शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

स्फोटक आणि वादग्रस्त वक्तव्ये कुठे करायची तर ती औरंगाबादेत!

By स. सो. खंडाळकर | Updated: December 12, 2022 14:25 IST

महापुरुषांचा अपमान करीत वक्तव्य करणं हा सवंग प्रसिद्धीचा भाग असू शकतो का? की अभ्यासच नसल्यामुळे अर्धवट माहितीवर अशी वक्तव्ये येतात, हा संशोधनाचा भाग ठरावा...

- स. सो. खंडाळकरस्फोटक आणि वादग्रस्त वक्तव्ये कुठे करायची तर ती औरंगाबादेत, असंच सध्याचं चित्र आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांवरची टिप्पणी औरंगाबादेतच केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डी.लिट. पदवी प्रदान समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार आणि केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यपालांनी केलेलं शिवरायांच्या संदर्भातलं वक्तव्य अजून गाजतंय. ‘शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आयकॉन थे’ या त्यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. संभाजीराजे व उदयनराजे दोघेही संतापले. जागोजागी राज्यपालांच्या निषेधार्थ आंदोलनं सुरू झाली. अगदी जोडो मारो आंदोलनापर्यंत!

महापुरुषांचे एकेरी उल्लेख टाळता येऊ शकत नाहीत काय? पण ती राज्यपालही टाळत नाहीत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेही टाळत नाहीत. याच औरंगाबादेत तापडिया नाट्यमंदिरात ‘रामदास स्वामी नहीं होते तो शिवाजी कुछ भी नहीं है’ असं वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी केलं होतं. हे वक्तव्य महाराष्ट्रातील जनता विसरत नाही तोच याच औरंगाबादेत त्यांनी दुसरं वादग्रस्त वक्तव्य केलं. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. या पदावरच्या माणसानं अशी वादग्रस्त वक्तव्ये करणं कितपत योग्य आहे हा खरा मुद्दा आहे. आता महाराष्ट्र कोश्यारी यांच्या उचलबांगडीची वाट पाहतोय.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनुदानावर अवलंबून न राहता भीक मागून शाळा काढल्या,’ असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सध्या चांगलंच गाजत आहे. शुक्रवारी पैठणला संतपीठाच्या कार्यक्रमातील वक्तव्यावरून पाटील यांना औरंगाबादेत सळो की पळो करून सोडलं गेलं. ते औरंगाबादहून पिंपरी चिंचवडला पोहोचले आणि तिथं त्यांच्या तोंडावर शाई फेकली.

औरंगाबाद हे वादग्रस्त वक्तव्ये करण्याचं ठिकाण बनत चाललंय. हे ठरवून होतंय का? शिवाजी महाराज यांच्यानंतर आता महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांची नावं घेऊन व त्यांचा अपमान करीत वक्तव्य करणं हा सवंग प्रसिद्धीचा भाग असू शकतो का? की अभ्यासच नसल्यामुळे अर्धवट माहितीवर अशी वक्तव्ये येतात, हा संशोधनाचा भाग ठरावा... पण अशा वक्तव्यांमुळे सामाजिक सलोख्याला तडा जातो, समाज दुभंगतो, वैमनस्य, विद्वेष वाढतो याचं भान राज्यकर्ते हरपून बसले की काय? अशी शंका येत आहे.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीchandrakant patilचंद्रकांत पाटीलraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद