शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

२५ कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च झालेल्या औरंगाबाद, जालन्यातील समृध्दीसाठी वेट ॲण्ड वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 18:38 IST

समृध्दी महामार्गाच्या औरंगाबाद ते जालना जिल्ह्यातील १५४ कि.मी.च्या अंतरात ३९०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे

औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील १५४ कि.मी. अंतरातील समृध्दी महामार्ग वाहतुकीला खुला होण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे. नागपूर ते सेलू बाजार (जि. वाशिम)पर्यंतचे लोकार्पण लांबणीवर पडल्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील महामार्गाचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी मुदत मिळाली आहे. सावंगी-हर्सूल इंटरचेंज वगळता महामार्गाचे काम पूर्ण होत आले असून १ जुलैपर्यंत ते संपेल, असा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी केला.

एल ॲण्ड टी या कंत्राटदार कंपनीकडील काम पूर्ण झाले आहे. १ हजार ९०० कोटी रुपयांचे काम या कंपनीकडे होते. तर मेघा कन्स्ट्रक्शन्स कंपनीकडे अंदाजे २ हजार कोटींचे काम होते, त्यातील इंटरचेंजचे काम पूर्ण करणे बाकी आहे. वैजापूरपर्यंतचे काम औरंगाबाद जिल्ह्यात आहे. ११२ कि.मी.पर्यंतचा रस्ता औरंगाबाद जिल्ह्यातून आहे. उर्वरित जालना जिल्ह्यात आहे.

२५ कोटी प्रति किलोमीटरचा खर्चसमृध्दी महामार्गाच्या औरंगाबाद ते जालना जिल्ह्यातील १५४ कि.मी.च्या अंतरात ३९०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, २५ कोटी रुपये प्रति किलोमीटरचा खर्च या महामार्गाच्या बांधणीवर झाला आहे. हर्सूल-सावंगी येथील इंटरचेंज वगळता बाकीचे काम पूर्ण झाले असून, या दोन्ही जिल्ह्यांतील महामार्ग लोकार्पणासाठी तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नागपूर ते वाशिमपर्यंतचे लाेकार्पण लांबणीवर पडल्यामुळे इंटरचेंजचे काम करण्यास वेळ मिळाला आहे.

पूर्ण महामार्ग तपासणारमहामार्गासाठी सर्वंकष समिती आहे. वाहनांसाठी १५० कि.मी. ताशी वेगाची परवानगी या मार्गावर आहे. ७१० पैकी ४०७ कि.मी.चा मार्ग वाहतुकीसाठी तयार आहे. यासाठी समिती पूर्ण अंगाने स्ट्रक्चर तपासणी करील. याला दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता १०० टक्के काम पूर्ण झाल्यावरच मार्ग वाहतुकीला खुला होईल, असे बोलले जात आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग