शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गावे बदलल्याशिवाय देशाचा विकास अशक्य

By admin | Updated: March 28, 2016 00:11 IST

उमरगा : गावे बदलल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. गावांचा सर्वांगिण विकास, अर्थकारण पाण्यावर अवलंबून असते. ज्या गावात जास्त पाणी ते गाव श्रीमंत अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

उमरगा : गावे बदलल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. गावांचा सर्वांगिण विकास, अर्थकारण पाण्यावर अवलंबून असते. ज्या गावात जास्त पाणी ते गाव श्रीमंत अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. जमिनीतील पाणीसाठे कायम ठेवण्यासाठी कुपनलिका बंद ठेवाव्या लागणार आहेत. कुपनलिकामुळेच जमिनीतील पाणी साठ्यात घट झाली आहे. गाव हे विकासाचे केंद्र मानून माथ्यापासून पायथ्यापर्यंत पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवा असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.उमरगा तालुक्यातील कवठा सेवाग्राम येथील भारत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाच कोटी लिटरच्या पहिल्या टप्प्यातील अडीच कोटी वॉटर बँकेची उभारणी केली आहे. या वॉटर बँकेच्या पाण्याचे जलपूजन रविवारी आण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राजस्थान येथील जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा, सिनेअभिनेते रितेश देशमुख, रामकृष्णपंत खरोसेकर, विजयकुमार सोनवणे, पाडोळीचे सरपंच पवार, सरपंच गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते़पुढे बोलताना अण्णा म्हणाले की, गावाचा विकास हा अर्थकारणावर अवलंबून असतो. गावातील अर्थकारण हे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेती व्यवसायाला पाणी संवर्र्धनाचे नियोजन लाभल्यास गावाचा विकास शक्य आहे. गावातील जलसंवर्धनाची कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास कधीच पाणी टंचाई निर्माण होणार नाही. कुपनलिका घेण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस मोठी वाढ होत असून, त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. कूपनलिका बंद करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असून, याबाबत कायदा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आता ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ यापेक्षा ‘माती आडवा माती जिरवा’ ही संकल्पना महत्त्वाची ठरणार आहे. आता केवळ भाषणे करुन वेळ मारुन नेण्याचे दिवस संपले आहेत. दिलेल्या शब्दाला कृतीची जोड द्यावी लागणार आहे. माणसं भौतिक सुखासाठी वेगाने धावपळ करु लागली आहेत. खरे सुख हे दुसऱ्यांना सुखी करण्यात असल्याने इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करा. ऱ्हदयविकाराच्या धक्क्याने मरणे पत्करण्यापेक्षा समाजसेवा करताना आलेले मरण खरा आनंद देणारे असते असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायकराव पाटील यांनी केले. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी खचून न जाता मोठ्या धैर्याने आपल्या व्यथा आमच्यापर्यंत पोहंचवाव्यात. गरजू शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन कवी योगीराज माने यांनी केले. तर आभार मलंग गुरुजी यांनी मानले. कार्यक्रमासाठी परिसरातील १०० गावचे सरपंच उपस्थित होते. (वार्ताहर)