शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

वनोद्यान ठरतेय दिवास्वप्नच!

By admin | Updated: May 13, 2014 01:11 IST

गंगाराम आढाव , जालना शहरात वन विभागाच्या वतीने सिंदखेडराजा मार्गावर समारे ५ हेक्टर जागेवर वन पर्यटन उद्यान उभारण्यात येत आहे.

गंगाराम आढाव , जालना शहरात वन विभागाच्या वतीने सिंदखेडराजा मार्गावर समारे ५ हेक्टर जागेवर वन पर्यटन उद्यान उभारण्यात येत आहे. मात्र, मागील वर्षभरापासून या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच दरेगाव शिवारातील वनोद्यानाच्या काम ही थंड झाले आहे. हे दोन्ही वनउद्यान जालनेकरांसाठी दिवास्वप्नच ठरत असल्याचे चित्र आहे. औरंगाबादसह इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्ह्यातील वनक्षेत्र कमीच आहे. मात्र, वनविभागाच्या अख्त्यारित असलेल्या जागेमध्ये वनउद्यान तयार करण्यासाठी प्रशासनानेच पुढाकार घेतला. जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी तसेच वन पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी शहरात दोन ठिकाणी वन उद्यान उभारण्यात येत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह वनअभ्यासकांना वनांमध्ये भटकंतीच्या अनुभवासह वन्यप्राणी, झाडे, वेली आदींचा अभ्यास करता येणार आहे. वन विभागाच्या वतीने दोन वर्षापूर्वी या उद्यानांची कामे हाती घेण्यात आली. या प्रकल्पातंर्गत वन विभागाने अनेक चांगली कामे केलेली आहेत. ५ हेक्टर वन क्षेत्रावर विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. तसेच पक्षी व वन्य प्राण्यांसाठी पानवठे तयार करण्यात आले आहेत. जॉगींग ट्रॅकसाठी कच्चे रस्ते तयार करण्यात आले. संपूर्ण निर्सगरम्य परिसर असल्याने हे उद्यान शहरवासिंयासाठी विरंगुळ्याचे साधन ठरेल असे वाटत होते. मात्र दोन वर्षाच्या काळात या उद्यानची कामे पाहिजे तशा गतीने झालेली नाहीत. त्यामुळे हे उद्यान जालनेकरांसाठी दिवास्वप्नच ठरणार की काय असा प्रश्न उभा राहत आहे. दरम्यान, उद्यानाच्या कामांसाठी आवश्यक तेवढा निधी अद्यापही प्राप्त झालेला नाही, त्यामुळे बहुतांश कामे रखडली आहेत. वन उद्यानांमधून अनेक मोठी आणि महत्वपूर्ण कामे करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. मात्र त्या तुलनेत निधीची कमतरता भासत आहे. आतापर्यंत या उद्यानांमध्ये जवळपास १५ लाख रुपयांची कामे झालेली असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन कासार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. या उद्यानांच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. या ठिकाणी उद्यानात लहान मुलांच्या खेळणीसह परिसरात सुशोभिकरण करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींसह वनअभ्यासकांतून होत आहे. दरेगावचेही काम ठप्प शहराजवळील दरेगाव परिसरात असलेल्या वनविभागाच्या जागेवर वन सुशोभिकरणाचा प्रकल्प राबविण्यात येत होता. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी पुढाकार घेत उद्योजक व लोकवर्गणीतून याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करत, विविध कामे केली. परिसरात पाणवठे व सौरदिवे बसविण्यात आले. मात्र मुंढे यांची बदली होताच या ठिकाणची कामेही थंडावली आहेत. या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन कासार म्हणाले की, या उद्यानाच्या विकासासाठी सन २०१४- १५ मध्ये २१ हजार लहान मोठ्या वृक्षांची लागवड केली जाणार आहेत. तसेच नाविण्यपूर्ण असा बगीचा तयार करण्यात येणार आहे. लागवड केलेल्या वृक्षांना ठिबक सिंचनपद्धीने पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह अन्य कामांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच उद्यान परिसरात वनकुटीचे बांधकाम करण्यात येत आहे.