शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जायकवाडीतून येणारे २० एमएलडी पाणी जातंय कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:55 IST

जायकवाडीहून दररोज १५५ एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. शहरात फक्त १३५ एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. २० एमएलडी पाणी अखेर कुठे मुरत आहे...? असा संतप्त सवाल सोमवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना केला.

औरंगाबाद : जायकवाडीहून दररोज १५५ एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. शहरात फक्त १३५ एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. २० एमएलडी पाणी अखेर कुठे मुरत आहे...? असा संतप्त सवाल सोमवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना केला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीही झाली. दररोज पाण्यासाठी नागरिकांची आंदोलने आम्ही सहन करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.

महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी सोमवारी दुपारी स्थायी समितीच्या सभागृहात पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. बैठकीत चहल यांनी सांगितले की, धरणात सध्या ४६ टक्केपाणी आहे. ज्याठिकाणी महापालिका पाणी उचलते तेथील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याचा डिस्चार्ज कमी झाला आहे.

 गाळ, कचरा आणि गवत यामुळेही पाणी पूर्ण क्षमतेने ओढण्यासाठी त्रास होत आहे. जायकवाडीहून शहरात पाणी येईपर्यंत २० एमएलडी पाणी कुठे जात आहे. लिकेज, अनधिकृत कनेक्शन का बंद करण्यात आले नाहीत. शहरातील व्यावसायिकांचे अनधिकृत नळ कधी कापणार आहोत, असे एक ना अनेक प्रश्न यावेळी करण्यात आले. 

कार्यकारी अभियंता चहल फोन उचलत नाहीत, या मुद्यावर उपमहापौर आणि चहल यांच्यात जोरदार खडाजंगीही झाली. महापौरांनी यावेळी दोघांना शांत केले. शहराला २२५ एमएलडी पाण्याची दररोज गरज असताना आपण १३५ एमएलडीवर तहान भागवतोय, असा खुलासाही अधिकाऱ्यांनी केला. यावर पदाधिकाऱ्यांचे अजिबात समाधान होत नव्हते. 

पाण्याचे नवीन स्रोत शोधून काढावेत. जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांचा सल्ला घ्यावा, अशी सूचनाही महापौरांनी केली. जायकवाडीत मनपाचे आरक्षण ११३ द.ल.घ.मी. एवढे आहे. दरवर्षी मनपा फक्त ५८ द.ल.घ.मी. पाणी उचलते. यावरही पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. शहरातील गुंठेवारी भागातील नागरिकांना टँकरने पाणी देण्यात येते. त्यासाठी दररोज २ एमएलडी पाण्याची गरज भासते. एमआयडीसीने ५ एमएलडी पाणी देण्यास सहमती दर्शविली होती. त्याचे काय झाले...? प्रशासनाने यासाठी काय पाठपुरावा केला यावरही अधिकारी निरुत्तर झाले. हर्सूल तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत द्यावा, असे निर्देशही महापौरांनी दिले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात