शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

'छत्रपती संभाजीनगर' वरून मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवणार; इम्तियाज जलील यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 17:18 IST

ज्या शहराचा विकास ठप्प पडला आहे. ज्या शहरात आठ-आठ दिवसाला पाणी येते. त्या शहराच्या नामकरणावरून केवळ राजकारण सुरु आहे.

औरंगाबाद: शहराचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील प्रेमाने किंवा आदर असल्याने झाले नसून यात केवळ राजकीय स्वार्थ आहे. प्रथम शहराच्या विकासाचा मुद्दा महत्वाचा असून नामकरणाच्या विरोधात आणि अतिवृष्टी ग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एमआयएम आणि इतर समविचारी पक्ष औरंगाबाद दौऱ्यात काळे झेंडे दाखवणार, अशी घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी आज केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर खा. इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्या शहराचा विकास ठप्प पडला आहे. ज्या शहरात आठ-आठ दिवसाला पाणी येते. त्या शहराच्या नामकरणावरून केवळ राजकारण सुरु आहे. ज्यांना काही कामधंदा नसतो ते असे काम करतात. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव अशा राजकारणासाठी वापरू नये. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज कायम महान आहेत, राजकारण करणाऱ्यांनी त्यांच्या कार्याची उंची गाठावी, असे आवाहन खा. जलील यांनी केले. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी शहर विकास आधी असे जाहीर केले होते, पण सत्ता जाणार असे दिसताच नामकरण केले. त्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी हेच केले. आम्ही सुप्रीम कोर्टात हेच सांगणार आहोत. की छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेमामुळे नाव बदलेल नसून राजकीय कारण आहे, असेही जलील म्हणाले.

राज्यात दोघांचेच अद्भुत मंत्रीमंडळ  राज्यात अतिवृष्टी झाली आहे आणि राज्यात केवळ दोघांचेच अद्भुत मंत्रिमंडळ आहे. किमान कृषिमंत्री तरी नेमून अतिवृष्टीग्रस्तांना दिला द्यावा. शिंदे-फडणवीस यांना याचे काही देणेघेण नाही. यामुळेच अतिवृष्टी आणि शहर नामकरणावरून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहोत, अशी घोषणा खा. जलील यांनी केली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद