शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

कुठे फेडाल हे पाप...! अनुकंपाधारकांच्या नियुक्तीत मनपा आस्थापनेचा बेजबाबदार कारभार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 17:50 IST

औरंगाबाद महापालिकेने मागील काही वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील अर्जदारांवरही उंबरठे झिजविण्याची वेळ आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देमहापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी सकाळी आस्थापना विभागाची झाडाझडती घेतली कर्मचाऱ्यांशी संबंधित हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले.

औरंगाबाद : महापालिकेत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद शासनाने केली आहे. औरंगाबाद महापालिकेने मागील काही वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील अर्जदारांवरही उंबरठे झिजविण्याची वेळ आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी सकाळी आस्थापना विभागाची झाडाझडती घेतली असता कर्मचाऱ्यांशी संबंधित हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. आस्थापना विभागाची चौकशी त्वरित मुख्य लेखापरीक्षकांकडे सोपविण्यात आली.

महापालिकेत शंभर जागा रिक्त असतील तर त्यातील वीस जागा अनुकंपा तत्त्वावर भरण्याची मुभा शासनाने यापूर्वीच दिलेली आहे. मागील काही वर्षांमध्ये जे कर्मचारी मरण पावले त्यांच्या कुटुंबियांनी महापालिकेकडे अनुकंपासाठी अर्ज केले आहेत. त्यांचे अर्ज आस्थापना विभागातील केराच्या टोपलीत पडले आहेत. ज्या कर्मचाऱ्याने आपल्या आयुष्यातील अमूल्य वर्षे महापालिकेला दिले त्यांच्या कुटुंबियांना आज चक्क उंबरठे झिजवावे लागत आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी सकाळी १० वाजता चक्क आस्थापना विभागात ठाण मांडून प्रकरणनिहाय आढावा घेतला.

यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. आस्थापना विभाग-१ आणि २ नेमके काम तरी काय करते, असा प्रश्न महापौरांना पडला. ज्या कर्मचाऱ्यांचा आस्थापना विभागाकडून छळ सुरू आहे, तेसुद्धा आपलेच सहकारी आहेत याची जाणीवही या विभागांना राहिलेली नाही. हे पाप कुठे फेडणार...असेही अपसुकच महापौरांनी नमूद केले. या सर्व  प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांना दिले.

अशी आहेत प्रलंबित प्रकरणे- कर्मचारी भरतीसाठी आकृतिबंध, सेवा भरती नियम सर्वसाधारण सभेने वर्षभरापूर्वी मंजूर केले. कारवाईच शून्य.- अनुकंपा तत्त्वावर शेकडो प्रकरणे प्रलंबित. निवड समितीची बैठकच अनेक वर्षांपासून झाली नाही.- लाड समितीनुसार अनेक प्रकरणे प्रलंबित. पूर्वीच्या नियुक्ती प्रकरणातील चौकशी अहवाल रखडला.- अनेक कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधीच खुला केला नाही. अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला.- निवृत्तीनंतर रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया मागील दहा वर्षांपासून केलीच नाही.- कर्मचारी भरती, पदोन्नत्यांसंदर्भात शासनाकडे अनेक प्रकरणे प्रलंबित. मनपाकडून पाठपुरावाच नाही.- मनपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चौकशी प्रकरणांचा सद्य:स्थितीचा अहवाल त्वरित द्यावा.- २००३ पासून संगणक आॅपरेटरची मंजूर पदेच भरण्यात आली नाहीत. आऊटसोर्सिंगवर स्वतंत्र दुकान सुरू.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादEmployeeकर्मचारी