शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

औरंगाबाद मनपा आयुक्तपदी आता कोण येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 18:12 IST

औरंगाबाद महापालिकेत कोणाचीही वर्णी लावण्यात आली नाही. प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांची पुण्याला जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आल्याने त्यांनीही सोमवारीच शहराला गुडबाय केले.

ठळक मुद्देशहरात कचऱ्याची परिस्थिती गंभीर असतानाही राज्य शासन महापालिकेला स्वतंत्र आयुक्त देण्यास तयार नाही. सोमवारी राज्यातील २५ पेक्षा अधिक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

औरंगाबाद : शहरात कचऱ्याची परिस्थिती गंभीर असतानाही राज्य शासन महापालिकेला स्वतंत्र आयुक्त देण्यास तयार नाही. सोमवारी राज्यातील २५ पेक्षा अधिक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, औरंगाबाद महापालिकेत कोणाचीही वर्णी लावण्यात आली नाही. प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांची पुण्याला जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आल्याने त्यांनीही सोमवारीच शहराला गुडबाय केले.

महापालिकेत महिला आयुक्ताची नेमणूक केल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगलेली असताना सायंकाळपर्यंत मनपाला यासंदर्भात कोणतेच आदेश प्राप्त झाले नव्हते. शहरात कचराकोंडीची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांचा पदभार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून राम मनपाचा कारभार पाहत होते. सोमवारी सकाळी महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होती. सभेत आयुक्त म्हणून राम पाणीप्रश्नावर प्रशासनाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करीत असताना शासनाकडून त्यांना बदलीची माहिती देण्यात आली. त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना विनंती करून सभागृह सोडले.

औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. चव्हाण यांच्याकडेच मनपाचा अतिरिक्त कार्यभार राहणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. मंगळवारी राज्यातील आणखी काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे कळते. या बदल्यांच्या सत्रात औरंगाबाद महापालिकेला आयुक्त मिळेल, असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. सोमवारी दिवसभर मनपा आयुक्तपदी महिला आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. रात्री उशिरापर्यंत मनपाला अशी कोणतीही आॅर्डर प्राप्त झालेली नव्हती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादState Governmentराज्य सरकार