शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

अधिक मास अन् उसाच्या रसाचा संबंध काय? रसवंतींवर अचानक गर्दी, २५ क्विंटल ऊस संपला

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 24, 2023 12:44 IST

उन्हाळ्यात नव्हे पावसाळ्यात मागणी; नागरिकांनी रांगा लावून पार्सलमध्ये नेला उसाचा रस

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू आहे यामुळे शहरात बोटावर मोजण्याइतक्या रसवंती सुरू असून रविवारी अचानक ग्राहकांची एवढी गर्दी वाढली की, रसवंतीमधील २५ क्विंटल ऊसच संपून गेला. शहानूरमिया दर्गा परिसरात चक्क रसासाठी रांगा लागल्या होत्या. ज्यांना रस मिळाला ते तो रस पीत नव्हते तर घरी पार्सल घेऊन जाताना दिसले.

भर उन्हाळ्यात उसाचा रस पिण्यासाठी एवढी गर्दी वाढली नव्हती. मग, पावसाळ्यात, तेही रविवारच्या दिवशी अचानक रसाला एवढी मागणी का वाढली. ग्राहकांची रसवंतीवर गर्दी का उसळली, याचे कारणही रसवंती मालकाला कळेना. प्रत्येक ग्राहक घाईघाईत येत होता व एक ग्लास, दोन ग्लास उसाचा रस तेही पार्सल मागत होता. रसवंतीमध्ये कोणीच रस पीत नव्हते. जो तो रस पार्सल मागवित असल्याने हा प्रकार काय आहे, या विचाराने रसवंती मालकांचे डोके चक्रावून गेले होते. मागणी एवढी होती की, दुपारी १२ वाजेपर्यंत रसवंतीमधील सर्व ऊस संपला होता. रसवंतीच्या मालकाने मोबाइलवर उसाची ऑॅर्डर दिली पण उस रसवंतीपर्यंत येण्यास २ ते ३ तास लागणार होते. त्यात आता उसाचा हंगाम संपत आल्याने लवकर ऊस मिळणे कठीण झाले होते. शहरातील नव्हे तर आसपासच्या ग्रामीण भागातूनही लोक उसाचा रस खरेदीसाठी शहरात येऊ लागल्याने व वाढत्या गर्दीमुळे अखेर रसवंतीवाल्यांनी आपली दुकाने बंद करून टाकली होती. असंख्य ग्राहकांना रस न मिळाल्याने खाली हात जावे लागले.

का वाढली अचानक उसाच्या रसाला मागणीअधिक मास सुरू आहे. या काळात तुळशीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. विशेषत: अधिक मासाच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करावा, यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते, असे शास्त्रात लिहिले आहे. यामुळे शनिवारी व रविवारी उसाचा रस खरेदीसाठी रसवंतीवर गर्दी उसळली होती.

शहरात एकच चर्चातुळशीला उसाचा रस अर्पण करावे ही एकच चर्चा शहरात दिसून आली. घरोघरी तुळशीला रस अर्पण करण्यासाठी लगबग सुरू झाली होती. तुळशीची पूजा कशी करावी, यासाठी सोशल मीडियावर अनेक मेसेज, व्हिडीओ शेअर केले जात होते.

दुपारीच शटर बंद करावं लागलेशनिवारी सकाळपासूनच ऊसाचा रस पार्सल नेण्यासाठी रसवंतीवर गर्दी होती. मात्र, आज एवढी गर्दी उसळली की, दुपारिच शटर खाली घ्यावे लागले. पावसाळा असला तरी सध्या दररोज २०० ते ३०० ग्लास रस विकला जातो. मात्र, आज ५ हजार ग्लास उसाचा रस विकल्या गेला आणि तेही सर्व ग्राहकांनी पार्सल नेला. ऊस उपलब्ध नसल्याने अखेर रसवंतीचे शटर खाली घ्यावे लागले.- माजीद खान, रसवंती मालक

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक