शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीतून येणारे २० एमएलडी पाणी जातंय कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:55 IST

जायकवाडीहून दररोज १५५ एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. शहरात फक्त १३५ एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. २० एमएलडी पाणी अखेर कुठे मुरत आहे...? असा संतप्त सवाल सोमवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना केला.

औरंगाबाद : जायकवाडीहून दररोज १५५ एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. शहरात फक्त १३५ एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. २० एमएलडी पाणी अखेर कुठे मुरत आहे...? असा संतप्त सवाल सोमवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना केला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीही झाली. दररोज पाण्यासाठी नागरिकांची आंदोलने आम्ही सहन करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.

महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी सोमवारी दुपारी स्थायी समितीच्या सभागृहात पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. बैठकीत चहल यांनी सांगितले की, धरणात सध्या ४६ टक्केपाणी आहे. ज्याठिकाणी महापालिका पाणी उचलते तेथील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याचा डिस्चार्ज कमी झाला आहे.

 गाळ, कचरा आणि गवत यामुळेही पाणी पूर्ण क्षमतेने ओढण्यासाठी त्रास होत आहे. जायकवाडीहून शहरात पाणी येईपर्यंत २० एमएलडी पाणी कुठे जात आहे. लिकेज, अनधिकृत कनेक्शन का बंद करण्यात आले नाहीत. शहरातील व्यावसायिकांचे अनधिकृत नळ कधी कापणार आहोत, असे एक ना अनेक प्रश्न यावेळी करण्यात आले. 

कार्यकारी अभियंता चहल फोन उचलत नाहीत, या मुद्यावर उपमहापौर आणि चहल यांच्यात जोरदार खडाजंगीही झाली. महापौरांनी यावेळी दोघांना शांत केले. शहराला २२५ एमएलडी पाण्याची दररोज गरज असताना आपण १३५ एमएलडीवर तहान भागवतोय, असा खुलासाही अधिकाऱ्यांनी केला. यावर पदाधिकाऱ्यांचे अजिबात समाधान होत नव्हते. 

पाण्याचे नवीन स्रोत शोधून काढावेत. जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांचा सल्ला घ्यावा, अशी सूचनाही महापौरांनी केली. जायकवाडीत मनपाचे आरक्षण ११३ द.ल.घ.मी. एवढे आहे. दरवर्षी मनपा फक्त ५८ द.ल.घ.मी. पाणी उचलते. यावरही पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. शहरातील गुंठेवारी भागातील नागरिकांना टँकरने पाणी देण्यात येते. त्यासाठी दररोज २ एमएलडी पाण्याची गरज भासते. एमआयडीसीने ५ एमएलडी पाणी देण्यास सहमती दर्शविली होती. त्याचे काय झाले...? प्रशासनाने यासाठी काय पाठपुरावा केला यावरही अधिकारी निरुत्तर झाले. हर्सूल तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत द्यावा, असे निर्देशही महापौरांनी दिले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात