शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
3
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
4
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
5
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
7
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
8
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
9
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
12
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
13
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
14
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
15
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
16
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
17
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
18
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
19
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
20
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
Daily Top 2Weekly Top 5

अपयशाचे आत्मकथन का नाही?

By admin | Updated: June 27, 2017 01:04 IST

औरंगाबाद : ‘आत्मकथन हा साहित्य प्रकार फार संवदेनशील आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘आत्मकथन हा साहित्य प्रकार फार संवदेनशील आहे. स्वत:चे आयुष्य पुन्हा एकदा जगून स्वत:ला सोलण्याची प्रकिया अत्यंत क्लिष्ट असते. त्यामध्ये केवळ यश आणि कीर्तीचे वर्णन करून चालत नाही. अपयशाची गाथा सांगणारे आत्मकथनसुद्धा असावे. ते कोणी फारसे लिहिताना दिसत नाही, असा मुद्दा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी उपस्थित केला. डॉ. वासुदेव मुलाटेलिखित ‘झाकोळलेल्या वाटा’ या पुस्तकावरील परिसंवादामध्ये ते बोलत होते.महसूल प्रबोधिनी सभागृहात सोमवारी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. रा.रं. बोराडे होते. या आत्मकथनपर पुस्तकावर भाष्य करताना प्राचार्य डॉ. महेंद्र कदम म्हणाले की, आजच्या तरुणामध्ये कष्ट करण्याची तयारी नाही. झटपट यशस्वी होऊन पैसे कमविण्याची सर्वांची इच्छा आहे. परिस्थितीशी झगडून दोन हात करण्याच्या आपल्यामध्ये दडलेल्या उमेदीला जागृत करण्याची प्रेरणा मुलाटेंच्या लिखाणातून मिळेल.प्रा. जयदेव डोळे म्हणाले की, दु:ख न सांगण्याची भारतीय लोकांची परंपरा आहे. रोजच्या जगण्यातील जनसामान्यांचे अनुभवविश्व टिपून त्याचे संचित पुढील पीढीपर्यंत पोहोचत नाही. हे अनुभव खूप काही शिकवण देऊ शकतात.अध्यक्षीय समारोप करताना बोराडे म्हणाले की, आशयसंपन्न साहित्य केवळ माणसाच्या जगण्याचा इतिहास नसतो. ते त्या काळातील परिस्थिती, व्यवस्था आपल्यासमोर उभी करते. डॉ. मुलाटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माणसाला आपले दु:ख कोणाला तरी सांगायचे असते. ते ऐकण्यासाठी मात्र सहसंवेदनशील माणूस मिळाला पाहिजे. प्रिया धारूरकर यांनी सूत्रसंचालन केले.