शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चारा, पाण्याच्या प्रश्नावर नेते मंडळी कधी बोलणार? सामान्य मतदारांचा संतप्त सवाल 

By विजय सरवदे | Updated: April 10, 2024 16:57 IST

सत्तेचा सारीपाट जिंकण्यासाठी सारेच मश्गूल

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात दिवसेंदिवस चारा, पाण्याची स्थिती गंभीर होत चालली आहे. एप्रिलमध्येच ३३७ गावांना ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर उपलब्ध असलेला चाराही सुमारे ११.५ लाख पशुधन जगविण्यासाठी अपुरा पडत आहे. 

टँकरमुक्तीसाठी मागील २५ वर्षांपासून सरकारने अनेक योजना आणल्या. त्यासाठी कैक कोटींचा चुराडा झाला; पण अजूनही अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना अपूर्णच आहेत. त्यामुळे दरवर्षी टँकर सुरू करावे लागतात, याला जबाबदार कोण, सध्या निवडणुकीच्या धामधुमीत सत्तेचा सारीपाट जिंकण्यासाठी मश्गूल असलेली राजकीय मंडळी चारा, पाण्याच्या प्रश्नावर बोलणार की नुसतीच मते मागणार, असे प्रश्न सामान्य मतदारांतून विचारले जात आहेत. गेल्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत.

परिणामी, ऑक्टोबरपासूनच अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. मोलमजुरी सोडून नागरिकांना घागरभर पाण्यासाठी टँकरच्या प्रतीक्षेत बसावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २८९ गावे आणि ४८ वाड्या अशा एकूण ३३७ गावांसाठी ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ विहिरी अधिग्रहण करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, नवीन विंधन विहिरी घेणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजनांसाठी ऑक्टोबर ते जून नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी ८१ कोटी ४० लाखांचा कृती आराखडा केला आहे. सध्या २२६ विहिरींचे अधिग्रहण केले असून त्यातून ३३७ गावांची तहान भागविली जात आहे.

ज्यांच्याकडे शेती आहे, अशा पशुपालक शेतकऱ्यांकडे ४ ते ५ महिने पुरेल एवढा चारा शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, शेती नसलेल्या पशुपालकांची संख्याही मोठी आहे. त्यांच्या पशुधनाचे काय. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सतावत असल्याने अनेक पशुपालकांनी कवडीमोल किमतीत जनावरे विक्रीला काढली आहेत. सामान्य जनतेच्या जगण्याच्या या प्रश्नांवर गावपुढारीही बोलायला तयार नाहीत. या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराकडे लक्ष राहू द्या, एवढेच काय ते बोलून निघून जातात. चारा, पाणी, रेशन, रोहयोच्या मजुरीत वाढ हे प्रश्न निकाली काढण्यासाठी जो सक्षम असेल, त्यालाच आता मतदान करणार, असा सूर सर्वसामान्य मतदारांतून निघाला आहे.

४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठाएप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ३३७ गावांना ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील दोन- अडीच महिने कसे काढावेत, अशी चिंता ग्रामीण जनतेला लागली असून त्यासंदर्भात उपाययोजना करण्यास प्रशासनाने कंबर कसली आहे. सध्या तरी २२६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची सद्य:स्थिती४४३ एकूण टँकर२२६ विहिरी अधिग्रहित

कोणत्या तालुक्यात किती टँकर सुरूछत्रपती संभाजीनगर- ६०फुलंब्री- ५१सिल्लोड- ६९सोयगाव- ००कन्नड- १८खुलताबाद- ००गंगापूर- १०२वैजापूर- ७१पैठण- ७२

कोणत्या तालुक्यात किती टँकर सुरूछत्रपती संभाजीनगर- ०३फुलंब्री- ४७सिल्लोड- २१सोयगाव- ०३कन्नड- ४०खुलताबाद- १०गंगापूर- २४वैजापूर- ७५पैठण- ०३

४-५ महिने पुरेल एवढा चारा?- ४ ते ५ महिने पुरेल एवढा चारा शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ज्यांच्याकडे शेती नाही अशा पशुपालकांचे काय? यावर प्रशासनाकडे उत्तर नाही. आजही हजारो पशुधन चाऱ्यासाठी उजाड माळावर भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. खरीप, रबी तसेच पशुसंवर्धन व कृषी विभागाने केलेल्या उपाययोजनांद्वारे पशुपालक शेतकऱ्यांकडे ११ लाख ८७ हजार ७७८ मेट्रिक टन चारा शिल्लक असल्याची प्रशासनाच्या दप्तरी आकडेवारी आहे.

जिल्ह्यात ११.५२ लाख पशुधनजिल्ह्यात लहान जनावरांची संख्या १ लाख ५८ हजार २५१, मोठी जनावरे ४ लाख ७४ हजार ७५२ आणि ५ लाख १९ हजार ४२६ शेळी- मेंढी, असे मिळून ११ लाख ५२ हजार ४२८ पशुधन आहे. या जनावरांना रोज ३ हजार ८४३ मेट्रिक टन वाळलेला चारा लागतो.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Imtiaz Jalilइम्तियाज जलीलChandrakant Khaireचंद्रकांत खैरे