शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

‘घाटी’मध्ये का आहे चिंताजनक परिस्थिती? रुग्णालयावर वाढला भर, सुविधा मात्र अपुऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 06:12 IST

घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ रुग्णांचा मृत्यू झाला.

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ रुग्णांचा मृत्यू झाला. हे आकडे चिंता व्यक्त करणारे आहेत. प्रत्येक मृत्यूसाठी वेगवेगळे कारण आहे; मात्र घाटी रुग्णालयात ही परिस्थिती का येत आहे, यावर विचारमंथन करण्याची वेळ आली आहे, असे ‘घाटी’तील डाॅक्टरांनीच सांगितले.

घाटी रुग्णालयात मंगळवारी अधिष्ठाता डाॅ.संजय राठोड, वैद्यकीय अधीक्षक डाॅ.विजय कल्याणकर,  शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड, सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डाॅ.सुधीर चौधरी यांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली.

यावेळी घाटीतील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. एक हजार रुग्णांमागे नऊ रुग्णांचा मृत्यू ही सामान्य बाब आहे. दोन हजार रुग्णांमागे १८ पेक्षा अधिक मृत्यू झाले तर काही तरी चुकते, असे गृहीत धरावे, असे बैठकीत घाटीतील डाॅक्टरांनी म्हटले.

हे आहे वास्तव

१,१७७ खाटा, प्रत्यक्षात २ हजारांपर्यंत रुग्ण भरती.

मनुष्यबळ मंजूर खाटांनुसार. अनेक पदे रिक्त.

घाटी टर्शरी केअर सेंटर आहे. येथे गंभीर रुग्ण येणे अपेक्षित; परंतु सामान्य रुग्णांचाही भार आहे.

ग्रामीण भागासह मराठवाड्यातून गंभीर रुग्ण रेफर.

सामान्य प्रसूतीचा भार. रोज ५० ते ७० प्रसूती. 

रिकव्हरी रेट अधिक

रुग्णालयात २४ तासांत १४ रुग्णांचे मृत्यू झाले. अत्यवस्थ आणि रेफर रुग्ण अधिक आहेत. रुग्णालयात रिकव्हरी रेट अधिक आहे. मृत्यूचे प्रमाण अगदी कमी आहे. औषधांअभावी अथवा कोणाच्या हलगर्जीमुळे रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.

- डाॅ. संजय राठोड, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)