शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास असेपर्यंत तुमच्या सोबत, अन्यथा मार्ग मोकळा; अब्दुल सत्तारांचा शिंदेंना सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:03 IST

मंत्री संजय शिरसाट यांनाही सत्तार यांनी दिले जोरदार प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगर : मंत्रीमंडळात डावलण्यात आल्यामुळे नाराज असलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नववर्षाच्या पहिल्या दिनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपण लोकनेते असल्याचे दाखवून दिले. शिवाय, माझ्यावर तुमचा विश्वास असेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. विश्वास संपला की मार्ग मोकळा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचक इशाराही त्यांनी दिला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा माझ्यावर विश्वास आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या एकसष्टीनिमित्त येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या अभीष्टचिंतन आणि नागरी सत्कार सोहळ्यात या मैदानावरील आजवरचा गर्दीचा विक्रम मोडला गेला. जिल्हाभरातून सत्तार समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी सत्काराला उत्तर देताना आ. सत्तार यांनी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “मी मंत्रिपदावर नसतानादेखील लोकांनी प्रेमापोटी एवढी गर्दी केली आहे. मी सदैव जनतेच्या सेवेत राहणारा माणूस आहे. राजकारणात पुढे काय होईल, ते सांगता येणार नाही. मी काय निर्णय घेणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. काही जण सिल्लोडला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यांनी आम्हाला विरोध केला, लोकांनी त्यांनाच घरी बसविले,” असा टोला त्यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. यावेळी खा. कल्याण काळे, डॉ. दिनेश परदेशी, माजी आ. सुरेश जेथलिया, कृष्णा पाटील डोणगावकर, राधाकिसन पठाडे, रामूकाका शेळके, बाळासाहेब संचेती, अभिजित देशमुख, सुधाकर सोनवणे, संतोष कोल्हे, अविनाश गलांडे, नंदकिशोर सहारे, भाऊसाहेब ठोंबरे आदींची उपस्थिती होती.

शिंदेसेनेचे आमदार अनुपस्थित!जिल्ह्यात शिंदेसेनेचे सहा आमदार आहेत. मात्र, आमदार सत्तार यांच्या नागरी सत्काराला एक जणही उपस्थित नव्हता. उलट भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व इतर पक्षातील नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

मंत्री शिरसाट यांना दिले उत्तर..सिल्लोडमधील गुंडगिरी संपविण्याचा इशारा देणारे मंत्री संजय शिरसाट यांनाही सत्तार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “सिल्लोडला काय येता? मीच छत्रपती संभाजीनगरमध्ये येतोय. इथली गुंडगिरी कशी थांबवायची ते आधी पाहू. त्यांचे वक्तव्य म्हणजे, नाल्याच्या पाण्याचा खळखळाट आहे. आम्ही समुद्रासम आहोत!”

मी पुन्हा येईन...आमच्या नेत्याने (शिंदेंनी) सर्वांना सांगितले आहे की, अडीच-अडीच वर्ष मंत्रिपद राहील. त्यामुळे मलाही अडीच वर्षे थांबावे लागेल. अडीच वर्षांनंतर काय होईल, मला माहिती नाही. राजकारणात आश्वासन पूर्ण होत नसते. पण, काहीही करून मी पुन्हा येईन!

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर