शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

जायकवाडीतून येणारे २० एमएलडी पाणी जातंय कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:55 IST

जायकवाडीहून दररोज १५५ एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. शहरात फक्त १३५ एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. २० एमएलडी पाणी अखेर कुठे मुरत आहे...? असा संतप्त सवाल सोमवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना केला.

औरंगाबाद : जायकवाडीहून दररोज १५५ एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. शहरात फक्त १३५ एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. २० एमएलडी पाणी अखेर कुठे मुरत आहे...? असा संतप्त सवाल सोमवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना केला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीही झाली. दररोज पाण्यासाठी नागरिकांची आंदोलने आम्ही सहन करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.

महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी सोमवारी दुपारी स्थायी समितीच्या सभागृहात पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. बैठकीत चहल यांनी सांगितले की, धरणात सध्या ४६ टक्केपाणी आहे. ज्याठिकाणी महापालिका पाणी उचलते तेथील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याचा डिस्चार्ज कमी झाला आहे.

 गाळ, कचरा आणि गवत यामुळेही पाणी पूर्ण क्षमतेने ओढण्यासाठी त्रास होत आहे. जायकवाडीहून शहरात पाणी येईपर्यंत २० एमएलडी पाणी कुठे जात आहे. लिकेज, अनधिकृत कनेक्शन का बंद करण्यात आले नाहीत. शहरातील व्यावसायिकांचे अनधिकृत नळ कधी कापणार आहोत, असे एक ना अनेक प्रश्न यावेळी करण्यात आले. 

कार्यकारी अभियंता चहल फोन उचलत नाहीत, या मुद्यावर उपमहापौर आणि चहल यांच्यात जोरदार खडाजंगीही झाली. महापौरांनी यावेळी दोघांना शांत केले. शहराला २२५ एमएलडी पाण्याची दररोज गरज असताना आपण १३५ एमएलडीवर तहान भागवतोय, असा खुलासाही अधिकाऱ्यांनी केला. यावर पदाधिकाऱ्यांचे अजिबात समाधान होत नव्हते. 

पाण्याचे नवीन स्रोत शोधून काढावेत. जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांचा सल्ला घ्यावा, अशी सूचनाही महापौरांनी केली. जायकवाडीत मनपाचे आरक्षण ११३ द.ल.घ.मी. एवढे आहे. दरवर्षी मनपा फक्त ५८ द.ल.घ.मी. पाणी उचलते. यावरही पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. शहरातील गुंठेवारी भागातील नागरिकांना टँकरने पाणी देण्यात येते. त्यासाठी दररोज २ एमएलडी पाण्याची गरज भासते. एमआयडीसीने ५ एमएलडी पाणी देण्यास सहमती दर्शविली होती. त्याचे काय झाले...? प्रशासनाने यासाठी काय पाठपुरावा केला यावरही अधिकारी निरुत्तर झाले. हर्सूल तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत द्यावा, असे निर्देशही महापौरांनी दिले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात