शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील ३९५ जीर्ण खोल्या पाडणार कधी ?; शिक्षण समितीचा प्रशासनाला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 19:16 IST

धोकादायक शाळाखोल्या पाडून त्याठिकाणी नवीन पक्क्या शाळाखोल्या बांधण्याबाबत पाच महिन्यांपूर्वी जि.प. सर्वसाधारण सभा व स्थायी समितीमध्ये निर्णय झाला; पण अद्याप शिक्षण विभाग व बांधकाम विभागाने त्याबाबत पावले उचललेली नाहीत.

औरंगाबाद : धोकादायक शाळाखोल्या पाडून त्याठिकाणी नवीन पक्क्या शाळाखोल्या बांधण्याबाबत पाच महिन्यांपूर्वी जि.प. सर्वसाधारण सभा व स्थायी समितीमध्ये निर्णय झाला; पण अद्याप शिक्षण विभाग व बांधकाम विभागाने त्याबाबत पावले उचललेली नाहीत. जिल्ह्यात एकूण ३९५ शाळा खोल्या मोडकळीस आलेल्या असून, त्या आता पाडणार कधी आणि बांधणार कधी, असा सवाल उपस्थित करून बैठकीत सभापती मीना शेळके यांनी प्रशासनाच्या उदासीन कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. 

शिक्षण समितीची बैठक शुक्रवारी सभापती मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत मोनाली राठोड यांनी मोडकळीस आलेल्या शाळाखोल्यांबाबतचा मुद्दा उपस्थित केला. नवीन शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होते. जूनपासूनच पावसालाही सुरुवात होते. मागील ५ महिन्यांपासून बांधकाम विभागाला शाळाखोल्या पाडणे व त्याठिकाणी नवीन शाळाखोल्या उभारण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यास वेळ मिळालेला नाही. आता अवघा चार महिन्यांचा कालावधी हातात आहे. युद्धपातळीवर यासंबंधी निर्णय घेऊन योग्य ती उपाययोजना न केल्यास भविष्यात एखादी दुर्घटना अथवा जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील, अशी टिपणीही सभापती शेळके यांनी केली.

याच बैठकीत अनधिकृत शाळांबाबतही चर्चा झाली. गटविकास अधिकाऱ्यांनी गंगापूर तालुक्यात शाळांची तपासणी केली तेव्हा ५२ शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत, तर काही शाळा अनधिकृतपणे स्थलांतरित करण्यात आल्या आहेत, याबाबी समोर आल्या. रांजणगाव शेणपुंजी येथे रविसूत प्राथमिक शाळेची तपासणी केली असता त्या शाळेत नियमित वर्ग भरत नाहीत. विद्यार्थी संख्याही अत्यल्प आहे. शिक्षकही शाळेत नियमित जात नाहीत. वेतन मात्र नियमित उचलतात. या शाळेतील इयत्ता ५ वी ते ७ वीपर्यंतचे वर्ग नियमबाह्य मंजूर करण्यात आले आहेत. या शाळेची औरंगाबाद तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राकेश साळुंके यांनी तपासणी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती शेळके यांनी दिले. ‘सीबीएसई’च्या नावाखाली अनेक शाळांकडून पालकांची फसवणूक केली जाते, अशा शाळांचीही तपासणी केली जाणार आहे. 

रिक्त पदांचे समानीकरण समानशिक्षण समितीच्या या बैठकीत शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी सांगितले की, जिल्हांतर्गत बदल्यांसाठी तालुकास्तरावर शिक्षकांची माहिती भरण्याचे काम गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे. बदल्यांच्या वेळी सर्व तालुक्यांमध्ये रिक्त जागांचे समानीकरण राखण्याची खबरदारी घेतली जात आहे. कोणत्याही तालुक्यात कमी-जास्त पदे रिक्त राहणार नाहीत. समानीकरणाचे योग्य संतुलन ठेवले जाईल.

टॅग्स :zpजिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र