शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नांदेड पॅटर्ननुसार बारावीची परीक्षा होईल का काॅपीमुक्त ?

By योगेश पायघन | Updated: February 21, 2023 14:21 IST

संवेदनशिल केंद्रावर ३ जणांचे तर प्रत्येक केंद्रावर दोघांचे बैठे पथक

औरंगाबाद : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत असून सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे सुरूच होते. वारंवार मुदतवाढ देवूनही विलंबाने तब्बल ४ हजार ६२१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याने विभागीय मंडळाला कसरत करावी लागली. तर भयमुक्त आणि काॅपीमुक्त परीक्षेसाठी विभागात तब्बल ४९ भरारी पथकांची विभागात स्थापना करण्यात आली आहे. तसेच महसुल यंत्रणेचे तालुकानिहाय १ भरारी आणि केंद्रनिहाय २ जणांचे बैठे पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहीती विभागीय सचिव विजय जोशी यांनी दिली.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्डाची लेखी परीक्षा नांदेडचा कॉपीमुक्त पॅटर्न नुसार घेण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे भरारी पथकासह, बैठे पथक आणि अन्य विविध विभागांच्या दहा पथकांचे नियोजन विभागीय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. विभागात ४३० केंद्रांवर १ लाख ६९ हजार ९८० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तणामुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षेसाठी वातावरण निर्मीतीसाठी परीक्षा केंद्र संचालकांच्या बैठका घेण्यात आल्या. सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील केंद्र संचालकांच्या बैठक पार पडली. परीक्षा केंद्रात ५० मिटरमध्ये परीक्षेशी संबंधीत कुणालाही प्रवेश देवू नये. परीक्षेतील गैरप्रकार केल्यावर उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावरील सुचना परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांना वाचुन दाखवण्यासह गैरप्रकार होणार नाही यासाठी प्रतिबंध उपयायोजना केल्या आहेत. अशी माहीती विभागीय मंडळाचे सचिव विजय जोशी दिली.

संवेदनशिल ४८ केंद्रावर स्वतंत्र पथकसंस्थाचालक, मुख्याध्यापक, केंद्र संचालकांना काॅपीमुक्त आणि निकोप वातावरणात परीक्षेसाठी सुचना दिल्या आहेत. महसुल विभाग, शिक्षण विभागाची भरारी व बैठे पथके परीक्षेवर नजर ठेवून असतील. तसेच संवेेदनशिल ४८ केंद्रावर ३ जणांचे बैठे पथक तसेच इतर केंद्रावर प्रत्येकी २ जणांचे बैठे पथक महसुल विभागाने नेमले आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. गैरप्रकार होणार नाही. यासाठी संस्था, शाळा, केंद्र संचालकांनी लक्ष द्यावे.-एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, औरंगाबाद

असे आहेत भरारी पथकेविभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालक, प्राथमिक, माध्यमिक, योजना शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, विद्या प्राधिकरण, डाएट, महिलांचे स्वतंत्र पथक असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर २ जणांचे बैठे पथक परीक्षेच्या आधी एक तास ते परीक्षेनंंतर एक तास उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

अशी आहे आकडेवारीजिल्हा -कॉलेज- परीक्षा केंद्र - परीक्षार्थीऔरंगाबाद ---४७०---१५७ --६०,९२६बीड ---२९८ ---१०१ -३९,१८५परभणी ---२३३---५९ ---२४,७०५जालना --- २३९ --८० ---३१,५००हिंगोली ---१२०--- ३३ ----१३,४८५एकूण -१,३६० ---४३०---१,६९,८०१

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाEducationशिक्षण