शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
4
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
5
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
6
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
7
कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप
8
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
10
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती
11
ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल
12
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
13
'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल
14
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
15
"बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश’’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
16
Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ!
17
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
18
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
19
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
20
Viral Video: कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल

corona virus एवढे मृत्यू का ?; कारणे शोधण्यासाठी केंद्रीय पथक पुन्हा धडकले घाटी रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 15:31 IST

Death Audit Of Corona Patients in Aurangabad घाटीत डेथ ऑडिट कमिटीची बैठक कधी होते, त्यांची निरीक्षणे काय आहेत, याविषयी सविस्तर आढावा पथकाने घेतला.

ठळक मुद्दे पथकाचा प्रश्न : घाटी रुग्णांना नाकारत नाही का?घाटीचे उत्तर : नाही, प्रत्येक रुग्णाची व्यवस्था करतो

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या पथकाने शनिवारी घाटी रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. परंतु, रात्री उशिरा या पथकाला दिल्लीवरून फोन आला आणि ‘एका दिवसात एवढे मृत्यू का होत आहेत?’, ‘परत घाटीत जा, मृत्यूची कारणे शोधा’ अशी सूचना करण्यात आली. त्यामुळे रविवारी सकाळीच हे पथक पुन्हा घाटीत धडकले व त्यांनी घाटीतील डेथ ऑडिट कमिटीकडून रुग्णांच्या मृत्यूच्या परिस्थितीविषयी सविस्तर आढावा घेतला.

या अनुषंगाने घाटीत पार पडलेल्या बैठकीला डेथ ऑडिट कमिटीचे डाॅ. अनिल जोशी, डाॅ. एल. एस. देशमुख, मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, डाॅ. प्रभाकर जिरवणकर, डाॅ. कैलास चिंतळे, डाॅ. अविनाश लांब, डाॅ. प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते. घाटीत डेथ ऑडिट कमिटीची बैठक कधी होते, त्यांची निरीक्षणे काय आहेत, याविषयी सविस्तर आढावा पथकाने घेतला. घाटीत दर आठवड्याला ही बैठक घेतली जाते. घाटीतील १२५८ रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांच्या विश्लेषणातील काही बाबी पथकासमोर मांडण्यात आल्या. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब असे आजार असणाऱ्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण हे अधिक आहे. ही परिस्थिती सर्वत्रच असल्याचे पथकाने म्हटले.

घाटीत मराठवाड्यासह लगतच्या भागातून रुग्ण दाखल होतात, ही बाब समोर आल्यानंतर पथकाने, घाटीत रुग्णांना नाकारण्यात येत नाही का, असा प्रश्न केला. तेव्हा कोरोना रुग्णांनाच नव्हे, इतर कोणत्याही रुग्णाला नाकारले जात नाही. जशी होईल, तशी व्यवस्था केली जाते, असे घाटीकडून सांगण्यात आले.

अभ्यास करून अहवालकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कमी वयाच्या रुग्णांचा बळी जात आहे. संसर्ग झाल्यानंतर ३ ते ४ दिवसातच बरेचशे मृत्यू झाले. न्युमोनियाचे प्रमाण लवकर वाढत असल्याचे निरीक्षक पथकासमोर ठेवण्यात आले. घाटीने पथकाकडून सूचनांची विचारणा केली. परंतु या सगळ्यासंदर्भात अभ्यास करून अहवाल दिला जाईल, असे सांगण्यात आले.

रुग्णांच्या मृत्यूची काही कारणे...- कोरोनासह अन्य गंभीर आजार- अधिक वयोमान- ८० टक्के रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९० च्या खाली- गंभीर अवस्थेत रुग्ण रेफर होण्याचे प्रमाण अधिक- रुग्णालयात उशिरा दाखल होणे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू