शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

मराठवाड्याची तहान भागणार?, नगर अन् नाशिकचे पाणी जायकवाडीच्या दिशेनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 18:09 IST

जायकवाडीत ३ टक्के पाणी वाढले

ठळक मुद्देजिवंत साठ्यात येण्यासाठी ५.३१ टीएमसी पाण्याची गरजनांदूर -मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात ५३३०४ एवढ्या मोठ्या क्षमतेने विसर्ग

पैठण (औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील धरणातून सोमवारी मोठ्या प्रमाणावर विसर्ग वाढविण्यात आला असून, यामुळे गोदावरीला पूर आला आहे. गोदावरीचा पूर लक्षात घेता जायकवाडी धरणात मंगळवारपासून आवक वाढणार असल्याने जायकवाडी धरण मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्याची शक्यता जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत धरणाच्या जलसाठ्यात ३ टक्के वाढ झाली असली तरीही धरण अद्याप मृतसाठ्यातच आहे. धरणाचा जलसाठा मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी ५.३१ टीएमसी पाण्याची गरज आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यास काल पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग वाढविण्यात आले आहेत. आज दारणा धरणातून १६६८८ क्युसेक, गंगापूर धरणातून ५४९९, कडवा धरणातून १४५६० क्युसेक अशा मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात आला. या सर्व धरणांचे पाणी नांदूर-मधमेश्वर वेअरमध्ये येत असल्याने नांदूर -मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात ५३३०४ क्युसेक अशा क्षमतेने विसर्ग वाढविण्यात आला आहे.गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीस मोठा पूर आला आहे. नाशिक ते पैठण दरम्यान गोदावरी काठालगतच्या गावकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जायकवाडी धरणाच्या वर वैजापूर तालुक्यातील नागमठाण बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात आज सायंकाळी २३००० क्युसेक विसर्ग होत होता. जायकवाडी धरणात २१९४९ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. सायंकाळी धरणाची पाणीपातळी १४९०.८३ फूट अशी झाली होती. धरणात एकूण जलसाठा ५८७.५७६ दलघमी एवढा झाला आहे. धरण मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी १५०.५३० दलघमी (५.३१ टीएमसी) पाण्याची गरज आहे. धरणाचा जलसाठा -६.९३ टक्के झाला आहे.जिवंत साठा होणार

सोमवारी सायंकाळी ५ वाजता नांदूर -मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात ५३३०४ एवढ्या मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू झाला आहे. गोदावरी नदीला मोठा पूर आला असून जायकवाडी प्रशासन गोदावरीतील पाण्यावर नजर ठेवून आहे. जायकवाडी धरणाच्या वर नागमठाण येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरीची पाणीपातळी मोजली जात असून, गोदावरीची पाणीपातळी वाढत आहे. साधारणपणे मंगळवार सकाळपासून धरणात मोठी आवक होणार आहे. यामुळे धरण मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येईल, अशी अपेक्षा जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे.

केळगाव धरण ओव्हरफ्लोसिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील केळणा नदीवर असलेले धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे नदीपात्रात येणारे पाणी धरणावरून ओसंडून वाहत आहे. सध्या परिसरात हे धरण येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.मागील वर्षी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा धरण परिसरात चांगला पाऊस झाला होता. यंदाही सतत तीन दिवसांपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे सध्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. गेल्या तीन दिवसांपासून धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने रविवारी रात्री १२ वाजता धरण पूर्ण क्षमतेने भरले, अशी माहिती प्रकल्प कर्मचारी पाठकरी यांनी दिली. धरणातून पाणी ओसंडून वाहत असल्याने नागरिकांना आनंद झाला आहे. मात्र अवैध पाणी उपसा होणार नाही याची काळजीही प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. हे धरण भरल्यामुळे सिल्लोडला पाणीपुरवठा करणाऱ्या केळणा प्रकल्पात पाणी  वाढ होणार आहे.

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडा