शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

स्फोटक आणि वादग्रस्त वक्तव्ये कुठे करायची तर ती औरंगाबादेत!

By स. सो. खंडाळकर | Updated: December 12, 2022 14:25 IST

महापुरुषांचा अपमान करीत वक्तव्य करणं हा सवंग प्रसिद्धीचा भाग असू शकतो का? की अभ्यासच नसल्यामुळे अर्धवट माहितीवर अशी वक्तव्ये येतात, हा संशोधनाचा भाग ठरावा...

- स. सो. खंडाळकरस्फोटक आणि वादग्रस्त वक्तव्ये कुठे करायची तर ती औरंगाबादेत, असंच सध्याचं चित्र आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांवरची टिप्पणी औरंगाबादेतच केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डी.लिट. पदवी प्रदान समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार आणि केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यपालांनी केलेलं शिवरायांच्या संदर्भातलं वक्तव्य अजून गाजतंय. ‘शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आयकॉन थे’ या त्यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. संभाजीराजे व उदयनराजे दोघेही संतापले. जागोजागी राज्यपालांच्या निषेधार्थ आंदोलनं सुरू झाली. अगदी जोडो मारो आंदोलनापर्यंत!

महापुरुषांचे एकेरी उल्लेख टाळता येऊ शकत नाहीत काय? पण ती राज्यपालही टाळत नाहीत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेही टाळत नाहीत. याच औरंगाबादेत तापडिया नाट्यमंदिरात ‘रामदास स्वामी नहीं होते तो शिवाजी कुछ भी नहीं है’ असं वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी केलं होतं. हे वक्तव्य महाराष्ट्रातील जनता विसरत नाही तोच याच औरंगाबादेत त्यांनी दुसरं वादग्रस्त वक्तव्य केलं. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. या पदावरच्या माणसानं अशी वादग्रस्त वक्तव्ये करणं कितपत योग्य आहे हा खरा मुद्दा आहे. आता महाराष्ट्र कोश्यारी यांच्या उचलबांगडीची वाट पाहतोय.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनुदानावर अवलंबून न राहता भीक मागून शाळा काढल्या,’ असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सध्या चांगलंच गाजत आहे. शुक्रवारी पैठणला संतपीठाच्या कार्यक्रमातील वक्तव्यावरून पाटील यांना औरंगाबादेत सळो की पळो करून सोडलं गेलं. ते औरंगाबादहून पिंपरी चिंचवडला पोहोचले आणि तिथं त्यांच्या तोंडावर शाई फेकली.

औरंगाबाद हे वादग्रस्त वक्तव्ये करण्याचं ठिकाण बनत चाललंय. हे ठरवून होतंय का? शिवाजी महाराज यांच्यानंतर आता महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांची नावं घेऊन व त्यांचा अपमान करीत वक्तव्य करणं हा सवंग प्रसिद्धीचा भाग असू शकतो का? की अभ्यासच नसल्यामुळे अर्धवट माहितीवर अशी वक्तव्ये येतात, हा संशोधनाचा भाग ठरावा... पण अशा वक्तव्यांमुळे सामाजिक सलोख्याला तडा जातो, समाज दुभंगतो, वैमनस्य, विद्वेष वाढतो याचं भान राज्यकर्ते हरपून बसले की काय? अशी शंका येत आहे.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीchandrakant patilचंद्रकांत पाटीलraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद