शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

काय हा ताप हो! हे छत्रपती संभाजीनगरचे रेल्वे स्टेशन की रिक्षा स्टेशन? 

By संतोष हिरेमठ | Updated: December 4, 2024 12:38 IST

रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा : रेल्वे येण्याच्या वेळेत ८० रिक्षांचा प्रवेशद्वाराला विळखा, शहरात येणाऱ्या पाहुण्यांना प्रचंड त्रास

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन हे खरेच रेल्वेस्थानक आहे की, रिक्षांचे स्टेशन आहे, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. कारण या ठिकाणी रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणामुळे शहरात येणाऱ्या पाहुण्यांना म्हणजेच रेल्वे प्रवाशांना आणि परदेशी पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराकडे ना रेल्वे प्रशासनाचे लक्ष आहे, ना पोलिसांचे. त्यामुळे रिक्षाचालकांना शिस्त कोण लावणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

रेल्वे येण्याच्या वेळेत ८० रिक्षा आणि चालकांचा स्टेशनच्या प्रवेशद्वाराला विळखा पडतो. रेल्वेतून उतरून प्रवासी स्टेशनबाहेर पडण्यासाठी प्रवेशद्वारापर्यंत येत नाही तोच थेट आतमध्ये आलेले रिक्षाचालक ‘कुठे जायचे, बाबा आहे का, वाळूज आहे का?’ असे म्हणत मागे लागतात. प्रवाशाने नाही म्हटले तरी एकेका रिक्षाचालकांकडून विचारणा सुरूच राहते. स्टेशनच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर अस्ताव्यस्त अवस्थेत उभ्या केलेल्या रिक्षा दिसतात. अनेक रिक्षाचालक घेरून प्रवाशांच्या मागे लागतात. या सगळ्यांचा दुचाकी, चारचाकी घेऊन प्रवाशांना नेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बॅरिकेड्स लावून दुचाकी अडवितात, रिक्षाला अभयरेल्वे स्टेशनवर प्रवेश करताच समोर बॅरिकेड्स लावलेले पाहायला मिळतात. दुचाकी वाहने पार्किंगमध्ये लावण्याची जणू सक्तीच करण्यात आलेली आहे. दुचाकीवरून प्रवाशास स्टेशन इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडता येत नाही. त्याउलट रिक्षाचालक थेट आतपर्यंत घुसखोरी करीत आहेत.

पोलिस चौकी नावालाचस्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर पोलिस चौकी आहे. मात्र, या ठिकाणी पोलिस कर्मचारी नसतात. आजघडीला ही चौकी अस्वच्छतेच्या विळख्यात आहे. या ठिकाणी भिक्षेकरी बसतात.

रेल्वे सुरक्षा बल काय करते?स्टेशन परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) असते; परंतु एखाद्या मोहिमेपुरतेच रेल्वे सुरक्षा बल रिक्षाचालकांवर कारवाई करते. त्यामुळे रिक्षाचालकांना कुणाचीही भीती उरलेली नाही.

प्रवेशद्वारावर कोंडीरेल्वे स्टेशनमध्ये येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रवेशद्वारांसमोर रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यातून प्रवाशांना स्टेशनमध्ये येताना आणि बाहेर पडताना मोठी कसरत करावी लागते.

...तर गुन्हे दाखल कराकोणताही रिक्षाचालक चुकीचे वागत असेल तर कारवाई करावी. पूर्णवेळ व्यवसाय म्हणून रिक्षा चालविणारे नियमांचे पालन करतात. मात्र, पार्टटाइम रिक्षा चालविणारे बेशिस्त वागतात. लायसेन्स, बॅज, क्यूआर काेडची तपासणी केली पाहिजे. लायसेन्स, बॅज नसताना रिक्षा चालवीत असल्याचे कुणी आढळले तर थेट रिक्षामालकांवर गुन्हे दाखल करावेत.- निसार अहेमद खान, अध्यक्ष, रिक्षा चालक-मालक महासंघ

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनTrafficवाहतूक कोंडी