शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

कृषी उत्पन्न बाजार समितीतील ५० एकर जागेचे पणनला नेमके करायचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 12:50 IST

बाजार समितीमधील तब्बल ५० एकर जागा कृषी पणन मंडळाच्या ताब्यात आहे.

ठळक मुद्दे मँगो पार्क, टर्मिनल मार्केट, मका हब कागदावरच

औरंगाबाद : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तब्बल ५० एकर जागा कृषी पणन मंडळाच्या ताब्यात आहे. या जागेवर मागील १८ वर्षांत कधी मँगो पार्क, तर कधी टर्मिनल मार्केट, तर कधी मका हब उभारण्याची घोषणा  तत्कालीन राज्य सरकारने केली होती. आजघडीला या घोषणा लालफितीतच पडून आहेत. कोट्यवधीची जागा धूळ खात पडून असून, या जागेचे पणन मंडळाला करायचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

जाधववाडीतील कृउबा समितीकडे ७३.२८ हेक्टर जागा आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठी म्हणून कृउबा समिती राज्यात ओळखली जाते. येथील केशर आंब्याला देश-विदेशात पोहोचविण्यासाठी सर्वप्रथम आघाडी सरकारच्या काळात येथील जागेवर मँगो पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

नंतर हा निर्णय मागे पडला आणि येथे टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. तिथे फळ-भाज्यांवर प्रक्रिया करून त्या देशात व विदेशात पाठविण्याची योजना होती; मात्र डिसेंबर २०१७ मध्ये युती सरकारने औरंगाबादला वगळून मुंबई, नाशिक व नागपूर येथे टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याऐवजी जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र लक्षात घेता त्या जागेवर ‘मका हब’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण तोही निर्णय हवेतच विरला. 

मध्यंतरी जाधववाडीत कृउबाच्या जागेवर सायलो गोदाम उभारण्याचा निर्णय राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्याचे पुढे काय झाले, हे कळालेच नाही. ज्या जागेवर सर्व योजना उभारण्यात येणार आहेत ती ५० एकर जागा पणन मंडळाच्या ताब्यात आहे. 

या मंडळाने त्या जागेला संरक्षणासाठी भिंत बांधली व कार्यालयासाठी इमारत उभारली आहे. त्यापलीकडे जाऊन या जागेचा विकास करणे पणन मंडळाला जमले नाही. या जागेचा विकास करण्यासाठी आता ती ५० एकर जमीन पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला द्यावी, अशी मागणी विद्यमान सभापती राधाकिसन पठाडे यांनी केली आहे. पणन मंडळाला योग्य वेळी कोणताच निर्णय घेता आला नसल्याने कोट्यवधीची जमीन सध्या पडून आहे. 

जागा ८ वर्षांपासून पणन मंडळाच्या ताब्यात 

सेल हॉल, जनरल शॉपिंग मार्केट, फळे व भाजीपाला मार्केट आदींच्या उभारणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने एसबीआयकडून कर्ज घेतले होते. बँकेचे कर्ज परतफेड न केल्याने बाजार समितीवर जागा विकण्याची वेळ आली होती; पण २०१० मध्ये कृषी पणन मंडळाने बँकेची रक्कम देऊन बाजार समितीचे नाक वाचविले होते. च्त्यावेळी २५ कोटी ५० लाख रुपये पणन मंडळाने दिले होते. त्या बदलात ५० एकर जागेचा ताबा मंडळाने घेतला. त्यापैकी १४ कोटी रुपयेच मंडळाने कृउबाला दिले. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार