शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

अपयशाचे आत्मकथन का नाही?

By admin | Updated: June 27, 2017 01:04 IST

औरंगाबाद : ‘आत्मकथन हा साहित्य प्रकार फार संवदेनशील आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आत्मकथन हा साहित्य प्रकार फार संवदेनशील आहे. स्वत:चे आयुष्य पुन्हा एकदा जगून स्वत:ला सोलण्याची प्रकिया अत्यंत क्लिष्ट असते. त्यामध्ये केवळ यश आणि कीर्तीचे वर्णन करून चालत नाही. अपयशाची गाथा सांगणारे आत्मकथनसुद्धा असावे. ते कोणी फारसे लिहिताना दिसत नाही, असा मुद्दा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी उपस्थित केला. डॉ. वासुदेव मुलाटेलिखित ‘झाकोळलेल्या वाटा’ या पुस्तकावरील परिसंवादामध्ये ते बोलत होते.महसूल प्रबोधिनी सभागृहात सोमवारी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. रा.रं. बोराडे होते. या आत्मकथनपर पुस्तकावर भाष्य करताना प्राचार्य डॉ. महेंद्र कदम म्हणाले की, आजच्या तरुणामध्ये कष्ट करण्याची तयारी नाही. झटपट यशस्वी होऊन पैसे कमविण्याची सर्वांची इच्छा आहे. परिस्थितीशी झगडून दोन हात करण्याच्या आपल्यामध्ये दडलेल्या उमेदीला जागृत करण्याची प्रेरणा मुलाटेंच्या लिखाणातून मिळेल.प्रा. जयदेव डोळे म्हणाले की, दु:ख न सांगण्याची भारतीय लोकांची परंपरा आहे. रोजच्या जगण्यातील जनसामान्यांचे अनुभवविश्व टिपून त्याचे संचित पुढील पीढीपर्यंत पोहोचत नाही. हे अनुभव खूप काही शिकवण देऊ शकतात.अध्यक्षीय समारोप करताना बोराडे म्हणाले की, आशयसंपन्न साहित्य केवळ माणसाच्या जगण्याचा इतिहास नसतो. ते त्या काळातील परिस्थिती, व्यवस्था आपल्यासमोर उभी करते. डॉ. मुलाटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माणसाला आपले दु:ख कोणाला तरी सांगायचे असते. ते ऐकण्यासाठी मात्र सहसंवेदनशील माणूस मिळाला पाहिजे. प्रिया धारूरकर यांनी सूत्रसंचालन केले.