शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आलेले पाणी मुरतय कोठे..?

By admin | Updated: April 19, 2016 01:19 IST

लातूर शहरात एकूण ३५ प्रभाग आहेत़ प्रत्येक प्रभागाला २ टँकरने मनपा ८ दिवसाआड पाणी देते़ तर स्थानिक स्त्रोतातून तसेच रेल्वेचे आलेले पाणी उचलण्यासाठी

लातूर शहरात एकूण ३५ प्रभाग आहेत़ प्रत्येक प्रभागाला २ टँकरने मनपा ८ दिवसाआड पाणी देते़ तर स्थानिक स्त्रोतातून तसेच रेल्वेचे आलेले पाणी उचलण्यासाठी २० हजार व १२ हजार लिटर क्षमतेचे ६० टँकर आहेत़ ६ हजार लिटर क्षमतेच्या ७० टँकरने पाणी पुरवठा केला जातोे़ निम्न तेरणा, डोंगरगाव, साई-नागझरी, बॅरेजेसमधून दिवसाला किमान ४० लाख लिटर आणि रेल्वेचे ५ लाख लिटर असे ४५ लाख लिटर पाणी संकलित होते़ टँकरने ८ दिवसाला पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर शहराला ४० लाख लिटर पाण्याची दिवसाला गरज आहे़ यापेक्षा अधिक पाणी संकलित होते़ परंतू वितरण व्यवस्थेत दोष आहेत़ त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही़ परिणामी कुठल्या प्रभागात १२ दिवसाला तर कोठे १५ दिवसाला पाणी मिळते़ यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ मोठ्या प्रमाणात पाणी उचलूनही आम्हाला पाणी का मिळत नाही असा प्रश्न ‘लोकमत’ ने केलेल्या सर्व्हे दरम्यान नागरिकांनी उपस्थित केला़ शहरातील प्रभाग २, ३, ४, ५, ६, ८, ९, १३, १६, २१, २८, ३१, ३२, ३३ आदी प्रभागात ‘लोकमत’ चमुने नागरिकांची मते जाणून घेतली असता टँकर कधी येते तर कधी नाही़ कुठे बारा दिवसातून २०० लिटर पाणीमिळते तर कुठे ते ही दिले जात नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ २०० लिटर का असेना किमान ५ दिवसाला पाणी मिळावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. पाणी वाढल्यावरही ३५ प्रभागाला ७० टँकर कसे पुरतात ? आता टँकर वाढवून प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळेल, अशी व्यवस्था का नाही? असा सूर नागरिकांमधून आहे. पण मनपा लक्ष देईल काय ? दररोज ३५ लाख लिटर पाणी शहरात येत आहे. परंतु, नागरिकांना केवळ २५ लाख लिटर पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे प्रति कुटुंब दहा ते बारा दिवसाला २०० लिटर पाणी दिले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही वाटपाच्या महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाणी प्रमाणापेक्षा कमी उपलब्ध होत आहे. ४महसूल मंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे शहराला रेल्वेद्वारे ५० लाख लिटर व निम्न तेरणेतून ५० लाख लिटर पाणी दररोज उपलब्ध झाल्यास शहराला नळाने पाणी देणे शक्य आहे. महापालिकेने नळाने पाणी देण्याचे नियोजन करावे. जेणेकरून उपलब्ध पाणी समान वाटप होईल. नागरिकांचा संताप कमी होण्यास मदत होईल, असे नगरसेवक शैलेश स्वामी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.ज्या नगरात पाणी वाटप केले जात आहे, त्याची नोंद मनपा कार्यालयात केली जाते. शिवाय, ज्या नगरात पाणीपुरवठा केला आहे, तेथील चार लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. नियमानुसार सर्वांनाच २०० लिटर पाणी दिले जात आहे. तक्रार असल्यास त्याची चौकशीही केली जाते. अधिकचे पाणी देण्याची मागणी आहे. त्यावर मात्र निर्णय नसल्याचे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले.