शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

औरंगाबादेतील मृत्यूची ही प्रवेशद्वारे कधी बंद करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:36 AM

शहरातील बहुतांश भागांत नाल्यांना जोडणा-या पुलांच्या लगतचा भाग उघडाच आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर तो खड्डा दिसून येत नाही.

ठळक मुद्देबेपर्वाई : महापालिकेला कधी जाग येणार?,अतिक्रमण, गाळ - कचऱ्यामुळे नाल्यांची झाली गटारे; अनेक ठिकाणी धोकादायक भगदाडे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील बहुतांश भागांत नाल्यांना जोडणा-या पुलांच्या लगतचा भाग उघडाच आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर तो खड्डा दिसून येत नाही. दुर्दैवाने अनेक जण त्या ठिकाणी पडतात. काही जण वाहून जाण्याच्या दुर्घटना घडतात. ही मृत्यूची प्रवशेद्वारेच असून पालिका ती केव्हा बंद करणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दरवर्षी औरंगाबादकरांना तुडुंब भरणाºया नाल्यांचा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्याची चाहूल लागताच, मनपाला नालेसफाईची आठवण येते. नेहमीप्रमाणे थातुरमातुर स्वरूपात नाले सफाई करून पावसाळ्याचे चार महिने कसेबसे काढण्यात येतात. पावसाळा संपल्यावर महापालिका नाल्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. वर्षभर त्यात अतिक्रमण, कचरा, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य वाढत जाते. शहरात दहा मोठे नाले आहेत. या दहा मोठ्या नाल्यांना जोडणारे लहान ५३ नाले आहेत. वर्षानुवर्ष हे नाले साफ झालेले नाहीत. त्यामुळे गाळासह अतिक्रमणे आहेत. सर्वच नाले घाणीने तुडुंब भरले आहेत. निराला बाजार, सारस्वत बँक, बारूदगर नाला, सिटीचौक, बन्सीलालनगर, जालाननगर, रेल्वेस्टेशन, पद्मपुरा आदी भागातील नाल्यांची अशीच अवस्था आहे़जयभवानीनगर, एन-४, पुंडलिकनगर, गजानन कॉलनी, एन-८, एन-६, गांधीनगर, किराडपुरा, औषधी भवन, बंजारा कॉलनी, जालाननगर, ईटखेडा येथील नाले अतिक्रमणांनी आणि गाळाने गच्च भरले आहेत. शहरात तासभर धो-धो पाऊस पडला की, पावसाच्या पाण्याला जाण्यासाठी जागा नसल्यामुळे ते घरे, दुकाने, तळघर, गोदामांमध्ये शिरते.पाणी वाहून नेण्याची क्षमता संपल्यामुळे शहराला नाल्यांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ मागील अनेक वर्षांपासून नाले अतिक्रमण मुक्त होण्याची वाट पाहत आहेत.नाल्यावर२५०० अतिक्रमणेनाल्यावर २५०० अतिक्रमणे असल्याचा अहवाल २०१४-१५ मध्ये तयार करण्यात आला होता. सद्य:स्थितीत अतिक्रमणे वाढली असतील. भूमी अभिलेख विभागाने पाहणी करून तो अहवाल दिला होता.त्यानुसार अतिक्रमणे पाडण्याची कारवाई झाली असती तर जयभवानीनगरमध्ये एवढी आपत्ती ओढवली नसती. चार वर्षांपासून नालेपाहणी आणि आश्वसनांपलीकडे काहीही समोर आलेले नाही. शहरातील सर्व नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याची गरज आहे.नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याची गरजऔरंगाबाद : महापालिका हद्दीत बांधकामांचे भविष्यकालीन नियोजन नसणे, नाल्यांवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, अर्थ हव्यासापोटी नाल्यांच्या बदललेल्या नैसर्गिक प्रवाहांमुळे शहरातील नाल्यांत साचलेला गाळ औरंगाबादकरांना या पावसाळ्यात त्रासदायक ठरण्याचे संकेत आहेत़ नैसर्गिक नाल्यांची नाली झाल्यामुळे औरंगाबादकरांना दरवर्षीचा पावसाळा धोकादायक ठरतोच आहे़परिस्थिती ‘जैसे थे’चोंडेश्वरी हाऊसिंग सोसायटी येथे येऊन आम्हाला तीन वर्षे झाली आहेत. तेव्हापासून आतापर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. दोन महिन्यांपूर्वी एक दुचाकीचालक गाडीसहित गटारीत वाहून गेला होता. स्थानिकांनी त्याला त्वरित वर काढले. जे जयभावनीनगरला घडले ते येथे कधीही घडू शकते, असे पार्वती मकरिये यांनी सांगितले.चुकीची माहिती देऊनप्लॉट विक्रीमागील १० वर्षांपासून लक्ष्मी कॉलनी परिसरात राहत आहेत. चुकीची माहिती देऊन प्लॉट विक्री झाल्याचे मनपाने कार्यवाही केली तेव्हा समजले. कारवाई दोन खोल्या पाडल्या गेल्या. आमचे मोठे नुकसान झाले ते सहन केले; पण आता हा नवीन प्रश्न उद्भवला आहे. नाल्यातून पाणी प्रवाह पुढे जाण्यासाठी जागाच नसल्याने घराच्या दरवाजासमोरच घाण पाणी साचत आहे, असे अनिता पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण