शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

'छत्रपती संभाजीनगर' वरून मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवणार; इम्तियाज जलील यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 17:18 IST

ज्या शहराचा विकास ठप्प पडला आहे. ज्या शहरात आठ-आठ दिवसाला पाणी येते. त्या शहराच्या नामकरणावरून केवळ राजकारण सुरु आहे.

औरंगाबाद: शहराचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील प्रेमाने किंवा आदर असल्याने झाले नसून यात केवळ राजकीय स्वार्थ आहे. प्रथम शहराच्या विकासाचा मुद्दा महत्वाचा असून नामकरणाच्या विरोधात आणि अतिवृष्टी ग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एमआयएम आणि इतर समविचारी पक्ष औरंगाबाद दौऱ्यात काळे झेंडे दाखवणार, अशी घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी आज केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर खा. इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्या शहराचा विकास ठप्प पडला आहे. ज्या शहरात आठ-आठ दिवसाला पाणी येते. त्या शहराच्या नामकरणावरून केवळ राजकारण सुरु आहे. ज्यांना काही कामधंदा नसतो ते असे काम करतात. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव अशा राजकारणासाठी वापरू नये. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज कायम महान आहेत, राजकारण करणाऱ्यांनी त्यांच्या कार्याची उंची गाठावी, असे आवाहन खा. जलील यांनी केले. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी शहर विकास आधी असे जाहीर केले होते, पण सत्ता जाणार असे दिसताच नामकरण केले. त्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी हेच केले. आम्ही सुप्रीम कोर्टात हेच सांगणार आहोत. की छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेमामुळे नाव बदलेल नसून राजकीय कारण आहे, असेही जलील म्हणाले.

राज्यात दोघांचेच अद्भुत मंत्रीमंडळ  राज्यात अतिवृष्टी झाली आहे आणि राज्यात केवळ दोघांचेच अद्भुत मंत्रिमंडळ आहे. किमान कृषिमंत्री तरी नेमून अतिवृष्टीग्रस्तांना दिला द्यावा. शिंदे-फडणवीस यांना याचे काही देणेघेण नाही. यामुळेच अतिवृष्टी आणि शहर नामकरणावरून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहोत, अशी घोषणा खा. जलील यांनी केली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबाद