शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
4
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
5
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
6
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
7
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
8
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
9
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
10
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
12
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
13
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
14
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
15
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
16
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
17
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
18
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
19
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
20
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक

आलेले पाणी मुरतय कोठे..?

By admin | Updated: April 19, 2016 01:19 IST

लातूर शहरात एकूण ३५ प्रभाग आहेत़ प्रत्येक प्रभागाला २ टँकरने मनपा ८ दिवसाआड पाणी देते़ तर स्थानिक स्त्रोतातून तसेच रेल्वेचे आलेले पाणी उचलण्यासाठी

लातूर शहरात एकूण ३५ प्रभाग आहेत़ प्रत्येक प्रभागाला २ टँकरने मनपा ८ दिवसाआड पाणी देते़ तर स्थानिक स्त्रोतातून तसेच रेल्वेचे आलेले पाणी उचलण्यासाठी २० हजार व १२ हजार लिटर क्षमतेचे ६० टँकर आहेत़ ६ हजार लिटर क्षमतेच्या ७० टँकरने पाणी पुरवठा केला जातोे़ निम्न तेरणा, डोंगरगाव, साई-नागझरी, बॅरेजेसमधून दिवसाला किमान ४० लाख लिटर आणि रेल्वेचे ५ लाख लिटर असे ४५ लाख लिटर पाणी संकलित होते़ टँकरने ८ दिवसाला पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर शहराला ४० लाख लिटर पाण्याची दिवसाला गरज आहे़ यापेक्षा अधिक पाणी संकलित होते़ परंतू वितरण व्यवस्थेत दोष आहेत़ त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही़ परिणामी कुठल्या प्रभागात १२ दिवसाला तर कोठे १५ दिवसाला पाणी मिळते़ यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ मोठ्या प्रमाणात पाणी उचलूनही आम्हाला पाणी का मिळत नाही असा प्रश्न ‘लोकमत’ ने केलेल्या सर्व्हे दरम्यान नागरिकांनी उपस्थित केला़ शहरातील प्रभाग २, ३, ४, ५, ६, ८, ९, १३, १६, २१, २८, ३१, ३२, ३३ आदी प्रभागात ‘लोकमत’ चमुने नागरिकांची मते जाणून घेतली असता टँकर कधी येते तर कधी नाही़ कुठे बारा दिवसातून २०० लिटर पाणीमिळते तर कुठे ते ही दिले जात नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ २०० लिटर का असेना किमान ५ दिवसाला पाणी मिळावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. पाणी वाढल्यावरही ३५ प्रभागाला ७० टँकर कसे पुरतात ? आता टँकर वाढवून प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळेल, अशी व्यवस्था का नाही? असा सूर नागरिकांमधून आहे. पण मनपा लक्ष देईल काय ? दररोज ३५ लाख लिटर पाणी शहरात येत आहे. परंतु, नागरिकांना केवळ २५ लाख लिटर पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे प्रति कुटुंब दहा ते बारा दिवसाला २०० लिटर पाणी दिले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही वाटपाच्या महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाणी प्रमाणापेक्षा कमी उपलब्ध होत आहे. ४महसूल मंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे शहराला रेल्वेद्वारे ५० लाख लिटर व निम्न तेरणेतून ५० लाख लिटर पाणी दररोज उपलब्ध झाल्यास शहराला नळाने पाणी देणे शक्य आहे. महापालिकेने नळाने पाणी देण्याचे नियोजन करावे. जेणेकरून उपलब्ध पाणी समान वाटप होईल. नागरिकांचा संताप कमी होण्यास मदत होईल, असे नगरसेवक शैलेश स्वामी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.ज्या नगरात पाणी वाटप केले जात आहे, त्याची नोंद मनपा कार्यालयात केली जाते. शिवाय, ज्या नगरात पाणीपुरवठा केला आहे, तेथील चार लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. नियमानुसार सर्वांनाच २०० लिटर पाणी दिले जात आहे. तक्रार असल्यास त्याची चौकशीही केली जाते. अधिकचे पाणी देण्याची मागणी आहे. त्यावर मात्र निर्णय नसल्याचे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले.