शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी माघार घेतल्याने औरंगाबाद जिल्हा परिषदेतील तीन कोटींच्या निधीचा पेच सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 13:43 IST

जिल्हा परिषदेकडून अखर्चित राहिलेला ७ कोटी रुपयांचा निधी लघुसिंचन स्थानिक स्तर विभागाला दिल्यानंतर आणखी ३ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले होते. तथापि, जुन्या दायित्वासाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे तीन कोटींचा हा निधी त्यावर खर्च करण्यास परवानगी देण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. पालकमंत्र्यांनी ती विनंती मान्य केल्यामुळे प्रशासनासमोरील मोठा पेच सुटला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडून अखर्चित राहिलेला ७ कोटी रुपयांचा निधी लघुसिंचन स्थानिक स्तर विभागाला दिल्यानंतर आणखी ३ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले होते.जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे तीन कोटींचा हा निधी त्यावर खर्च करण्यास परवानगी देण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे करण्यात आली.पालकमंत्र्यांनी ती विनंती मान्य केल्यामुळे प्रशासनासमोरील मोठा पेच सुटला आहे. 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेकडून अखर्चित राहिलेला ७ कोटी रुपयांचा निधी लघुसिंचन स्थानिक स्तर विभागाला दिल्यानंतर आणखी ३ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले होते. तथापि, जुन्या दायित्वासाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे तीन कोटींचा हा निधी त्यावर खर्च करण्यास परवानगी देण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. पालकमंत्र्यांनी ती विनंती मान्य केल्यामुळे प्रशासनासमोरील मोठा पेच सुटला आहे. 

मागील दोन वर्षांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेला निधी जिल्हा परिषदेला मुदतीच्या आत खर्च करता आला नाही. त्यामुळे ७ कोटी रुपयांचा अखर्चित निधी दोन टप्प्यांमध्ये लघुसिंचन स्थानिक स्तर विभागाकडे वर्ग करण्यात आला. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषदेने कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधाºयांच्या कामांना मंजुरी दिलेली होती. त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण होत आली आहेत, अशातच पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा परिषदेने अखर्चित अथवा चालू आर्थिक वर्षातील ३ कोटी रुपयांचा निधी लघुसिंचन स्थानिक स्तर विभागाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जुने दायित्व अदा करण्यासाठी प्रशासनासमोर निधीचा पेच निर्माण झाला होता.

मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी जिल्हा परिषदेकडे असलेल्या निधीच्या तुटवड्याकडे पालकमंत्री कदम यांचे लक्ष वेधले. अनेक कामांना मंजुरी दिलेली असून, काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे पालकमंत्र्यांना सांगितले. तेव्हा पालकमंत्र्यांनी ३ कोटी रुपयांचा निधी वर्ग न करता त्यातून जुने दायित्व अदा करण्यासंबंधी जिल्हा परिषदेला पत्राद्वारे कळविले आहे. या निधीतून आता भूसंपादनाचा मावेजा अथवा सिंचन विभागाच्या कामांची देयके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

‘त्या’ ५२ फायलींचा घोळ मिटलायासंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, सिंचन विभागाच्या ‘त्या’ ५२ फायलींतील त्रुटींची पूर्तता करण्यास सिंचन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. यापैकी २९ कामे पूर्ण झालेली असली, तरी त्या कामांच्या काही बिलांमध्येही किरकोळ त्रुटी आहेत. त्यांची पूर्तता झाल्यास देयके अदा केली जातील. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबादRamdas Kadamरामदास कदम