शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

पाणी मुरते कुठे ? नाथसागरात आले अवघे २.७ दशलक्ष घनमीटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 18:55 IST

जायकवाडी धरणात वरच्या भागातून अतिशय संथगतीने पाण्याची आवक सुरू आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणात वरच्या भागातून अतिशय संथगतीने पाण्याची आवक सुरू आहे. नाथसागरात मंगळवारी अवघे २.७ दशलक्ष घनमीटर पाणी दाखल झाले. त्यामुळे ‘जायकवाडी’च्या हक्काचे पाणी कुठे मुरते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

निळवंडेतून पाणी सोडल्यानंतर जवळपास १६ बंधारे पार करून आलेल्या पाण्याचा सहाव्या दिवशी सोमवारी मधमेश्वर बंधाऱ्यातून विसर्ग झाला. मधमेश्वर ते जायकवाडी हे अंतर जवळपास १७ कि.मी.चे आहे. निळवंडेतून सोमवारी २ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर ओझर बंधाऱ्यातून १४७६ क्युसेकने विसर्ग होता. यात निळवंडेचा विसर्ग मंगळवारी २०५० इतका झाला आणि ओझर बंधाऱ्यातील विसर्ग १८९५ क्युसेकपर्यंत वाढला. त्यामुळे मधमेश्वर बंधाऱ्यातून होणारा विसर्गही वाढला. मधमेश्वर बंधाऱ्यातून सोमवारी ३२९ क्युसेकने विसर्ग सुरू होता. यात ८२७ क्युसेकपर्यंत वाढ झाली. 

निळवंडेबरोबर दारणा प्रकल्पाखालील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात आले होते. निळवंडेतून पाण्याचा विसर्ग होत असतानाच अनेक दिवसांनंतर दारणा प्रकल्पाच्या खालील बंधाऱ्यात रोखलेले पाणी सोडले; परंतु तरीही पाण्याची  आवक होत नाही. जायकवाडीत बुधवारपर्यंत आणखी पाणी दाखल होईल, असे ‘कडा’तर्फे सांगण्यात आले. जायकवाडीत सोमवारी २९.१३ टक्के पाणीसाठा होता.  मंगळवारी साठा २८.९३ टक्क्यांवर आला.

दारणाखाली अडवलेले पाणीदारणा धरणातून सोडण्यात आलेले पाणी खाली कोल्हापूर बंधाऱ्यांत अडविण्यात आले होते. बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आल्याने हे पाणी जायकवाडीत पोहोचले आहे. २.७ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिक रणाचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.  

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद