शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अब्दीमंडीतील २५० एकर जमीन खरेदी करणाऱ्यांकडे पैसा आला कुठून?

By विकास राऊत | Updated: March 23, 2024 18:08 IST

चौकशी करून अहवाल सादर करा, जमीन हस्तांतरित होऊ नये, यासाठी कार्यवाही करा

छत्रपती संभाजीनगर : अब्दीमंडी येथील गट क्र. ११, १२, २६, ३७ व ४२ मधील २५० एकर जमिनीच्या फेरफार नोंदीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. या प्रकरणात जे गुंतलेले आहेत, त्यांचे निलंबन केले असून आणखी बडे मासे यात गुंतणे शक्य असून शासनाने २५० एकर जमीन खरेदी करणाऱ्यांकडे पैसा कुठून आला. त्याची चौकशी करून अहवाल मागविला आहे. तसेच, तेथील जमीन हस्तांतरित होऊ नये, यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी शासनाने गोपनीय पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये मनुवीर अग्रवाल, तन्वी अग्रवाल आणि संजय चौहान यांनी जमीन खरेदी करण्यासाठी दिलेली रक्कम आली कुठून, याची पडताळणी आयकर विभागाकडे सादर केलेल्या विवरणपत्राद्वारे तपासावी. तसेच, त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे, याची माहिती आयकर विभागाकडून तपासून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना एका गोपनीय पत्राद्वारे दिले आहेत. दरम्यान, ‘लोकमत’ने हे प्रकरण उजेडात आणले असून १२ मार्च रोजी अपर तहसीलदारांचे, तर १५ मार्च रोजी तलाठी, मंडळ अधिकारी, दुय्यम निबंधकांचे निलंबन झाले.

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश अधिकारबाह्यअब्दीमंडीतील २५० एकर जमिनीचे मूळ महसुली दस्तऐवज, जमिनीचे स्वरूप, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इव्हॅक्यू प्रॉपर्टी ॲक्ट १९५० व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम १९६६ मधील पाच वर्षांनंतरच्या फेरफाराबाबतची वस्तुस्थिती पाहता तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी दिलेले आदेश अधिकार व नियमबाह्य आहेत. ही वस्तुस्थिती अर्धन्यायिक अपील प्रकरणाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत तातडीने आदेश प्राप्त करून घ्यावेत. तसेच, २५० जमिनी हस्तांतरित होऊ नयेत, यासाठी कार्यवाहीचे पत्र शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

१९ कोटींत ११० हेक्टरची रजिस्ट्री...अब्दीमंडीतील २५० एकरचा फेरफार नोव्हेंबर २०२३ मध्ये झाल्यानंतर आजवर ११०.४९ हेक्टर म्हणजे पूर्ण जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार झाले. जालना, शहरातील विद्यानगर, चिकलठाणा येथील तिघांनी अब्दीमंडीत गुंतवणूक केली आहे. मुद्रांक विभागाने मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात १९ कोटी ४४ लाखांची त्या जमिनीची किंमत दाखविली आहे. मुद्रांक शुल्कापोटी १ कोटी १० लाखांचा महसूल विभागाला मिळाला. सहदुय्यम निबंधक वर्ग-२ कार्यालयातील खिडकी क्रमांक-५ वरून ९ रजिस्ट्री झाल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRevenue Departmentमहसूल विभागAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद