शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

त्रुट्यांचा खेळ थांबणार कधी; ‘समाजकल्याण’कडून बृहत आराखडा जिल्हा परिषदेकडे परत

By विजय सरवदे | Updated: February 7, 2024 11:20 IST

छत्रपती संभाजीनगरात आठ महिन्यांपासून बृहत आराखड्याचे भिजत घोंगडे

छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठ महिन्यांपासून ‘अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास’ या योजनेचा बृहत आराखडा अंतिम व्हायचे नाव घेत नाही. आता निवडणूक आचार संहिता कधीही लागू शकते. त्यामुळे या योजनेसाठी तरतूद असलेल्या ३० कोटी रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षात खर्च होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. चार दिवसांपूर्वीच समाजकल्याण प्रादेशिक कार्यालयाने या आराखड्यात त्रुटी काढून दुरुस्तीसाठी तो परत जि.प. समाजकल्याण विभागाकडे पाठविला आहे.

जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील २ हजार अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये कोणत्या विकासकामांना प्राधान्य देणार, यापूर्वी कोणत्या कामांवर निधी खर्च झाला, किती नवीन वस्त्यांची वाढ झाली आणि या वस्त्यांमध्ये किती लोकसंख्या वाढली, आगामी पाच वर्षांत कोणती विकासकामे राबवावी लागतील, यासंबंधीचा आराखडा तयार करुन तो साधारणपणे सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात पंचायत समित्यांकडे सादर केला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी तो तपासून त्रुटी दुरुस्तीसाठी परत ग्रामपंचायतींकडे पाठविला. त्यानंतर परिपूर्ण बृहत आराखडा गटविकास अधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात जि.प. समाजकल्याण विभागाकडे सादर केला होता. मागील २० दिवसांपूर्वी जि.प.ने या आराखड्यास अंतिम मान्यता घेण्यासाठी तो समाजकल्याण प्रादेशिक कार्यालयाकडे सादर केला होता. तिथे या आराखड्याची बारकाईने तपासणी करण्यात आल्यानंतर चार दिवसांपूर्वीच तो त्रुट्यांच्या दुरुस्तीसाठी परत जि.प.कडे पाठविण्यात आला.

यासंदर्भात जि.प. समाजकल्याण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी शनिवारी सुट्टीच्या दिवशी सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जागेवरच काही किरकोळ दुरुस्त्या केल्या. पण, महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी काही बृहत आराखडे ग्रामपंचायतींकडे पाठविले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. त्रुट्यांच्या दुरुस्तीसाठी आणखी किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यानच्या काळात आचार संहिता कधीही लागू शकते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात अर्थात या दीड महिन्यात योजनेच्या अंमलबजावणीबाबत अधिकारी चिंतेत आहेत.

शनिवारी दिवसभर चालली बैठकशनिवारी जि.प.मध्ये झालेल्या बैठकीत पंचायत समित्यांचे काही गटविकास अधिकारी तर काही नोडल अधिकारी उपस्थित होते. त्यांनी काही ग्रामसेवकांकडे मोबाईलवरून विचारणा करत बृहत आराखड्यांमधील त्रुट्या दुरुस्त केल्या, तर अनेक आराखडे दुरुस्तीसाठी संबंधित ग्रामपंचायतींकडे दिले जाणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद