शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जिल्हा परिषदेच्या कारभारात आमदार, खासदारांची लुडबुड कशाला? विरोध करताच टक्केवारीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 19:54 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य संघटनेचे अध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापतींचा पलटवार

औरंगाबाद : जिल्हा नियोजन समितीमध्ये सर्वाधिक जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. समितीने दिलेल्या निधीतून विकासकामांचे नियोजन करण्याचा अधिकार केवळ जिल्हा परिषदेला आहे. तरीही जिल्ह्यातील आमदार, खासदार जिल्हा परिषदेच्या निधीतून विकासकामे करण्यासाठी पालकमंत्र्यांमार्फत जिल्हा परिषदेवर दबाव टाकत आहेत. निधीसाठी खासदार, आमदारांची वाढलेली लुडबुड आम्ही अमान्य करताच टक्केवारी मागितल्याचा आरोप होत आहेत, असा पलटवार जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण आणि आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी केला.

जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती किशोर बलांडे यांनी विकासनिधी देण्यासाठी पाच टक्के कमिशन मागितल्याचा खळबळजनक आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी (दि. २१) केला. याविषयी बोलताना गलांडे म्हणाले की, खासदार यांनी बांधकाम व अर्थ सभापती बलांडे यांच्यावर केलेल्या आरोपांची बातमी वाचली. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून ग्रामीण रस्त्यांचा विकास करण्यासंदर्भातील लेखाशीर्ष जिल्हा परिषदेकडे शासनाने वर्ग केल्यापासून आमदार, खासदारांची जिल्हा परिषदेच्या नियोजनात लुडबुड वाढली आहे. वास्तविक डीपीसीने मंजूर केलेला निधी खर्च करण्याचे अधिकार केवळ जिल्हा परिषदेला आहेत. मात्र आमदार, खासदार यांतूनही निधी मागत आहेत.

यासाठी ते पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निधीसाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकतात. त्यांनी सुचविलेल्या कामाला निधी द्यावा, यासाठी त्यांचा आग्रह असतो. मात्र जिल्हा परिषदेला मिळणारा निधीच हा अत्यल्प असतो. सर्व सदस्यांना त्यांच्या सर्कलअंतर्गत विकासकामे करायची असतात. याकरिता ते विविध समित्यांकडे शिफारस करतात. त्यांच्या शिफारशी मान्य करताना आमदार, खासदारांना त्यांच्या मागणीप्रमाणे निधी देता येत नाही, हे वास्तव आहे. मात्र कमी निधी मिळाला म्हणून जिल्हा परिषदेला बदनाम करण्याचा प्रकारही होत असल्याचा आरोप बलांडे यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद