शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अधिक मास अन् उसाच्या रसाचा संबंध काय? रसवंतींवर अचानक गर्दी, २५ क्विंटल ऊस संपला

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 24, 2023 12:44 IST

उन्हाळ्यात नव्हे पावसाळ्यात मागणी; नागरिकांनी रांगा लावून पार्सलमध्ये नेला उसाचा रस

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू आहे यामुळे शहरात बोटावर मोजण्याइतक्या रसवंती सुरू असून रविवारी अचानक ग्राहकांची एवढी गर्दी वाढली की, रसवंतीमधील २५ क्विंटल ऊसच संपून गेला. शहानूरमिया दर्गा परिसरात चक्क रसासाठी रांगा लागल्या होत्या. ज्यांना रस मिळाला ते तो रस पीत नव्हते तर घरी पार्सल घेऊन जाताना दिसले.

भर उन्हाळ्यात उसाचा रस पिण्यासाठी एवढी गर्दी वाढली नव्हती. मग, पावसाळ्यात, तेही रविवारच्या दिवशी अचानक रसाला एवढी मागणी का वाढली. ग्राहकांची रसवंतीवर गर्दी का उसळली, याचे कारणही रसवंती मालकाला कळेना. प्रत्येक ग्राहक घाईघाईत येत होता व एक ग्लास, दोन ग्लास उसाचा रस तेही पार्सल मागत होता. रसवंतीमध्ये कोणीच रस पीत नव्हते. जो तो रस पार्सल मागवित असल्याने हा प्रकार काय आहे, या विचाराने रसवंती मालकांचे डोके चक्रावून गेले होते. मागणी एवढी होती की, दुपारी १२ वाजेपर्यंत रसवंतीमधील सर्व ऊस संपला होता. रसवंतीच्या मालकाने मोबाइलवर उसाची ऑॅर्डर दिली पण उस रसवंतीपर्यंत येण्यास २ ते ३ तास लागणार होते. त्यात आता उसाचा हंगाम संपत आल्याने लवकर ऊस मिळणे कठीण झाले होते. शहरातील नव्हे तर आसपासच्या ग्रामीण भागातूनही लोक उसाचा रस खरेदीसाठी शहरात येऊ लागल्याने व वाढत्या गर्दीमुळे अखेर रसवंतीवाल्यांनी आपली दुकाने बंद करून टाकली होती. असंख्य ग्राहकांना रस न मिळाल्याने खाली हात जावे लागले.

का वाढली अचानक उसाच्या रसाला मागणीअधिक मास सुरू आहे. या काळात तुळशीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते. विशेषत: अधिक मासाच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करावा, यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते, असे शास्त्रात लिहिले आहे. यामुळे शनिवारी व रविवारी उसाचा रस खरेदीसाठी रसवंतीवर गर्दी उसळली होती.

शहरात एकच चर्चातुळशीला उसाचा रस अर्पण करावे ही एकच चर्चा शहरात दिसून आली. घरोघरी तुळशीला रस अर्पण करण्यासाठी लगबग सुरू झाली होती. तुळशीची पूजा कशी करावी, यासाठी सोशल मीडियावर अनेक मेसेज, व्हिडीओ शेअर केले जात होते.

दुपारीच शटर बंद करावं लागलेशनिवारी सकाळपासूनच ऊसाचा रस पार्सल नेण्यासाठी रसवंतीवर गर्दी होती. मात्र, आज एवढी गर्दी उसळली की, दुपारिच शटर खाली घ्यावे लागले. पावसाळा असला तरी सध्या दररोज २०० ते ३०० ग्लास रस विकला जातो. मात्र, आज ५ हजार ग्लास उसाचा रस विकल्या गेला आणि तेही सर्व ग्राहकांनी पार्सल नेला. ऊस उपलब्ध नसल्याने अखेर रसवंतीचे शटर खाली घ्यावे लागले.- माजीद खान, रसवंती मालक

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक