शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

त्रुट्यांचा खेळ थांबणार कधी; ‘समाजकल्याण’कडून बृहत आराखडा जिल्हा परिषदेकडे परत

By विजय सरवदे | Updated: February 7, 2024 11:20 IST

छत्रपती संभाजीनगरात आठ महिन्यांपासून बृहत आराखड्याचे भिजत घोंगडे

छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठ महिन्यांपासून ‘अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास’ या योजनेचा बृहत आराखडा अंतिम व्हायचे नाव घेत नाही. आता निवडणूक आचार संहिता कधीही लागू शकते. त्यामुळे या योजनेसाठी तरतूद असलेल्या ३० कोटी रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षात खर्च होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. चार दिवसांपूर्वीच समाजकल्याण प्रादेशिक कार्यालयाने या आराखड्यात त्रुटी काढून दुरुस्तीसाठी तो परत जि.प. समाजकल्याण विभागाकडे पाठविला आहे.

जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील २ हजार अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये कोणत्या विकासकामांना प्राधान्य देणार, यापूर्वी कोणत्या कामांवर निधी खर्च झाला, किती नवीन वस्त्यांची वाढ झाली आणि या वस्त्यांमध्ये किती लोकसंख्या वाढली, आगामी पाच वर्षांत कोणती विकासकामे राबवावी लागतील, यासंबंधीचा आराखडा तयार करुन तो साधारणपणे सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात पंचायत समित्यांकडे सादर केला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी तो तपासून त्रुटी दुरुस्तीसाठी परत ग्रामपंचायतींकडे पाठविला. त्यानंतर परिपूर्ण बृहत आराखडा गटविकास अधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात जि.प. समाजकल्याण विभागाकडे सादर केला होता. मागील २० दिवसांपूर्वी जि.प.ने या आराखड्यास अंतिम मान्यता घेण्यासाठी तो समाजकल्याण प्रादेशिक कार्यालयाकडे सादर केला होता. तिथे या आराखड्याची बारकाईने तपासणी करण्यात आल्यानंतर चार दिवसांपूर्वीच तो त्रुट्यांच्या दुरुस्तीसाठी परत जि.प.कडे पाठविण्यात आला.

यासंदर्भात जि.प. समाजकल्याण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी शनिवारी सुट्टीच्या दिवशी सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जागेवरच काही किरकोळ दुरुस्त्या केल्या. पण, महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी काही बृहत आराखडे ग्रामपंचायतींकडे पाठविले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. त्रुट्यांच्या दुरुस्तीसाठी आणखी किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यानच्या काळात आचार संहिता कधीही लागू शकते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात अर्थात या दीड महिन्यात योजनेच्या अंमलबजावणीबाबत अधिकारी चिंतेत आहेत.

शनिवारी दिवसभर चालली बैठकशनिवारी जि.प.मध्ये झालेल्या बैठकीत पंचायत समित्यांचे काही गटविकास अधिकारी तर काही नोडल अधिकारी उपस्थित होते. त्यांनी काही ग्रामसेवकांकडे मोबाईलवरून विचारणा करत बृहत आराखड्यांमधील त्रुट्या दुरुस्त केल्या, तर अनेक आराखडे दुरुस्तीसाठी संबंधित ग्रामपंचायतींकडे दिले जाणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद