शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कुठे फेडाल हे पाप...! अनुकंपाधारकांच्या नियुक्तीत मनपा आस्थापनेचा बेजबाबदार कारभार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 17:50 IST

औरंगाबाद महापालिकेने मागील काही वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील अर्जदारांवरही उंबरठे झिजविण्याची वेळ आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देमहापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी सकाळी आस्थापना विभागाची झाडाझडती घेतली कर्मचाऱ्यांशी संबंधित हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले.

औरंगाबाद : महापालिकेत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद शासनाने केली आहे. औरंगाबाद महापालिकेने मागील काही वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील अर्जदारांवरही उंबरठे झिजविण्याची वेळ आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी सकाळी आस्थापना विभागाची झाडाझडती घेतली असता कर्मचाऱ्यांशी संबंधित हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. आस्थापना विभागाची चौकशी त्वरित मुख्य लेखापरीक्षकांकडे सोपविण्यात आली.

महापालिकेत शंभर जागा रिक्त असतील तर त्यातील वीस जागा अनुकंपा तत्त्वावर भरण्याची मुभा शासनाने यापूर्वीच दिलेली आहे. मागील काही वर्षांमध्ये जे कर्मचारी मरण पावले त्यांच्या कुटुंबियांनी महापालिकेकडे अनुकंपासाठी अर्ज केले आहेत. त्यांचे अर्ज आस्थापना विभागातील केराच्या टोपलीत पडले आहेत. ज्या कर्मचाऱ्याने आपल्या आयुष्यातील अमूल्य वर्षे महापालिकेला दिले त्यांच्या कुटुंबियांना आज चक्क उंबरठे झिजवावे लागत आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी सकाळी १० वाजता चक्क आस्थापना विभागात ठाण मांडून प्रकरणनिहाय आढावा घेतला.

यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. आस्थापना विभाग-१ आणि २ नेमके काम तरी काय करते, असा प्रश्न महापौरांना पडला. ज्या कर्मचाऱ्यांचा आस्थापना विभागाकडून छळ सुरू आहे, तेसुद्धा आपलेच सहकारी आहेत याची जाणीवही या विभागांना राहिलेली नाही. हे पाप कुठे फेडणार...असेही अपसुकच महापौरांनी नमूद केले. या सर्व  प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांना दिले.

अशी आहेत प्रलंबित प्रकरणे- कर्मचारी भरतीसाठी आकृतिबंध, सेवा भरती नियम सर्वसाधारण सभेने वर्षभरापूर्वी मंजूर केले. कारवाईच शून्य.- अनुकंपा तत्त्वावर शेकडो प्रकरणे प्रलंबित. निवड समितीची बैठकच अनेक वर्षांपासून झाली नाही.- लाड समितीनुसार अनेक प्रकरणे प्रलंबित. पूर्वीच्या नियुक्ती प्रकरणातील चौकशी अहवाल रखडला.- अनेक कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधीच खुला केला नाही. अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला.- निवृत्तीनंतर रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया मागील दहा वर्षांपासून केलीच नाही.- कर्मचारी भरती, पदोन्नत्यांसंदर्भात शासनाकडे अनेक प्रकरणे प्रलंबित. मनपाकडून पाठपुरावाच नाही.- मनपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चौकशी प्रकरणांचा सद्य:स्थितीचा अहवाल त्वरित द्यावा.- २००३ पासून संगणक आॅपरेटरची मंजूर पदेच भरण्यात आली नाहीत. आऊटसोर्सिंगवर स्वतंत्र दुकान सुरू.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादEmployeeकर्मचारी