शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

लग्नसोहळ्यात हाणामारी

By admin | Updated: May 26, 2014 00:57 IST

औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे लग्नसोहळा पार पडल्यानंतर एका युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.

औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे लग्नसोहळा पार पडल्यानंतर एका युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात वºहाडींना काठ्या- कुºहाडी, गजाने मारहाण झाली असून एक चारचाकीसह आॅटोरिक्षावर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. कल्याण फत्रीपूर- साकी नाका येथील रमाकांत नरवाडे याचा विवाह २५ मे रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील खिल्लारे कुटुंबातील युवतीसोबत आयोजित करण्यात आला होता. लग्नाला उशीर होवून दुपारी २.३० वाजता पार पडले. त्यानंतर लग्नमंडपामध्ये जेवणाच्या पंगती सुरू असताना गावातील दोघांंनी नवरदेवाकडील युवतीची छेड काढली. हा प्रकार समजल्यानंतर सदरील युवतीच्या भावाने त्याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता गावातील लोकांनी त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर वºहाडी मंडळी आणि ग्रामस्थ यांच्यात हाणामारीचा प्रकार घडला. दरम्यान, नवरदेवाकडील काहीजण जीप क्र. एम. एच. ०५- एएस ७५१ व एका आॅटोरिक्षातून जात असताना जमावाने त्यांच्यावर पुन्हा हल्ला चढविला. यात काठ्या, कुºहाडी, गज हातात घेवून आलेल्या जमावाने वºहाडींना बेदम मारहाण करून दोन्ही वाहनांची तोडफोड केली.यात जवळपास ५० वºहाडी जखमी झाले असून यातील गौतम फुलोरे (२५ रा. कल्याण), अनुराग अशोक पाटील (२५, औरंगाबाद), ज्ञानेश्वर रामप्रसाद नरवाडे (१८, जालना), प्रियंका चंद्रकांत नरवाडे (२१, कल्याण), विद्या रामप्रसाद नरवाडे (१५, जालना), वैभव आसाराम नरवाडे (२१, कल्याण), प्रशांत ज्ञानदेव सपकाळ (२२, कल्याण) यांना गंभीर दुखापत झाल्याने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश वाकळे यांनी जखमींवर उपचार केले. घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश मोरे, औंढा ठाण्याचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, जमादार नुरखाँ पठाण, शंकर इंगोले, रुपेश गरुड, भीमराव चिंतारे यांनी गोजेगाव येथे धाव देवून जखमींना दवाखान्यात नेले. या प्रकरणी आरोपी राजू भगवान जायभाय व सुभाष जायभाय यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (वार्ताहर)लग्नमंडपामध्ये जेवणाच्या पंगती सुरू असताना गावातील दोन युवकांनी नवरदेवाकडून आलेल्या युवतीची छेड काढली युवतीच्या भावाने त्याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता गावातील लोकांनी त्याला जबर मारहाण केली वºहाडींनाही मारहाण झालीनवरदेवाकडील काहीजण चारचाकी वाहनातून जात असताना जमावाने त्यांच्यावर पुन्हा हल्ला चढविला मारहाणीत जवळपास ५० वºहाडी जखमी झाले असून सात जणांंना गंभीर दुखापत झाल्याने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेबाबत माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी गावात पोहोचले या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद नव्हता दोन जखमींना पुढील उपचारासाठी परभणीला हलविले