शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

शिवसैनिक आता गप्प का ? सरकारच्या आशिर्वादाने पीक विमा कंपन्यांना ४,२३४ कोटींचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 19:29 IST

राज्यात गेल्या खरीप हंगामात १ कोटी ३८ लाख पैकी केवळ १५ लाख शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले.

ठळक मुद्देऔरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतून ३४ लाख १८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला १२७ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते.

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लूट करून खाजगी विमा कंपन्या मालामाल केल्या. विम्याचे निकष बदलवले, उंबरठा उत्पादन कमी केल्यामुळे राज्यात गेल्या खरीप हंगामात १ कोटी ३८ लाख पैकी केवळ १५ लाख शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले. सरकारच्या आशीर्वादाने विमा कंपन्यांना ४,२३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. या महाघोटाळ्यात वाटेकरी कोण, हे शोधण्याची गरज असून, फडणवीस सरकारमध्ये विमा कंपन्यांना जाब विचारणारी शिवसेना, शिवसैनिक आता गप्प का? असा सवाल भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस डाॅ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ते म्हणाले, खरीप २०१९ मध्ये राज्यात १ कोटी २८ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्याकरिता संपूर्ण विमा हप्त्यापोटी ४,७८८ कोटी रुपये भरण्यात आले होते. त्यावेळी ८५ लाख शेतकऱ्यांना ५,७९५ कोटी रुपयांचा पीक विमा प्राप्त झाला होता. तेव्हा विमा कंपन्या १,००७ कोटींनी तोट्यात होत्या. तरीही शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारण्यासाठी गेली होती. आता खरीप २०२० करिता उद्धव ठाकरे सरकारने विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी निकषामध्ये बदल केले. विमा कंपन्यांनी कृषी विभागासोबत हातमिळवणी करून केवळ १५ लाख शेतकऱ्यांना ९७४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई निश्चित केली. विमा कंपन्यांना ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने ४,२३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. आता शेतकऱ्यांचा कळवळा घेणारी शिवसेना शिवसैनिक गप्प का? असा बोचरा सवाल त्यांनी केला. यावेळी पीक विमाप्रश्नी खा. डॉ. भागवत कराड यांनी आंदोलनाचा इशारा दिला. आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे, कल्याण गायकवाड आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

औरंगाबाद विभागातून १,४३३ कोटींचा नफाऔरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतून ३४ लाख १८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, १२७ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. विमा कंपन्यांना १,४९० कोटी रुपये विमा हप्त्यापोटी कंपनीला प्राप्त झाले; परंतु औरंगाबाद विभागात ३४ लाख शेतकऱ्यांपैकी १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना ५५ कोटी ३० लाखांच्या विम्याची नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली. एकट्या औरंगाबाद विभागातून १,४३३ कोटी रुपये नफा कमावल्याचा दावा बोंडे यांनी केला. हवामानावर आधारित फळबाग विमा योजनेचे सर्व बदललेले निकष रद्द करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी