शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

लक्षणे नसताना पॉझिटिव्ह असणे म्हणजे? आरोग्य वर्तुळातूनही प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:21 IST

लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार आतापर्यंत अनेकांना होऊन गेलेला असेल आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल, असेही डॉक्टरांनी सांगितले. 

ठळक मुद्देमृत्यूनंतर स्वॅब घेणे व तो पॉझिटिव्ह येणे, हे यंत्रणेचे अपयशलागण झाली तर १०० जणांत ५ टक्के लोकांत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : शहरात कोरोनाची लक्षणे नसताना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. शहरात सध्या अशी लक्षणे नसलेल्या रुग्णांचीच संख्या जास्त आहे. त्यामुळे लक्षणे नसताना पॉझिटिव्ह असणे, याविषयी सर्वसामान्य नागरिकांबरोबर आरोग्य वर्तुळातूनही प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांना काही होणार नाही, असे म्हणणे चुकीचे असून त्यांच्यामुळे इतरांना बाधा होण्याची शक्यता असते, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जाते. तर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर हा आजार आपोआप बरा होऊ शकतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यावर भर दिला जात आहे; परंतु सध्या लक्षणे नसलेल्या रुग्णांविषयी विनाकारण बाऊ केला जात असल्याचे स्वत: डॉक्टर म्हणत आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांपासून कोणताही धोका नसतो. त्यामुळेच सध्या सौम्य व अतिसौम्य व लक्षणे नसलेल्या रुग्णांना ताप नसल्यास व आॅक्सिजनचे प्रमाण ९५ टक्के असल्यास दहाव्या दिवशी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येत आहे. तेही कोणत्या तपसणीशिवाय, असे डॉक्टरांनी सांगितले. कोरोना हा साधा सर्दीचा आजार आहे. यात ताप, दम लागणे आणि अन्य काही लक्षणे दिसत आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार आतापर्यंत अनेकांना होऊन गेलेला असेल आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल, असेही डॉक्टरांनी सांगितले. 

केवळ ५ टक्के गंभीरकोरोनाची लागण झाली तर १०० जणांत ५ टक्के लोकांत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे ५ टक्के लोक म्हणजे वयोवृद्ध, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, मधुमेह, हृदयविकार, टी.बी. यासारखे गंभीर आजार आहे. शहरात सध्या गंभीर आणि मृत्यू पावणाऱ्या रुग्णांत अशा रुग्णांचे प्रमाण अधिक दिसत आहे. त्यामुळे ९५ टक्के लोकांना कोरोनामुळे मृत्यू येण्याची शक्यता नाही. त्यामुळे खबरदारी आणि साध्या उपचारानेही कोरोना बरा होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. 

शंका आल्यानंतर तपासणीशहरात मृत्यूनंतर काहींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे दिसून आले. केवळ शंकेवरून स्वॅब घेण्यात आले आणि ते पॉझिटिव्ह आले. मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपर्कातील लोकांची तपासणी करून खबरदारी घेतली जाते. काही प्रकरणांत संपर्कातील अन्य लोक पॉझिटिव्ह आले, तर काही प्रकरणात मृताशिवाय कोणीही बाधित आढळून आले नाही. असे का होत आहे, याचा शोध घेण्याची गरज असून, मृत्यूनंतर स्वॅब घेणे हे आरोग्य यंत्रणेचे अपयश असल्याची टीकाही होत आहे. 

निदान, उपचाराला उशीरमृत्यूनंतर एखाद्याला कोरोना आहे, हे कळणे, हे अपयश आहे. मृत्यूच्या आधीच का कळले नाही. डॉक्टरांच्या संशयावरून तपासणी केली जाते आणि तेव्हा ते पॉझिटिव्ह आढळून येतात. नातेवाईक आणि संपर्कातील लोकांची तपासणी करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे; पण मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह येणे म्हणजे रुग्णाचे निदान, उपचार करण्यास उशीर झाला. त्यामुळे हे अपयशच आहे. मृत्यूनंतर स्वॅब घेणे हे अधिक सोपे असते. - डॉ. अमोल अन्नदाते, आरोग्य विश्लेषक 

...तर कोरोनाला विसरून जाकोरोना पॉझिटिव्ह, मात्र ज्यांना ३ ते ५ दिवसांत ताप, उलटी, शौच, श्वास घेण्यास त्रास असे काही नसेल तर त्यांनी घाबरून जाता कामा नये. आपले शरीरच प्रतिकारशक्तीद्वारे आजार बरा करीत असते. सकस आहार घ्यावा. गंभीर रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याची खरी गरज आहे. या आजाराचा विनाकारण बाऊ झाला आहे. लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आला आणि ३ ते ५ दिवसांत काही लक्षणे नसेल तर कोरोना झाला आहे, हे विसरून गेले पाहिजे. - डॉ. विजय दहिफळे, सुपरस्पेशालिस्ट 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य