शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

नांदेड पॅटर्ननुसार बारावीची परीक्षा होईल का काॅपीमुक्त ?

By योगेश पायघन | Updated: February 21, 2023 14:21 IST

संवेदनशिल केंद्रावर ३ जणांचे तर प्रत्येक केंद्रावर दोघांचे बैठे पथक

औरंगाबाद : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत असून सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे सुरूच होते. वारंवार मुदतवाढ देवूनही विलंबाने तब्बल ४ हजार ६२१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याने विभागीय मंडळाला कसरत करावी लागली. तर भयमुक्त आणि काॅपीमुक्त परीक्षेसाठी विभागात तब्बल ४९ भरारी पथकांची विभागात स्थापना करण्यात आली आहे. तसेच महसुल यंत्रणेचे तालुकानिहाय १ भरारी आणि केंद्रनिहाय २ जणांचे बैठे पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहीती विभागीय सचिव विजय जोशी यांनी दिली.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्डाची लेखी परीक्षा नांदेडचा कॉपीमुक्त पॅटर्न नुसार घेण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे भरारी पथकासह, बैठे पथक आणि अन्य विविध विभागांच्या दहा पथकांचे नियोजन विभागीय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. विभागात ४३० केंद्रांवर १ लाख ६९ हजार ९८० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तणामुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षेसाठी वातावरण निर्मीतीसाठी परीक्षा केंद्र संचालकांच्या बैठका घेण्यात आल्या. सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील केंद्र संचालकांच्या बैठक पार पडली. परीक्षा केंद्रात ५० मिटरमध्ये परीक्षेशी संबंधीत कुणालाही प्रवेश देवू नये. परीक्षेतील गैरप्रकार केल्यावर उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावरील सुचना परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांना वाचुन दाखवण्यासह गैरप्रकार होणार नाही यासाठी प्रतिबंध उपयायोजना केल्या आहेत. अशी माहीती विभागीय मंडळाचे सचिव विजय जोशी दिली.

संवेदनशिल ४८ केंद्रावर स्वतंत्र पथकसंस्थाचालक, मुख्याध्यापक, केंद्र संचालकांना काॅपीमुक्त आणि निकोप वातावरणात परीक्षेसाठी सुचना दिल्या आहेत. महसुल विभाग, शिक्षण विभागाची भरारी व बैठे पथके परीक्षेवर नजर ठेवून असतील. तसेच संवेेदनशिल ४८ केंद्रावर ३ जणांचे बैठे पथक तसेच इतर केंद्रावर प्रत्येकी २ जणांचे बैठे पथक महसुल विभागाने नेमले आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. गैरप्रकार होणार नाही. यासाठी संस्था, शाळा, केंद्र संचालकांनी लक्ष द्यावे.-एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, औरंगाबाद

असे आहेत भरारी पथकेविभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालक, प्राथमिक, माध्यमिक, योजना शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, विद्या प्राधिकरण, डाएट, महिलांचे स्वतंत्र पथक असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर २ जणांचे बैठे पथक परीक्षेच्या आधी एक तास ते परीक्षेनंंतर एक तास उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

अशी आहे आकडेवारीजिल्हा -कॉलेज- परीक्षा केंद्र - परीक्षार्थीऔरंगाबाद ---४७०---१५७ --६०,९२६बीड ---२९८ ---१०१ -३९,१८५परभणी ---२३३---५९ ---२४,७०५जालना --- २३९ --८० ---३१,५००हिंगोली ---१२०--- ३३ ----१३,४८५एकूण -१,३६० ---४३०---१,६९,८०१

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाEducationशिक्षण