शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

'लॉटरी लागली, कर्ज घ्या'; मोबाइलवर अनवाँटेड कॉल्स रोखायचे कसे?

By राम शिनगारे | Updated: December 29, 2022 12:40 IST

अनोळखी कॉलला कोणताच प्रतिसाद न देता आपली फसवणूक टाळता येऊ शकते

- राम शिनगारेऔरंगाबाद : मोबाइलवर सतत अनवाँटेड कॉल्सचा मारा सुरू असतो. हे कॉल्स विविध कंपन्या, बँकांची कर्ज घेण्यासाठी असतात. काही कॉल हे फसवणूक करण्यासाठीच केलेले असतात. काही वेळा सूचना देण्यासाठीही कॉल येतात. त्यांना रोखण्यासाठी मोबाइल कंपन्यांकडे ‘डू नॉट डिस्टर्ब ऑफ’ असा मेसेज पाठवावा लागतो. हा मेसेज पाठविल्यानंतरही अनवाँटेड कॉल्स येतच राहतात. ते ग्रुप कॉल असतात. मोबाइलधारक या कॉल्समुळे त्रस्त होऊन जातात. यातून सुटका करून घेण्यासाठी संबंधित कॉलला प्रतिसाद न देणे हेच उत्तम ठरते, असे सायबर पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनोळखी नंबरवरूनच होते फसवणूकफसवणूक करण्याच्या उद्देशाने आलेले कॉल अनोळखी नंबरवरून असतात. त्यामुळे अशा कॉलला प्रतिसाद देण्यात येऊ नये. अनेक वेळा परदेशातून, परराज्यातून कॉल येतात. ते आपल्याला काही तरी आमिष दाखविण्याचा प्रयत्न करतात. त्यास प्रतिसाद दिल्यामुळे आपली फसवणूक होत असते.

कसे रोखाल अनवाँटेड कॉल्स?ऑनलाइनच्या जमान्यात आपण कोणत्याही ठिकाणी खरेदीसाठी गेल्यानंतर संबंधित ठिकाणी मोबाइल नंबर नोंदवून घेतात. त्यासह इतर ठिकाणांहून मोबाइल नंबर जातात. त्यामुळे सायबर हॅकरही आपले मोबाइल क्रमांक मिळवून त्याद्वारे कॉल करीत असतात. त्यांना रोखण्यासाठी प्रतिसाद न देणे हाच उत्तम पर्याय असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.

११ महिन्यांत मोबाइलवरून शेकडोंची फसवणूकअनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर काही नवीनच माहिती सांगून, बक्षीस लागल्याची थाप मारून, आपली वीज कट करण्यात येत असल्याचे सांगून, ‘केवायसी’चा बहाणा करून फसवणूक केली जाते. त्यात आपल्याला प्रभावित करून बँक डिटेल्सही घेतले जातात. अशा पद्धतीने चालू वर्षात शेकडो जणांची फसवणूक करण्यात आली आहे.

लाखो रुपये उडविलेऑनलाइन भामट्यांनी सायबर पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या शेकडो तक्रारदारांना लाखो रुपयांना गंडवले आहे. प्रत्येक वेळी फसवणुकीची नवा फंडाही वापरण्यात आल्याचे तक्रारींवरून दिसून येते.

तंत्रज्ञानाचा वापर करामोबाइलवर येणाऱ्या अनोळखी कॉलला ओळखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. आपल्याकडे सोशल मीडियाचे ॲप असतात, तसेच काही मोबाइल क्रमांक ओळखणारे ॲप आहेत. त्याद्वारे कोणाचा कॉल आला होता, हे तपासता येते. त्याशिवाय अनोळखी कॉलला कोणताच प्रतिसाद न देता आपली फसवणूक टाळता येऊ शकते, असे सायबर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल