शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लक्षणे नसताना पॉझिटिव्ह असणे म्हणजे? आरोग्य वर्तुळातूनही प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:21 IST

लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार आतापर्यंत अनेकांना होऊन गेलेला असेल आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल, असेही डॉक्टरांनी सांगितले. 

ठळक मुद्देमृत्यूनंतर स्वॅब घेणे व तो पॉझिटिव्ह येणे, हे यंत्रणेचे अपयशलागण झाली तर १०० जणांत ५ टक्के लोकांत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : शहरात कोरोनाची लक्षणे नसताना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. शहरात सध्या अशी लक्षणे नसलेल्या रुग्णांचीच संख्या जास्त आहे. त्यामुळे लक्षणे नसताना पॉझिटिव्ह असणे, याविषयी सर्वसामान्य नागरिकांबरोबर आरोग्य वर्तुळातूनही प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांना काही होणार नाही, असे म्हणणे चुकीचे असून त्यांच्यामुळे इतरांना बाधा होण्याची शक्यता असते, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जाते. तर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर हा आजार आपोआप बरा होऊ शकतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यावर भर दिला जात आहे; परंतु सध्या लक्षणे नसलेल्या रुग्णांविषयी विनाकारण बाऊ केला जात असल्याचे स्वत: डॉक्टर म्हणत आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांपासून कोणताही धोका नसतो. त्यामुळेच सध्या सौम्य व अतिसौम्य व लक्षणे नसलेल्या रुग्णांना ताप नसल्यास व आॅक्सिजनचे प्रमाण ९५ टक्के असल्यास दहाव्या दिवशी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येत आहे. तेही कोणत्या तपसणीशिवाय, असे डॉक्टरांनी सांगितले. कोरोना हा साधा सर्दीचा आजार आहे. यात ताप, दम लागणे आणि अन्य काही लक्षणे दिसत आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार आतापर्यंत अनेकांना होऊन गेलेला असेल आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल, असेही डॉक्टरांनी सांगितले. 

केवळ ५ टक्के गंभीरकोरोनाची लागण झाली तर १०० जणांत ५ टक्के लोकांत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे ५ टक्के लोक म्हणजे वयोवृद्ध, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, मधुमेह, हृदयविकार, टी.बी. यासारखे गंभीर आजार आहे. शहरात सध्या गंभीर आणि मृत्यू पावणाऱ्या रुग्णांत अशा रुग्णांचे प्रमाण अधिक दिसत आहे. त्यामुळे ९५ टक्के लोकांना कोरोनामुळे मृत्यू येण्याची शक्यता नाही. त्यामुळे खबरदारी आणि साध्या उपचारानेही कोरोना बरा होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. 

शंका आल्यानंतर तपासणीशहरात मृत्यूनंतर काहींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे दिसून आले. केवळ शंकेवरून स्वॅब घेण्यात आले आणि ते पॉझिटिव्ह आले. मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपर्कातील लोकांची तपासणी करून खबरदारी घेतली जाते. काही प्रकरणांत संपर्कातील अन्य लोक पॉझिटिव्ह आले, तर काही प्रकरणात मृताशिवाय कोणीही बाधित आढळून आले नाही. असे का होत आहे, याचा शोध घेण्याची गरज असून, मृत्यूनंतर स्वॅब घेणे हे आरोग्य यंत्रणेचे अपयश असल्याची टीकाही होत आहे. 

निदान, उपचाराला उशीरमृत्यूनंतर एखाद्याला कोरोना आहे, हे कळणे, हे अपयश आहे. मृत्यूच्या आधीच का कळले नाही. डॉक्टरांच्या संशयावरून तपासणी केली जाते आणि तेव्हा ते पॉझिटिव्ह आढळून येतात. नातेवाईक आणि संपर्कातील लोकांची तपासणी करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे; पण मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह येणे म्हणजे रुग्णाचे निदान, उपचार करण्यास उशीर झाला. त्यामुळे हे अपयशच आहे. मृत्यूनंतर स्वॅब घेणे हे अधिक सोपे असते. - डॉ. अमोल अन्नदाते, आरोग्य विश्लेषक 

...तर कोरोनाला विसरून जाकोरोना पॉझिटिव्ह, मात्र ज्यांना ३ ते ५ दिवसांत ताप, उलटी, शौच, श्वास घेण्यास त्रास असे काही नसेल तर त्यांनी घाबरून जाता कामा नये. आपले शरीरच प्रतिकारशक्तीद्वारे आजार बरा करीत असते. सकस आहार घ्यावा. गंभीर रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याची खरी गरज आहे. या आजाराचा विनाकारण बाऊ झाला आहे. लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आला आणि ३ ते ५ दिवसांत काही लक्षणे नसेल तर कोरोना झाला आहे, हे विसरून गेले पाहिजे. - डॉ. विजय दहिफळे, सुपरस्पेशालिस्ट 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य