शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

मराठवाड्याची तहान भागणार?, नगर अन् नाशिकचे पाणी जायकवाडीच्या दिशेनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 18:09 IST

जायकवाडीत ३ टक्के पाणी वाढले

ठळक मुद्देजिवंत साठ्यात येण्यासाठी ५.३१ टीएमसी पाण्याची गरजनांदूर -मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात ५३३०४ एवढ्या मोठ्या क्षमतेने विसर्ग

पैठण (औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील धरणातून सोमवारी मोठ्या प्रमाणावर विसर्ग वाढविण्यात आला असून, यामुळे गोदावरीला पूर आला आहे. गोदावरीचा पूर लक्षात घेता जायकवाडी धरणात मंगळवारपासून आवक वाढणार असल्याने जायकवाडी धरण मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्याची शक्यता जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत धरणाच्या जलसाठ्यात ३ टक्के वाढ झाली असली तरीही धरण अद्याप मृतसाठ्यातच आहे. धरणाचा जलसाठा मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी ५.३१ टीएमसी पाण्याची गरज आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यास काल पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग वाढविण्यात आले आहेत. आज दारणा धरणातून १६६८८ क्युसेक, गंगापूर धरणातून ५४९९, कडवा धरणातून १४५६० क्युसेक अशा मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात आला. या सर्व धरणांचे पाणी नांदूर-मधमेश्वर वेअरमध्ये येत असल्याने नांदूर -मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात ५३३०४ क्युसेक अशा क्षमतेने विसर्ग वाढविण्यात आला आहे.गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीस मोठा पूर आला आहे. नाशिक ते पैठण दरम्यान गोदावरी काठालगतच्या गावकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जायकवाडी धरणाच्या वर वैजापूर तालुक्यातील नागमठाण बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात आज सायंकाळी २३००० क्युसेक विसर्ग होत होता. जायकवाडी धरणात २१९४९ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. सायंकाळी धरणाची पाणीपातळी १४९०.८३ फूट अशी झाली होती. धरणात एकूण जलसाठा ५८७.५७६ दलघमी एवढा झाला आहे. धरण मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी १५०.५३० दलघमी (५.३१ टीएमसी) पाण्याची गरज आहे. धरणाचा जलसाठा -६.९३ टक्के झाला आहे.जिवंत साठा होणार

सोमवारी सायंकाळी ५ वाजता नांदूर -मधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात ५३३०४ एवढ्या मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू झाला आहे. गोदावरी नदीला मोठा पूर आला असून जायकवाडी प्रशासन गोदावरीतील पाण्यावर नजर ठेवून आहे. जायकवाडी धरणाच्या वर नागमठाण येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरीची पाणीपातळी मोजली जात असून, गोदावरीची पाणीपातळी वाढत आहे. साधारणपणे मंगळवार सकाळपासून धरणात मोठी आवक होणार आहे. यामुळे धरण मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येईल, अशी अपेक्षा जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी व्यक्त केली आहे.

केळगाव धरण ओव्हरफ्लोसिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील केळणा नदीवर असलेले धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे नदीपात्रात येणारे पाणी धरणावरून ओसंडून वाहत आहे. सध्या परिसरात हे धरण येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.मागील वर्षी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा धरण परिसरात चांगला पाऊस झाला होता. यंदाही सतत तीन दिवसांपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. यामुळे सध्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. गेल्या तीन दिवसांपासून धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने रविवारी रात्री १२ वाजता धरण पूर्ण क्षमतेने भरले, अशी माहिती प्रकल्प कर्मचारी पाठकरी यांनी दिली. धरणातून पाणी ओसंडून वाहत असल्याने नागरिकांना आनंद झाला आहे. मात्र अवैध पाणी उपसा होणार नाही याची काळजीही प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. हे धरण भरल्यामुळे सिल्लोडला पाणीपुरवठा करणाऱ्या केळणा प्रकल्पात पाणी  वाढ होणार आहे.

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडा