शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

पुन्हा शाळा बंद झाल्या तर ? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत वाढती धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 14:04 IST

शहरात १५ दिवसांत शाळा बंद झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढणार कसे ?

औरंगाबाद : शहरात अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी सुरू झालेले वर्ग पुन्हा बंद झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांची धाकधूक वाढली आहे. ऑनलाईनमुळे अध्ययनस्तर ३० टक्क्यांपेक्षा खाली आल्याने शाळा पुन्हा बंद झाल्या तर विद्यार्थ्यांचे नुकसान कसे भरून काढणार, अशी चिंता शिक्षकांना सतावत आहे.

ग्रामीण भागातील एकूण १२८ केंद्रांमध्ये पाचवी ते सातवीचे वर्ग ५ सप्टेंबरपासून सुरू झाले. कोरोनामुक्त क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षपणे जुलैपासून सुरू झालेले आहेत. आठवी ते बारावीच्या ग्रामीण भागात ९०७ शाळा असून ६३६ शाळांचे प्रत्यक्ष वर्ग ऑगस्टपासून सुरू आहेत. पहिली ते चाैथीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू झाले. महिनाभरापासून ग्रामीण भागात पहिली ते बारावीचे वर्ग सुरू असून उपस्थिती ७०-७५ टक्क्यांपर्यंत पोहोचली. तब्बल दीड वर्षांनंतर जिल्ह्यातील ४,६०२ शाळांतील पहिली ते बारावीच्या वर्गांचे प्रत्यक्ष शिक्षण रुळावर येत असताना शहरातील रुग्णवाढीने खबरदारी म्हणून पहिली ते आठवीचे वर्ग अवघ्या १५ दिवसांत बंद करण्याचा निर्णय मनपा प्रशासकांनी घेतला.

खांडी पिंपळगाव शाळेचे शिक्षक कैलास गायकवाड म्हणाले, दीड वर्षानंतर सुरू झालेल्या शाळांत आता कुठे विद्यार्थी उपस्थिती वाढायला सुरुवात झाली आहे. उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करून शाळा सुरू राहाव्यात. ग्रामीण भागातील शाळा पुन्हा बंद होतात की काय, या चिंतेने विद्यार्थी, पालक धास्तावले असल्याचे शिक्षक योगेश पाटील म्हणाले.

जिल्ह्यातील शाळातील विद्यार्थी उपस्थितीवर्ग - शाळा -पटसंख्याग्रामीण पहिली ते चौथी - २९२९ -२,२९,५७८शहर पहिली ते सातवी -७४६ -२,००,९९७ग्रामीण पाचवी ते बारावी -७०० -२,५०,४५१शहर आठवी ते बारावी -२२७ -४७,६००

ग्रामीण भागातील शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील. शाळा, शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधक सूचनांच्या काटेकोर अंमलबजावणीवर लक्ष द्यावे.- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, जि. प., औरंगाबाद

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद