजस्थान येथील जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा, सिनेअभिनेते रितेश देशमुख, रामकृष्णपंत खरोसेकर, विजयकुमार सोनवणे, पाडोळीचे सरपंच पवार, सरपंच गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते़पुढे बोलताना अण्णा म्हणाले की, गावाचा विकास हा अर्थकारणावर अवलंबून असतो. गावातील अर्थकारण हे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेती व्यवसायाला पाणी संवर्र्धनाचे नियोजन लाभल्यास गावाचा विकास शक्य आहे. गावातील जलसंवर्धनाची कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास कधीच पाणी टंचाई निर्माण होणार नाही. कुपनलिका घेण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस मोठी वाढ होत असून, त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. कूपनलिका बंद करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असून, याबाबत कायदा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आता ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ यापेक्षा ‘माती आडवा माती जिरवा’ ही संकल्पना महत्त्वाची ठरणार आहे. आता केवळ भाषणे करुन वेळ मारुन नेण्याचे दिवस संपले आहेत. दिलेल्या शब्दाला कृतीची जोड द्यावी लागणार आहे. माणसं भौतिक सुखासाठी वेगाने धावपळ करु लागली आहेत. खरे सुख हे दुसऱ्यांना सुखी करण्यात असल्याने इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करा. ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने मरणे पत्करण्यापेक्षा समाजसेवा करताना आलेले मरण खरा आनंद देणारे असते असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायकराव पाटील यांनी केले. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी खचून न जाता मोठ्या धैर्याने आपल्या व्यथा आमच्यापर्यंत पोहंचवाव्यात. गरजू शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन कवी योगीराज माने यांनी केले. तर आभार मलंग गुरुजी यांनी मानले. कार्यक्रमासाठी परिसरातील १०० गावचे सरपंच उपस्थित होते. (वार्ताहर)