शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरात समारोप; मनोज जरांगे काय भूमिका घेणार?

By बापू सोळुंके | Updated: July 13, 2024 11:57 IST

राज्य सरकारने केवळ वेळकाढूपणा सुरू केल्याचे लक्षात येताच मनोज जरांगे यांनी ६ जुलैपासून मराठवाड्यातील विविध शहरांतून आलेल्या महासंवाद आणि महाशांतता रॅलीचा समारोप आज छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. यावेळी मनोज जरांगे काय भूमिका घेणार याकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : सगेसाेयऱ्यांचा कायदा करावा आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे रद्द करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत शुक्रवारी संपली. मात्र, राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या महाशांतता रॅलीचा शनिवारी शहरात समारोप होत आहे. यावेळी जरांगे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे आणि मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

२२ फेब्रुवारी रोजी मुंबईत मोर्चा नेल्यानंतर राज्य सरकारने सगेसाेयऱ्यांचा कायदा करणार असल्याचे आश्वासन देत एक अधिसूचना काढली होती. पण कायदा न केल्याने त्यांनी ८ ते १३ जून दरम्यान अंतरवाली सराटी येथे उपोषण केले. मंत्री शंभूराजे देसाई आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी राज्य सरकारला एक महिन्याची मुदत द्या, अशी विनंती केल्याने जरांगे यांनी उपोषण सोडले होते. राज्य सरकारने मात्र, केवळ वेळकाढूपणा सुरू केल्याचे लक्षात येताच जरांगे यांनी ६ जुलैपासून मराठवाड्यातील विविध शहरांत महासंवाद आणि महाशांतता रॅली सुरू केली. प्रत्येक ठिकाणी मोठा जनसमुदाय सहभागी होत आहे. या रॅलीचा शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप होत आहे. सकाळी ११ वाजता सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते क्रांती चौक दरम्यान होत असलेल्या महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सकल मराठा समाजाने केली आहे.

मराठवाड्यात सहा महाशांतता रॅलीजरांगे यांच्या मराठवाड्यातील महाशांतता रॅलीला ६ जुलै रोजी हिंगोली येथून प्रारंभ झाला. शुक्रवारपर्यंत मराठवाड्यात सहा महाशांतता आणि महासंवाद रॅली अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडल्या. प्रत्येक रॅलींना लाखोंच्या संख्येने समाजबांधवांनी प्रतिसाद दिला. एवढेच नव्हे तर अन्य समाजातील बांधवांनीही सहभाग नोंदविला.

कोपर्डीच्या घटनेला ८ वर्षे पूर्ण१३ जुलै २०१६ रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मराठा समाजातील मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ ऑगस्ट २०१६ रोजी काढण्यात आला होता. या घटनेला शनिवारी ८ वर्षे होत असताना शनिवारी जरांगे यांच्या ‘महाशांतता रॅली’कडे समाजाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद