शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

औरंगाबादमधील 'त्या' सहा जणांचे मारेकरी कोण ?  खबरे तुटले, खुनांचा तपास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 13:44 IST

खबरे हे पोलिसांचे कान आणि डोळे असल्याचे म्हटले जाते. मात्र, अलीकडच्या काळात पोलीस अधिकारी केवळ नोकरी करायची म्हणून करीत असल्याने खबर्‍यांची साखळी तुटून पडली. त्याचा परिणाम खुनाच्या घटनांच्या तपासावर झाल्याचे दिसून येते. आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या सहा गुन्ह्यांच्या तपासाच्या फाईल पोलिसांनी बंद केल्या आहेत.

औरंगाबाद : खबरे हे पोलिसांचे कान आणि डोळे असल्याचे म्हटले जाते. मात्र, अलीकडच्या काळात पोलीस अधिकारी केवळ नोकरी करायची म्हणून करीत असल्याने खबर्‍यांची साखळी तुटून पडली. त्याचा परिणाम खुनाच्या घटनांच्या तपासावर झाल्याचे दिसून येते. आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या सहा गुन्ह्यांच्या तपासाच्या फाईल पोलिसांनी बंद केल्या आहेत.

शेळीपालन करणारी अमिनाबीमाळीवाडा येथे राहणार्‍या अमिनाबी पठाण यांचा खून होऊन चार वर्षे होत आहेत. गुन्हे शाखा पोलिसांसह छावणी पोलिसांनी केलेल्या तपासात गायकवाड नावाचा एक तरुण या हत्येमागे असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले. घटनेपासून तो पसार आहे. काही दिवसांपूर्वी तो वैजापूर येथील एका उसाच्या फडात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  गुन्हे शाखेचे पोलीस तेथे पोहोचण्याआधी वैजापूर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. मात्र, वैजापूर पोलिसांनाही चकमा देऊन तो तेथून पसार झाला होता. आठ महिन्यांपासून त्याचा कोणताही सुगावा लागला नाही. 

अनोळखी महिलेचा खून...दौलताबादच्या जंगलात सहा महिन्यांपूर्वी एका अज्ञात महिलेचा खून करून फेकलेले प्रेत पोलिसांना सापडले होते. प्रेत सापडले तेव्हा ते कुजलेल्या अवस्थेत होते. परिणामी  आजपर्यंत पोलिसांना मृत महिलेची ओळख पटविता आली नाही. आधार कार्डवरून तिची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. कुजलेल्या प्रेताचे ठसे आधारलिंकशी जुळले नाही. मोपेडस्वाराने त्या महिलेला तेथे आणले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. नंतर मात्र तपास थांबला तो आजपर्यंत.

धनई यांच्या खुनाला सहा महिने पूर्णदिनकर धनई ( रा. शिवशाहीनगर) यांचा खून करून प्रेत जुना मोंढा परिसरातील काळीबावडीजवळ  २९ जुलै रोजी पोत्यात आढळले होते. दुकानमालकाचे १५ हजार रुपये घेऊन ते मोपेडने बँकेत गेले होते. तेव्हापासून ते गायब झाले होते. तीन दिवसांनंतर खुनाची घटना समोर आली. जिन्सी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला. तपासात मृताची मोपेड रेल्वेस्टेशन रोडवर सापडली होती. तेथून पुढे तपास सरकलाच नाही. 

आरोपी अटकेत मात्र...हॉटेल आणि प्लॉटिंग व्यावसायिक हुसेन खान अलियार खान ऊर्फ शेर खान (५५, रा. पेन्शनपुरा, छावणी) यांचा २७ डिसेंबरच्या रात्री छावणी परिसरात खून करण्यात आला. या घटनेप्रकरणी मृताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. मात्र, त्यांनी खून कसा केला, याबाबतची माहिती मात्र पोलिसांना दिली नाही. यामुळे हा खून अटकेतील आरोपींनीच केला अथवा अन्य कोणी हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. 

श्रुती भागवत खून प्रकरण

१९ एप्रिल २०१२ रोजी पहाटे शिक्षिका श्रुती भागवत यांची हत्या अज्ञातांनी केली. जवाहरनगर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासह राजेंद्र सिंह नंतर अमितेश कुमार या पोलीस आयुक्तांनी त्यांच्या कार्यकाळात एसआयटी स्थापन करून तपास केला, तेव्हा दौलताबाद येथील एका मृत संशयितापर्यंत पोलीस पोहोचले आणि तेथून तपास पुढे गेलाच नाही.

अंकुश खाडे खून प्रकरण...बाळापूर येथील दूध विक्रेता अंकुश खाडे यांची गोळी झाडून अज्ञातांनी हत्या केली. बीड बायपास परिसरातील गुरू लॉन्समागील मोकळ्या जागेवर त्याचे प्रेत सापडले होते. या घटनेला आज चार ते साडेचार वर्षे झाले. या खुनाचा तपास करीत असताना गुन्हे शाखा पोलीस शिवाजीनगर येथील एका महिलेपर्यंत गेले होते. मात्र, तिचा या हत्येशी काहीही संबंध नसल्याचे समजले. नंतर आरोपी सापडत नाही, असा शेरा मारून तपास बंद केला.