शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

महागडा मोबाईल कुठून आला ? आईने जाब विचारातच १७ वर्षाच्या मुलीने हर्सुल तलाव गाठला पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 19:35 IST

दामिनी पथकाने केले मुलीसह आईचे समुपदेशन

ठळक मुद्देसुरक्षा रक्षकांची सर्तकतेने दुर्घटना टळली 

औरंगाबाद : घरात अठराविश्व दारिद्र्य असतानाही मुलगी, मुलगा शिकला पाहिजे, यासाठी आई-वडील काबाडकष्ट करीत आहेत. पैसे नसल्यामुळे मुलाचा अकरावीचा प्रवेश थांबलेला असताना मुलीकडे मोबाईल आढळला. यावरून संतापलेल्या आईने ‘तुझे शिक्षण थांबवून लग्न करून टाकते,’ असे म्हटल्यामुळे मुलगी घाबरली. तिने कोणालाही न सांगता आत्महत्येसाठी थेट हर्सुल तलाव गाठला. तेथील सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत मुलीला थांबवून, दामिनी पथकाला बोलावून घेतले. या पथकाने तिच्यासह आईचेही समुपदेशन करीत पुढील अनर्थ टाळला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

हर्सुल परिसरात राहणारी १७ वर्षांची मुलगी दुपारी हर्सुल तलावाच्या भिंतीकडे जाताना दिसली. संशयावरून सुरक्षारक्षक राजेश गवळे व कैलास वाणी यांनी तिला अडविले. विचारपूस केल्यावर तिची मनस्थिती बिघडल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दामिनी पथकाला कळवले. पथकाच्या उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, निर्मला निंभोरे, संगीता दांडगे आणि सुमन पवार यांनी तत्काळ हर्सुल तलावाकडे धाव घेतली. पथक पोहचल्यानंतर त्यांनी मुलीचा ताबा घेत विचारपूस केली असता, ती आत्महत्या करण्यासाठी तलावावर आल्याचे स्पष्ट झाले. आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे कोणाकडेही मोबाईल नाही, मात्र मुलीकडे महागडा मोबाईल आढळून आला. त्यामुळे आई तिच्यावर रागावली. त्यामुळे मुलीने थेट हर्सुल तलाव गाठला. दामिनी पथकाने समेट घडवून आणला. मायलेकीच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्यानंतर दामिनी पथक तेथून निघाले.

मुलाच्या प्रवेशासाठी मदतसंबंधित कुटुंबातील मुलाचा अकरावीचा प्रवेश शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे थांबला होता. तेव्हा दामिनी पथकातील निर्मला निंभोरे यांनी संबंधित महाविद्यालयातील ओळखीच्या प्राध्यापकांशी संपर्क साधत मुलाला प्रवेश देण्याची विनंतीही केली. यानुसार गुरुवारी मुलाचा प्रवेश होणार आहे. तसेच मुलीला नर्सिंगचे शिक्षण देणार असल्याचेही आईने मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी