शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

खरंच कुणी कापली वेणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:01 IST

मागील पंधरा दिवसांत शहरात तीन ठिकाणी महिला आणि मुलींचे केस कापण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील पंधरा दिवसांत शहरात तीन ठिकाणी महिला आणि मुलींचे केस कापण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. काही घरांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे. भर बाजारपेठेत एखाद्या महिलेची वेणी कापली जाऊ शकते का, एखाद्या ठिकाणी माणसांची वर्दळ असलेल्या घरांत एखाद्या मुलीचे केस कापले जाऊ शकतात का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. तीन घटनांमध्ये ज्या महिला आणि मुलींचे केस कापले गेले त्यामध्ये प्रामुख्याने केस मानेच्या बाजूने कापले गेल्याचे दिसले. केस कापले गेल्याचे वास्तव आहे. मात्र, हे केस कोणी कापले, हे या घटनेतील महिला आणि पोलिसांना सांगता आले नाही. ‘केस कोणी कापले हे आम्हाला माहीत नाही,’ असेच उत्तर या महिला आणि मुलींनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. या सर्व प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत. केस कापल्याच्या घटनेमागे नेमके कोण असावे, काय कारण असावे, पोलीस, मानसशास्त्रज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते याबाबत काय म्हणतात, यासंबंधी घेतलेला हा आढावा.कुटुंबाच्या सहकार्याने कारण शोधता येईल : अविनाश पाटीलमुलींच्या वेण्या कापण्याचे प्रकार वाढत आहेत; पण त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. संबंधित मुलीने, तिच्या कुटुंबियांनी व प्रशासनाने जर सहकार्य केले, तर महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती या घटनांमागील कारण नक्की शोधून काढेल, असा विश्वास या समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केला.यासंदर्भात त्यांनी सांगितले की, या अशा घटनांमुळे भीती नको, घाबरून जाऊ नये. या अशा भयग्रस्त घटनांची लागण होऊन मालिका तयार होते. या मागचे कार्यकारणभाव शोधता येते; पण त्यासाठी संबंधित मुलीने, कुटुंबाने व प्रशासनाने सहकार्य देण्याची गरज आहे. या घटनांना चमत्कार किंवा अद्भुत घडतंय असं म्हणून अधिक हवा दिली जाते. अतिरंजित वर्णन केले जाते. या मागचे कारण शोधून समुपदेशन करता येऊ शकते.आत्मा आपोआप काही तरी घडवतो ही समजूत : शाम मानववेणी कापण्याचा प्रकार हा भानामतीचा (पोल्टेरसीस्ट फेनोमेना) प्रकार समजला जातो. आत्मा आपोआप काही तरी घडवीत असतो, अशी यात समजूत असते आणि याची एक दहशत असते. आत्माच इकडची भांडी तिकडे करतो, अन्नात विष्ठा मिसळवतो, वेणी कापतो, अशा समजुती विदर्भ, मराठवाडा आणि हिंदी भाषक प्रदेशांमध्ये अधिक रूढ आहेत; पण अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशी शंभर प्रकरणे हाताळली.तेव्हा त्या सर्वांची उत्तरे मिळालेली आहेत, असे ठामपणे या समितीचे नेते श्याम मानव यांनी सांगितले.ते म्हणाले, ब्लेड, कैची, चाकू याशिवाय वेणी कापता येऊ शकत नाही. किड्या-मुंग्यांचे हे काम नाही, तर माणूसच हे काम करू शकतो. मी १९८७ साली ‘शोध भानामतीचा’ हे पुस्तक लिहिले आहे. हवा तर पोलिसांनी या पुस्तकाच्या आधारे आपला तपास सुरू करावा, वेणी कापण्याचे कारण नक्की समजल्याशिवाय राहणार नाही.