शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

पालकमंत्र्यांनी माघार घेतल्याने औरंगाबाद जिल्हा परिषदेतील तीन कोटींच्या निधीचा पेच सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 13:43 IST

जिल्हा परिषदेकडून अखर्चित राहिलेला ७ कोटी रुपयांचा निधी लघुसिंचन स्थानिक स्तर विभागाला दिल्यानंतर आणखी ३ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले होते. तथापि, जुन्या दायित्वासाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे तीन कोटींचा हा निधी त्यावर खर्च करण्यास परवानगी देण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. पालकमंत्र्यांनी ती विनंती मान्य केल्यामुळे प्रशासनासमोरील मोठा पेच सुटला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडून अखर्चित राहिलेला ७ कोटी रुपयांचा निधी लघुसिंचन स्थानिक स्तर विभागाला दिल्यानंतर आणखी ३ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले होते.जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे तीन कोटींचा हा निधी त्यावर खर्च करण्यास परवानगी देण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे करण्यात आली.पालकमंत्र्यांनी ती विनंती मान्य केल्यामुळे प्रशासनासमोरील मोठा पेच सुटला आहे. 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेकडून अखर्चित राहिलेला ७ कोटी रुपयांचा निधी लघुसिंचन स्थानिक स्तर विभागाला दिल्यानंतर आणखी ३ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले होते. तथापि, जुन्या दायित्वासाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे तीन कोटींचा हा निधी त्यावर खर्च करण्यास परवानगी देण्याची विनंती पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. पालकमंत्र्यांनी ती विनंती मान्य केल्यामुळे प्रशासनासमोरील मोठा पेच सुटला आहे. 

मागील दोन वर्षांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेला निधी जिल्हा परिषदेला मुदतीच्या आत खर्च करता आला नाही. त्यामुळे ७ कोटी रुपयांचा अखर्चित निधी दोन टप्प्यांमध्ये लघुसिंचन स्थानिक स्तर विभागाकडे वर्ग करण्यात आला. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषदेने कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधाºयांच्या कामांना मंजुरी दिलेली होती. त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण होत आली आहेत, अशातच पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा परिषदेने अखर्चित अथवा चालू आर्थिक वर्षातील ३ कोटी रुपयांचा निधी लघुसिंचन स्थानिक स्तर विभागाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जुने दायित्व अदा करण्यासाठी प्रशासनासमोर निधीचा पेच निर्माण झाला होता.

मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी जिल्हा परिषदेकडे असलेल्या निधीच्या तुटवड्याकडे पालकमंत्री कदम यांचे लक्ष वेधले. अनेक कामांना मंजुरी दिलेली असून, काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे पालकमंत्र्यांना सांगितले. तेव्हा पालकमंत्र्यांनी ३ कोटी रुपयांचा निधी वर्ग न करता त्यातून जुने दायित्व अदा करण्यासंबंधी जिल्हा परिषदेला पत्राद्वारे कळविले आहे. या निधीतून आता भूसंपादनाचा मावेजा अथवा सिंचन विभागाच्या कामांची देयके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

‘त्या’ ५२ फायलींचा घोळ मिटलायासंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, सिंचन विभागाच्या ‘त्या’ ५२ फायलींतील त्रुटींची पूर्तता करण्यास सिंचन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. यापैकी २९ कामे पूर्ण झालेली असली, तरी त्या कामांच्या काही बिलांमध्येही किरकोळ त्रुटी आहेत. त्यांची पूर्तता झाल्यास देयके अदा केली जातील. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबादRamdas Kadamरामदास कदम