शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आलेले पाणी मुरतय कोठे..?

By admin | Updated: April 19, 2016 01:19 IST

लातूर शहरात एकूण ३५ प्रभाग आहेत़ प्रत्येक प्रभागाला २ टँकरने मनपा ८ दिवसाआड पाणी देते़ तर स्थानिक स्त्रोतातून तसेच रेल्वेचे आलेले पाणी उचलण्यासाठी

लातूर शहरात एकूण ३५ प्रभाग आहेत़ प्रत्येक प्रभागाला २ टँकरने मनपा ८ दिवसाआड पाणी देते़ तर स्थानिक स्त्रोतातून तसेच रेल्वेचे आलेले पाणी उचलण्यासाठी २० हजार व १२ हजार लिटर क्षमतेचे ६० टँकर आहेत़ ६ हजार लिटर क्षमतेच्या ७० टँकरने पाणी पुरवठा केला जातोे़ निम्न तेरणा, डोंगरगाव, साई-नागझरी, बॅरेजेसमधून दिवसाला किमान ४० लाख लिटर आणि रेल्वेचे ५ लाख लिटर असे ४५ लाख लिटर पाणी संकलित होते़ टँकरने ८ दिवसाला पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर शहराला ४० लाख लिटर पाण्याची दिवसाला गरज आहे़ यापेक्षा अधिक पाणी संकलित होते़ परंतू वितरण व्यवस्थेत दोष आहेत़ त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही़ परिणामी कुठल्या प्रभागात १२ दिवसाला तर कोठे १५ दिवसाला पाणी मिळते़ यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ मोठ्या प्रमाणात पाणी उचलूनही आम्हाला पाणी का मिळत नाही असा प्रश्न ‘लोकमत’ ने केलेल्या सर्व्हे दरम्यान नागरिकांनी उपस्थित केला़ शहरातील प्रभाग २, ३, ४, ५, ६, ८, ९, १३, १६, २१, २८, ३१, ३२, ३३ आदी प्रभागात ‘लोकमत’ चमुने नागरिकांची मते जाणून घेतली असता टँकर कधी येते तर कधी नाही़ कुठे बारा दिवसातून २०० लिटर पाणीमिळते तर कुठे ते ही दिले जात नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ २०० लिटर का असेना किमान ५ दिवसाला पाणी मिळावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. पाणी वाढल्यावरही ३५ प्रभागाला ७० टँकर कसे पुरतात ? आता टँकर वाढवून प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळेल, अशी व्यवस्था का नाही? असा सूर नागरिकांमधून आहे. पण मनपा लक्ष देईल काय ? दररोज ३५ लाख लिटर पाणी शहरात येत आहे. परंतु, नागरिकांना केवळ २५ लाख लिटर पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे प्रति कुटुंब दहा ते बारा दिवसाला २०० लिटर पाणी दिले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही वाटपाच्या महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाणी प्रमाणापेक्षा कमी उपलब्ध होत आहे. ४महसूल मंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे शहराला रेल्वेद्वारे ५० लाख लिटर व निम्न तेरणेतून ५० लाख लिटर पाणी दररोज उपलब्ध झाल्यास शहराला नळाने पाणी देणे शक्य आहे. महापालिकेने नळाने पाणी देण्याचे नियोजन करावे. जेणेकरून उपलब्ध पाणी समान वाटप होईल. नागरिकांचा संताप कमी होण्यास मदत होईल, असे नगरसेवक शैलेश स्वामी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.ज्या नगरात पाणी वाटप केले जात आहे, त्याची नोंद मनपा कार्यालयात केली जाते. शिवाय, ज्या नगरात पाणीपुरवठा केला आहे, तेथील चार लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. नियमानुसार सर्वांनाच २०० लिटर पाणी दिले जात आहे. तक्रार असल्यास त्याची चौकशीही केली जाते. अधिकचे पाणी देण्याची मागणी आहे. त्यावर मात्र निर्णय नसल्याचे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले.