शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

मोबाईल सेवेचे नियंत्रण कुणाकडे; कोट्यवधींची उलाढाल मात्र कारभार हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 17:50 IST

ग्राहक संख्या, वसुलीचे रेकॉर्ड ट्रायच्या आधिपत्याखाली 

ठळक मुद्दे रक्कम अदा करूनही सेवा मिळत नसल्यामुळे ग्राहक संतापले आहेत. 

औरंगाबाद : महापालिकेने मोबाईल कंपन्यांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी टॉवर्स सील करण्याची मोहीम हाती घेऊन चार दिवस झाले आहेत. या काळात शहरातील २०० हून अधिक मोबाईल कंपन्यांचे टॉवर्स सील करण्यात आल्याने दररोज ७ ते ८ लाखांपर्यंत फोन ट्रान्झॅक्शन्स थांबले आहे. मोबाईल ग्राहकांची नेटवर्कअभावी कुचंबणा होत असून, विविध कंपन्यांकडून प्रीपेड आणि पोस्टपेड सेवा घेण्यासाठी दरमहा कोट्यवधी रुपयांची रक्कम अदा करूनही सेवा मिळत नसल्यामुळे ग्राहक संतापले आहेत. 

याबाबत तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न असून सगळा कारभार हवेत असल्याप्रमाणे झाले आहे. महाराष्ट्र आणि गोव्यासाठी ट्रायचे कार्यालय बंगळुरू येथे आहे, तर मुंबई, पुणे एक उपकार्यालय असल्याचे टेलिफोन रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय)च्या संकेतस्थळावर दिसते आहे. राज्यातील सहा विभागांतील मोबाईल ग्राहकांची संख्या, त्यातून बिलापोटी मिळणारी रक्कम किती, याची सगळी माहिती ट्रायच्या प्रादेशिक कार्यालयाकडेच मिळेल, बीएसएनएलकडेदेखील याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बहुतांश कंपन्यांनी  मोबाईल सेवेसाठी लागणारी सर्व यंत्रणा आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून उभी केली आहे. त्यामुळे कंपन्यांना दरमहा मिळणारा महसूल किती, वार्षिक उलाढाल किती होती, त्या तुलनेत सेवा कशी मिळते, याची कुठलीही माहिती जिल्हा पातळीवर नाही. 

सात ते आठ कंपन्यांची सेवा रिलायन्स जीओ, बीएसएनएल, वोडाफोन, टाटा, आयडिया, एअरटेल व इतर काही कंपन्यांचे ५९५ मोबाईल टॉवर्स शहरात आहेत. या सर्व कंपन्यांचे मिळून सुमारे १५ लाखांच्या आसपास ग्राहक शहरात असल्याचा प्राथमिक अंदाज बीएसएनएलच्या सूत्रांनी वर्तविला. यापैकी ८० टक्के ग्राहक प्रीपेड सेवा घेणार आहेत, तर २० टक्के ग्राहक पोस्टपेड सेवा घेणारे असू शकतील. ट्रायच्या अखत्यारीत सर्व डाटा असल्यामुळे त्याबाबत ठामपणे काही सांगता येणार नाही. मोबाईल नेटवर्क, टॉवर्स सेवा याबाबत ट्रायने नियुक्त केलेल्या संस्थांचे प्रतिनिधी दर सहा महिन्यांनी देशभर पाहणी करून अहवाल देत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :MobileमोबाइलAurangabadऔरंगाबादInternetइंटरनेट