शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

विचार सक्षम असणे गरजेचे ; दीड वर्षात ४६ तरुण-तरुणींचा दिव्यांगांसोबत विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 13:13 IST

सामाजिक जोखडाला झुगारून देत युवक युवतींचा धाडसी निर्णय

ठळक मुद्देशरीरापेक्षा विचार सक्षम असणे गरजेचे असल्याचे जोडीदारांचे मतशासनाकडूनही राबविण्यात येत आहेत प्रोत्साहनपर विविध योजना

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : विवाह दोन व्यक्तींच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचा क्षण. विवाह म्हटला की, मुला-मुलींसाठी स्थळ पाहणी करताना शिक्षण, नोकरी, घराणे याबरोबरच वय, उंची आणि सौंदर्याकडे आजही चौकसपणे पाहिले जाते. शोभेशी उंची नसली तरी नकार दिला जातो. सामाजिक जोखडाला झुगारून देत औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात ४६ सुदृढ युवक-युवतींनी दिव्यांगांना आपले जीवनसाथी करून आनंदाने संसार फुलवला.

परंपरेने रूढ जोडीदार निवडीचे अनेक निकष आजही पाळले जातात. उपवरांचे वय, उंची, शिक्षण याबाबत पुरुष हा स्त्रियांपेक्षा वरचढ असावा अशीच परंपरा आहे. पुढे कुळ, गोत्र, सौंदर्य, शिक्षण, घराणे, पगार, नोकरी अथवा व्यवसाय, सामाजिक स्तर, संपत्ती, शेती, वगैरे गोष्टी तपासल्या जातात. या सगळ्यानंतर जन्मपत्रिका जुळते का? हे पाहूनच विवाहाची पुढची पायरी गाठली जाते. मात्र, या सगळ्या गोष्टींना छेद देत अनेकांनी भावी जोडीदार म्हणून दिव्यांगांची निवड केली. 

कुटुंबियांचे पाठबळलग्न म्हटले की, दोन जीवांचे मिलन, दो हंसो का जोडा असे म्हटले जाते; परंतु भिन्न परिस्थिती असेल तर विवाह जुळणे अशक्य होते. दिव्यांगांसोबत विवाह करण्याचा निर्णय घेताना अनेकांना कुटुंबियांचे पाठबळ आणि एकमेकांच्या संमतीमुळेच विवाह जुळल्याचे काहींनी सांगितले. प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे म्हणाले, दिव्यांगांच्या विवाहाचा प्रश्न मोठा आहे. दिव्यांगत्व, त्यांच्या रोजगाराच्या प्रश्नाने विवाहाचे प्रमाण कमीच आहे. दिव्यांग वधू-वरांच्या विवाहालादेखील या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.

माझ्यापेक्षा ‘तिचा’ होकार ठरला महत्त्वपूर्णअपघातामुळे उजव्या पायाला दिव्यांगत्व आलेले विलास गायके यांचा वर्षभरापूर्वी गायत्री यांच्यासोबत विवाह झाला. विलास गायके म्हणाले, जेव्हा माझ्या लग्नासाठी स्थळ पाहणी सुरू झाली, तेव्हा मी माझ्या होकारापेक्षा मुलीच्या होकाराला अधिक महत्त्व देण्याचा निश्चय केला होता. माझ्या दिव्यांगत्वाची कल्पना असूनही, गायत्रीने लग्नासाठी होकार दिला. तेव्हा तिने शरीर सक्षम असण्यापेक्षा विचार सक्षम पाहिजेत, असे म्हटले होते. हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे मला वाटते. आज आमचा संसार आनंदात सुरू आहे. माझे शिक्षण एम.ए.पर्यंत झालेले असून, मी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याचे विलास गायके यांनी सांगितले.

शासनाचीही मदतदिव्यांगांसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये शासनाने दिव्यांग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहांना प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केली. यात दिव्यांगाशी सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास ५० हजार रुपये मदत केली जाते.४दिव्यांगांच्या सामाजिक सुरक्षेचा एक भाग म्हणून आणि दिव्यांगांना कौटुंबिक जीवन सुलभ पार पाडता यावे यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात ही योजना राबविली जात आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३३ जणांनी दिव्यांगांसोबत विवाह केला, तर यावर्षी आतापर्यंत १३ जणांचा विवाह झाला. ४यामध्ये ८ जणांना योजनेचा लाभ मिळण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आली. या योजनेची अनेकांना आजही कल्पना नाही. त्यामुळे दिव्यांगांसोबत केलेल्या विवाहांची संख्या अधिक असण्याची शक्यताही वर्तविण्यात येते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDivyangदिव्यांगmarriageलग्न