शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
3
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
4
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
5
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
6
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
7
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
8
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
9
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
10
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
11
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
12
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
13
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
14
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
15
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
16
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
17
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

जायकवाडीतून येणारे २० एमएलडी पाणी जातंय कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:55 IST

जायकवाडीहून दररोज १५५ एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. शहरात फक्त १३५ एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. २० एमएलडी पाणी अखेर कुठे मुरत आहे...? असा संतप्त सवाल सोमवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना केला.

औरंगाबाद : जायकवाडीहून दररोज १५५ एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. शहरात फक्त १३५ एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. २० एमएलडी पाणी अखेर कुठे मुरत आहे...? असा संतप्त सवाल सोमवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना केला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीही झाली. दररोज पाण्यासाठी नागरिकांची आंदोलने आम्ही सहन करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.

महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी सोमवारी दुपारी स्थायी समितीच्या सभागृहात पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. बैठकीत चहल यांनी सांगितले की, धरणात सध्या ४६ टक्केपाणी आहे. ज्याठिकाणी महापालिका पाणी उचलते तेथील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याचा डिस्चार्ज कमी झाला आहे.

 गाळ, कचरा आणि गवत यामुळेही पाणी पूर्ण क्षमतेने ओढण्यासाठी त्रास होत आहे. जायकवाडीहून शहरात पाणी येईपर्यंत २० एमएलडी पाणी कुठे जात आहे. लिकेज, अनधिकृत कनेक्शन का बंद करण्यात आले नाहीत. शहरातील व्यावसायिकांचे अनधिकृत नळ कधी कापणार आहोत, असे एक ना अनेक प्रश्न यावेळी करण्यात आले. 

कार्यकारी अभियंता चहल फोन उचलत नाहीत, या मुद्यावर उपमहापौर आणि चहल यांच्यात जोरदार खडाजंगीही झाली. महापौरांनी यावेळी दोघांना शांत केले. शहराला २२५ एमएलडी पाण्याची दररोज गरज असताना आपण १३५ एमएलडीवर तहान भागवतोय, असा खुलासाही अधिकाऱ्यांनी केला. यावर पदाधिकाऱ्यांचे अजिबात समाधान होत नव्हते. 

पाण्याचे नवीन स्रोत शोधून काढावेत. जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांचा सल्ला घ्यावा, अशी सूचनाही महापौरांनी केली. जायकवाडीत मनपाचे आरक्षण ११३ द.ल.घ.मी. एवढे आहे. दरवर्षी मनपा फक्त ५८ द.ल.घ.मी. पाणी उचलते. यावरही पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. शहरातील गुंठेवारी भागातील नागरिकांना टँकरने पाणी देण्यात येते. त्यासाठी दररोज २ एमएलडी पाण्याची गरज भासते. एमआयडीसीने ५ एमएलडी पाणी देण्यास सहमती दर्शविली होती. त्याचे काय झाले...? प्रशासनाने यासाठी काय पाठपुरावा केला यावरही अधिकारी निरुत्तर झाले. हर्सूल तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत द्यावा, असे निर्देशही महापौरांनी दिले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात