शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

शिवसैनिक आता गप्प का ? सरकारच्या आशिर्वादाने पीक विमा कंपन्यांना ४,२३४ कोटींचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 19:29 IST

राज्यात गेल्या खरीप हंगामात १ कोटी ३८ लाख पैकी केवळ १५ लाख शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले.

ठळक मुद्देऔरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतून ३४ लाख १८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला १२७ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते.

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लूट करून खाजगी विमा कंपन्या मालामाल केल्या. विम्याचे निकष बदलवले, उंबरठा उत्पादन कमी केल्यामुळे राज्यात गेल्या खरीप हंगामात १ कोटी ३८ लाख पैकी केवळ १५ लाख शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले. सरकारच्या आशीर्वादाने विमा कंपन्यांना ४,२३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. या महाघोटाळ्यात वाटेकरी कोण, हे शोधण्याची गरज असून, फडणवीस सरकारमध्ये विमा कंपन्यांना जाब विचारणारी शिवसेना, शिवसैनिक आता गप्प का? असा सवाल भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस डाॅ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ते म्हणाले, खरीप २०१९ मध्ये राज्यात १ कोटी २८ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्याकरिता संपूर्ण विमा हप्त्यापोटी ४,७८८ कोटी रुपये भरण्यात आले होते. त्यावेळी ८५ लाख शेतकऱ्यांना ५,७९५ कोटी रुपयांचा पीक विमा प्राप्त झाला होता. तेव्हा विमा कंपन्या १,००७ कोटींनी तोट्यात होत्या. तरीही शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारण्यासाठी गेली होती. आता खरीप २०२० करिता उद्धव ठाकरे सरकारने विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी निकषामध्ये बदल केले. विमा कंपन्यांनी कृषी विभागासोबत हातमिळवणी करून केवळ १५ लाख शेतकऱ्यांना ९७४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई निश्चित केली. विमा कंपन्यांना ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने ४,२३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. आता शेतकऱ्यांचा कळवळा घेणारी शिवसेना शिवसैनिक गप्प का? असा बोचरा सवाल त्यांनी केला. यावेळी पीक विमाप्रश्नी खा. डॉ. भागवत कराड यांनी आंदोलनाचा इशारा दिला. आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे, कल्याण गायकवाड आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

औरंगाबाद विभागातून १,४३३ कोटींचा नफाऔरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतून ३४ लाख १८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, १२७ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. विमा कंपन्यांना १,४९० कोटी रुपये विमा हप्त्यापोटी कंपनीला प्राप्त झाले; परंतु औरंगाबाद विभागात ३४ लाख शेतकऱ्यांपैकी १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना ५५ कोटी ३० लाखांच्या विम्याची नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली. एकट्या औरंगाबाद विभागातून १,४३३ कोटी रुपये नफा कमावल्याचा दावा बोंडे यांनी केला. हवामानावर आधारित फळबाग विमा योजनेचे सर्व बदललेले निकष रद्द करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी