औंढा नागनाथ : तालुक्यातील गोजेगाव येथे लग्नसोहळा पार पडल्यानंतर एका युवतीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात वºहाडींना काठ्या- कुºहाडी, गजाने मारहाण झाली असून एक चारचाकीसह आॅटोरिक्षावर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. कल्याण फत्रीपूर- साकी नाका येथील रमाकांत नरवाडे याचा विवाह २५ मे रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील खिल्लारे कुटुंबातील युवतीसोबत आयोजित करण्यात आला होता. लग्नाला उशीर होवून दुपारी २.३० वाजता पार पडले. त्यानंतर लग्नमंडपामध्ये जेवणाच्या पंगती सुरू असताना गावातील दोघांंनी नवरदेवाकडील युवतीची छेड काढली. हा प्रकार समजल्यानंतर सदरील युवतीच्या भावाने त्याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता गावातील लोकांनी त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर वºहाडी मंडळी आणि ग्रामस्थ यांच्यात हाणामारीचा प्रकार घडला. दरम्यान, नवरदेवाकडील काहीजण जीप क्र. एम. एच. ०५- एएस ७५१ व एका आॅटोरिक्षातून जात असताना जमावाने त्यांच्यावर पुन्हा हल्ला चढविला. यात काठ्या, कुºहाडी, गज हातात घेवून आलेल्या जमावाने वºहाडींना बेदम मारहाण करून दोन्ही वाहनांची तोडफोड केली.यात जवळपास ५० वºहाडी जखमी झाले असून यातील गौतम फुलोरे (२५ रा. कल्याण), अनुराग अशोक पाटील (२५, औरंगाबाद), ज्ञानेश्वर रामप्रसाद नरवाडे (१८, जालना), प्रियंका चंद्रकांत नरवाडे (२१, कल्याण), विद्या रामप्रसाद नरवाडे (१५, जालना), वैभव आसाराम नरवाडे (२१, कल्याण), प्रशांत ज्ञानदेव सपकाळ (२२, कल्याण) यांना गंभीर दुखापत झाल्याने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश वाकळे यांनी जखमींवर उपचार केले. घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश मोरे, औंढा ठाण्याचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, जमादार नुरखाँ पठाण, शंकर इंगोले, रुपेश गरुड, भीमराव चिंतारे यांनी गोजेगाव येथे धाव देवून जखमींना दवाखान्यात नेले. या प्रकरणी आरोपी राजू भगवान जायभाय व सुभाष जायभाय यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (वार्ताहर)लग्नमंडपामध्ये जेवणाच्या पंगती सुरू असताना गावातील दोन युवकांनी नवरदेवाकडून आलेल्या युवतीची छेड काढली युवतीच्या भावाने त्याबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता गावातील लोकांनी त्याला जबर मारहाण केली वºहाडींनाही मारहाण झालीनवरदेवाकडील काहीजण चारचाकी वाहनातून जात असताना जमावाने त्यांच्यावर पुन्हा हल्ला चढविला मारहाणीत जवळपास ५० वºहाडी जखमी झाले असून सात जणांंना गंभीर दुखापत झाल्याने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेबाबत माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी गावात पोहोचले या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद नव्हता दोन जखमींना पुढील उपचारासाठी परभणीला हलविले
लग्नसोहळ्यात हाणामारी
By admin | Updated: May 26, 2014 00:57 IST