शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

चारा, पाण्याच्या प्रश्नावर नेते मंडळी कधी बोलणार? सामान्य मतदारांचा संतप्त सवाल 

By विजय सरवदे | Updated: April 10, 2024 16:57 IST

सत्तेचा सारीपाट जिंकण्यासाठी सारेच मश्गूल

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात दिवसेंदिवस चारा, पाण्याची स्थिती गंभीर होत चालली आहे. एप्रिलमध्येच ३३७ गावांना ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर उपलब्ध असलेला चाराही सुमारे ११.५ लाख पशुधन जगविण्यासाठी अपुरा पडत आहे. 

टँकरमुक्तीसाठी मागील २५ वर्षांपासून सरकारने अनेक योजना आणल्या. त्यासाठी कैक कोटींचा चुराडा झाला; पण अजूनही अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना अपूर्णच आहेत. त्यामुळे दरवर्षी टँकर सुरू करावे लागतात, याला जबाबदार कोण, सध्या निवडणुकीच्या धामधुमीत सत्तेचा सारीपाट जिंकण्यासाठी मश्गूल असलेली राजकीय मंडळी चारा, पाण्याच्या प्रश्नावर बोलणार की नुसतीच मते मागणार, असे प्रश्न सामान्य मतदारांतून विचारले जात आहेत. गेल्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत.

परिणामी, ऑक्टोबरपासूनच अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. मोलमजुरी सोडून नागरिकांना घागरभर पाण्यासाठी टँकरच्या प्रतीक्षेत बसावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २८९ गावे आणि ४८ वाड्या अशा एकूण ३३७ गावांसाठी ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ विहिरी अधिग्रहण करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, नवीन विंधन विहिरी घेणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजनांसाठी ऑक्टोबर ते जून नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी ८१ कोटी ४० लाखांचा कृती आराखडा केला आहे. सध्या २२६ विहिरींचे अधिग्रहण केले असून त्यातून ३३७ गावांची तहान भागविली जात आहे.

ज्यांच्याकडे शेती आहे, अशा पशुपालक शेतकऱ्यांकडे ४ ते ५ महिने पुरेल एवढा चारा शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, शेती नसलेल्या पशुपालकांची संख्याही मोठी आहे. त्यांच्या पशुधनाचे काय. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सतावत असल्याने अनेक पशुपालकांनी कवडीमोल किमतीत जनावरे विक्रीला काढली आहेत. सामान्य जनतेच्या जगण्याच्या या प्रश्नांवर गावपुढारीही बोलायला तयार नाहीत. या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराकडे लक्ष राहू द्या, एवढेच काय ते बोलून निघून जातात. चारा, पाणी, रेशन, रोहयोच्या मजुरीत वाढ हे प्रश्न निकाली काढण्यासाठी जो सक्षम असेल, त्यालाच आता मतदान करणार, असा सूर सर्वसामान्य मतदारांतून निघाला आहे.

४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठाएप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ३३७ गावांना ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील दोन- अडीच महिने कसे काढावेत, अशी चिंता ग्रामीण जनतेला लागली असून त्यासंदर्भात उपाययोजना करण्यास प्रशासनाने कंबर कसली आहे. सध्या तरी २२६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची सद्य:स्थिती४४३ एकूण टँकर२२६ विहिरी अधिग्रहित

कोणत्या तालुक्यात किती टँकर सुरूछत्रपती संभाजीनगर- ६०फुलंब्री- ५१सिल्लोड- ६९सोयगाव- ००कन्नड- १८खुलताबाद- ००गंगापूर- १०२वैजापूर- ७१पैठण- ७२

कोणत्या तालुक्यात किती टँकर सुरूछत्रपती संभाजीनगर- ०३फुलंब्री- ४७सिल्लोड- २१सोयगाव- ०३कन्नड- ४०खुलताबाद- १०गंगापूर- २४वैजापूर- ७५पैठण- ०३

४-५ महिने पुरेल एवढा चारा?- ४ ते ५ महिने पुरेल एवढा चारा शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ज्यांच्याकडे शेती नाही अशा पशुपालकांचे काय? यावर प्रशासनाकडे उत्तर नाही. आजही हजारो पशुधन चाऱ्यासाठी उजाड माळावर भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. खरीप, रबी तसेच पशुसंवर्धन व कृषी विभागाने केलेल्या उपाययोजनांद्वारे पशुपालक शेतकऱ्यांकडे ११ लाख ८७ हजार ७७८ मेट्रिक टन चारा शिल्लक असल्याची प्रशासनाच्या दप्तरी आकडेवारी आहे.

जिल्ह्यात ११.५२ लाख पशुधनजिल्ह्यात लहान जनावरांची संख्या १ लाख ५८ हजार २५१, मोठी जनावरे ४ लाख ७४ हजार ७५२ आणि ५ लाख १९ हजार ४२६ शेळी- मेंढी, असे मिळून ११ लाख ५२ हजार ४२८ पशुधन आहे. या जनावरांना रोज ३ हजार ८४३ मेट्रिक टन वाळलेला चारा लागतो.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Imtiaz Jalilइम्तियाज जलीलChandrakant Khaireचंद्रकांत खैरे