शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिकावे की नाही; ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती मिळणार तरी कधी?

By विजय सरवदे | Updated: October 19, 2023 12:09 IST

मागील शैक्षणिक वर्षातील साडेचार हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

छत्रपती संभाजीनगर : कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची; परंतु शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही, ही जिद्द बाळगून शहरात शिक्षणासाठी आलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. दुसरे शैक्षणिक वर्ष अर्ध्यावर आले तरीही या विद्यार्थ्यांना अद्याप मागील वर्षातील स्वाधार शिष्यवृत्तीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. सध्या समाजकल्याण विभागात सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या ‘स्वाधार’ अर्जांची छाननी सुरू आहे.

इयत्ता अकरावी, बारावी याशिवाय व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्चशिक्षण घेत असलेले मागासवर्गीय विद्यार्थी जे शासकीय किंवा महाविद्यालयीन वसतिगृहाच्या प्रवेशापासून वंचित आहेत, अशा विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. किरायाने राहत असलेल्या अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी साधारपणे ५१ हजार रुपयांपर्यंत स्वाधार शिष्यवृत्ती दिली जाते.

समाजकल्याण विभागाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गेल्या महिन्यात या योजनेसाठी ५ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून सन २०२०-२१, २१-२२ आणि २२-२३ या वर्षातील पात्र १२७० विद्यार्थ्यांना स्वाधार शिष्यवृत्तीचा लाभ दिला. शासनाकडून जसा निधी प्राप्त होतो, त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. सध्या गेल्या शैक्षणिक वर्षातील (सन २०२२-२३) सुमारे ४५०० विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून, त्याची छाननी सुरू आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत छाननी पूर्ण होऊन पात्र विद्यार्थ्यांच्या याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. यासाठी २२ ते २३ कोटींचा निधी अपेक्षित आहे.

जात प्रमाणपत्र रहिवासी पुरावा समजू नयेअनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी येथे आल्यानंतर त्यांनी जातीचे प्रमाणपत्र काढले आहे. मात्र, जात प्रमाणपत्र हेच रहिवासी प्रमाणपत्र समजून त्यांना शिष्यवृत्तीपासून अपात्र ठरविले जाते. त्यामुळे जात प्रमाणपत्रास रहिवासी पुरावा समजू नये. महापालिका हद्दीपासून ५ किलोमीटरपर्यंतच्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे, असा नियम सांगून अनेकांना अपात्र ठरविले जाते. तसे न करता तत्कालीन समाजकल्याण मंत्र्यांनी २० किलोमीटरची मर्यादा वाढविली आहे. त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी विद्यार्थी कार्यकर्ता राहुल मकासरे यांनी केली आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्ती