शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

करमाडच्या आठवडी बाजारावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 20:44 IST

सोमवारी भरलेल्या करमाडच्या बाजारात तब्बल ३० ते ४० टक्के विक्री कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

शेंद्रा : दुष्काळाचा परिणाम पोळा सणावर दिसून येत असून, सोमवारी भरलेल्या करमाडच्या बाजारात तब्बल ३० ते ४० टक्के विक्री कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. यावरुन दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे.

शेती, पशुधन आणि शेतकरी यांचे अतूट नाते आहे. यांत्रिकीकरण झाले असले तरी अजूनही पशुधनाचे महत्त्व कमी झालेले नाही. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सिंहाचा वाटा असणारा त्याच्या परिवारातील सदस्य म्हणून बैलाची ओळख आहे. अशा बैलाची पुज्याकरून ऋण फेडण्याचे काम पोळा सणाच्या निमित्ताने शेतकरी करतात. या सणानिमित्त बैलांना सजविण्यात येते.

यासाठी शेतकरी विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी करतात. परिसरातील ३० गावांतील शेतकरी करमाडच्या आठवडी बाजरातून बैलांना सजवण्याचे साहित्य खरेदी करतात. परंतु यावर्षीच्या आठवडी बाजारात शेतकºयांनी साहित्य खरेदीस हात आखडता घेतल्याचे दिसत आहे. ईच्छा असूनसुद्धा पैशांअभावी ही परिस्थिती शेतकºयांवर ओढवली आहे. सोमवारी भरलेल्या आठवडी बाजारात ३० ते ४० टक्के विक्री कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

व्यापाºयांनी बैलांच्या शिंगाला लावण्यासाठी आॅइल पेंटचे कलर , चमचमीत बेगडे , गळ्यात घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घागरमाळा, बाशिंग , घुंगरू, गोंडे , घंट्या, ताग, सुती आदी वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. परंतु याची विक्रीच समाधानकारक झाली नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले.बैलांना धुण्यासाठी टँकरचे पाणीऔरंगाबाद तालुक्यात शेकटा, देमणी वाहेगाव, कवडगाव , गोलटगाव अशा अनेक गावांतील तलावात, विहरित थेंबही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे बैलांना धुण्यासाठी टँकरने विकत पाणी आणावे लागणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार