शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

लग्नसोहळ्यात हाणामारी

By admin | Updated: May 26, 2014 00:57 IST

औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे लग्नसोहळा पार पडल्यानंतर एका युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.

औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे लग्नसोहळा पार पडल्यानंतर एका युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात वºहाडींना काठ्या- कुºहाडी, गजाने मारहाण झाली असून एक चारचाकीसह आॅटोरिक्षावर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. कल्याण फत्रीपूर- साकी नाका येथील रमाकांत नरवाडे याचा विवाह २५ मे रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील खिल्लारे कुटुंबातील युवतीसोबत आयोजित करण्यात आला होता. लग्नाला उशीर होवून दुपारी २.३० वाजता पार पडले. त्यानंतर लग्नमंडपामध्ये जेवणाच्या पंगती सुरू असताना गावातील दोघांंनी नवरदेवाकडील युवतीची छेड काढली. हा प्रकार समजल्यानंतर सदरील युवतीच्या भावाने त्याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता गावातील लोकांनी त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर वºहाडी मंडळी आणि ग्रामस्थ यांच्यात हाणामारीचा प्रकार घडला. दरम्यान, नवरदेवाकडील काहीजण जीप क्र. एम. एच. ०५- एएस ७५१ व एका आॅटोरिक्षातून जात असताना जमावाने त्यांच्यावर पुन्हा हल्ला चढविला. यात काठ्या, कुºहाडी, गज हातात घेवून आलेल्या जमावाने वºहाडींना बेदम मारहाण करून दोन्ही वाहनांची तोडफोड केली.यात जवळपास ५० वºहाडी जखमी झाले असून यातील गौतम फुलोरे (२५ रा. कल्याण), अनुराग अशोक पाटील (२५, औरंगाबाद), ज्ञानेश्वर रामप्रसाद नरवाडे (१८, जालना), प्रियंका चंद्रकांत नरवाडे (२१, कल्याण), विद्या रामप्रसाद नरवाडे (१५, जालना), वैभव आसाराम नरवाडे (२१, कल्याण), प्रशांत ज्ञानदेव सपकाळ (२२, कल्याण) यांना गंभीर दुखापत झाल्याने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश वाकळे यांनी जखमींवर उपचार केले. घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश मोरे, औंढा ठाण्याचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, जमादार नुरखाँ पठाण, शंकर इंगोले, रुपेश गरुड, भीमराव चिंतारे यांनी गोजेगाव येथे धाव देवून जखमींना दवाखान्यात नेले. या प्रकरणी आरोपी राजू भगवान जायभाय व सुभाष जायभाय यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (वार्ताहर)लग्नमंडपामध्ये जेवणाच्या पंगती सुरू असताना गावातील दोन युवकांनी नवरदेवाकडून आलेल्या युवतीची छेड काढली युवतीच्या भावाने त्याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता गावातील लोकांनी त्याला जबर मारहाण केली वºहाडींनाही मारहाण झालीनवरदेवाकडील काहीजण चारचाकी वाहनातून जात असताना जमावाने त्यांच्यावर पुन्हा हल्ला चढविला मारहाणीत जवळपास ५० वºहाडी जखमी झाले असून सात जणांंना गंभीर दुखापत झाल्याने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेबाबत माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी गावात पोहोचले या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद नव्हता दोन जखमींना पुढील उपचारासाठी परभणीला हलविले