शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

पाणी मुरते कुठे ? नाथसागरात आले अवघे २.७ दशलक्ष घनमीटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 18:55 IST

जायकवाडी धरणात वरच्या भागातून अतिशय संथगतीने पाण्याची आवक सुरू आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणात वरच्या भागातून अतिशय संथगतीने पाण्याची आवक सुरू आहे. नाथसागरात मंगळवारी अवघे २.७ दशलक्ष घनमीटर पाणी दाखल झाले. त्यामुळे ‘जायकवाडी’च्या हक्काचे पाणी कुठे मुरते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

निळवंडेतून पाणी सोडल्यानंतर जवळपास १६ बंधारे पार करून आलेल्या पाण्याचा सहाव्या दिवशी सोमवारी मधमेश्वर बंधाऱ्यातून विसर्ग झाला. मधमेश्वर ते जायकवाडी हे अंतर जवळपास १७ कि.मी.चे आहे. निळवंडेतून सोमवारी २ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर ओझर बंधाऱ्यातून १४७६ क्युसेकने विसर्ग होता. यात निळवंडेचा विसर्ग मंगळवारी २०५० इतका झाला आणि ओझर बंधाऱ्यातील विसर्ग १८९५ क्युसेकपर्यंत वाढला. त्यामुळे मधमेश्वर बंधाऱ्यातून होणारा विसर्गही वाढला. मधमेश्वर बंधाऱ्यातून सोमवारी ३२९ क्युसेकने विसर्ग सुरू होता. यात ८२७ क्युसेकपर्यंत वाढ झाली. 

निळवंडेबरोबर दारणा प्रकल्पाखालील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात आले होते. निळवंडेतून पाण्याचा विसर्ग होत असतानाच अनेक दिवसांनंतर दारणा प्रकल्पाच्या खालील बंधाऱ्यात रोखलेले पाणी सोडले; परंतु तरीही पाण्याची  आवक होत नाही. जायकवाडीत बुधवारपर्यंत आणखी पाणी दाखल होईल, असे ‘कडा’तर्फे सांगण्यात आले. जायकवाडीत सोमवारी २९.१३ टक्के पाणीसाठा होता.  मंगळवारी साठा २८.९३ टक्क्यांवर आला.

दारणाखाली अडवलेले पाणीदारणा धरणातून सोडण्यात आलेले पाणी खाली कोल्हापूर बंधाऱ्यांत अडविण्यात आले होते. बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आल्याने हे पाणी जायकवाडीत पोहोचले आहे. २.७ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.  

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद