शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिकावे की नाही; ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती मिळणार तरी कधी?

By विजय सरवदे | Updated: October 19, 2023 12:09 IST

मागील शैक्षणिक वर्षातील साडेचार हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

छत्रपती संभाजीनगर : कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची; परंतु शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही, ही जिद्द बाळगून शहरात शिक्षणासाठी आलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. दुसरे शैक्षणिक वर्ष अर्ध्यावर आले तरीही या विद्यार्थ्यांना अद्याप मागील वर्षातील स्वाधार शिष्यवृत्तीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. सध्या समाजकल्याण विभागात सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या ‘स्वाधार’ अर्जांची छाननी सुरू आहे.

इयत्ता अकरावी, बारावी याशिवाय व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्चशिक्षण घेत असलेले मागासवर्गीय विद्यार्थी जे शासकीय किंवा महाविद्यालयीन वसतिगृहाच्या प्रवेशापासून वंचित आहेत, अशा विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. किरायाने राहत असलेल्या अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी साधारपणे ५१ हजार रुपयांपर्यंत स्वाधार शिष्यवृत्ती दिली जाते.

समाजकल्याण विभागाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गेल्या महिन्यात या योजनेसाठी ५ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून सन २०२०-२१, २१-२२ आणि २२-२३ या वर्षातील पात्र १२७० विद्यार्थ्यांना स्वाधार शिष्यवृत्तीचा लाभ दिला. शासनाकडून जसा निधी प्राप्त होतो, त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. सध्या गेल्या शैक्षणिक वर्षातील (सन २०२२-२३) सुमारे ४५०० विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून, त्याची छाननी सुरू आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत छाननी पूर्ण होऊन पात्र विद्यार्थ्यांच्या याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. यासाठी २२ ते २३ कोटींचा निधी अपेक्षित आहे.

जात प्रमाणपत्र रहिवासी पुरावा समजू नयेअनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी येथे आल्यानंतर त्यांनी जातीचे प्रमाणपत्र काढले आहे. मात्र, जात प्रमाणपत्र हेच रहिवासी प्रमाणपत्र समजून त्यांना शिष्यवृत्तीपासून अपात्र ठरविले जाते. त्यामुळे जात प्रमाणपत्रास रहिवासी पुरावा समजू नये. महापालिका हद्दीपासून ५ किलोमीटरपर्यंतच्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे, असा नियम सांगून अनेकांना अपात्र ठरविले जाते. तसे न करता तत्कालीन समाजकल्याण मंत्र्यांनी २० किलोमीटरची मर्यादा वाढविली आहे. त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी विद्यार्थी कार्यकर्ता राहुल मकासरे यांनी केली आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्ती