शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
15
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
16
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
17
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
18
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
19
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
20
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?

विचार सक्षम असणे गरजेचे ; दीड वर्षात ४६ तरुण-तरुणींचा दिव्यांगांसोबत विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 13:13 IST

सामाजिक जोखडाला झुगारून देत युवक युवतींचा धाडसी निर्णय

ठळक मुद्देशरीरापेक्षा विचार सक्षम असणे गरजेचे असल्याचे जोडीदारांचे मतशासनाकडूनही राबविण्यात येत आहेत प्रोत्साहनपर विविध योजना

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : विवाह दोन व्यक्तींच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचा क्षण. विवाह म्हटला की, मुला-मुलींसाठी स्थळ पाहणी करताना शिक्षण, नोकरी, घराणे याबरोबरच वय, उंची आणि सौंदर्याकडे आजही चौकसपणे पाहिले जाते. शोभेशी उंची नसली तरी नकार दिला जातो. सामाजिक जोखडाला झुगारून देत औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात ४६ सुदृढ युवक-युवतींनी दिव्यांगांना आपले जीवनसाथी करून आनंदाने संसार फुलवला.

परंपरेने रूढ जोडीदार निवडीचे अनेक निकष आजही पाळले जातात. उपवरांचे वय, उंची, शिक्षण याबाबत पुरुष हा स्त्रियांपेक्षा वरचढ असावा अशीच परंपरा आहे. पुढे कुळ, गोत्र, सौंदर्य, शिक्षण, घराणे, पगार, नोकरी अथवा व्यवसाय, सामाजिक स्तर, संपत्ती, शेती, वगैरे गोष्टी तपासल्या जातात. या सगळ्यानंतर जन्मपत्रिका जुळते का? हे पाहूनच विवाहाची पुढची पायरी गाठली जाते. मात्र, या सगळ्या गोष्टींना छेद देत अनेकांनी भावी जोडीदार म्हणून दिव्यांगांची निवड केली. 

कुटुंबियांचे पाठबळलग्न म्हटले की, दोन जीवांचे मिलन, दो हंसो का जोडा असे म्हटले जाते; परंतु भिन्न परिस्थिती असेल तर विवाह जुळणे अशक्य होते. दिव्यांगांसोबत विवाह करण्याचा निर्णय घेताना अनेकांना कुटुंबियांचे पाठबळ आणि एकमेकांच्या संमतीमुळेच विवाह जुळल्याचे काहींनी सांगितले. प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे म्हणाले, दिव्यांगांच्या विवाहाचा प्रश्न मोठा आहे. दिव्यांगत्व, त्यांच्या रोजगाराच्या प्रश्नाने विवाहाचे प्रमाण कमीच आहे. दिव्यांग वधू-वरांच्या विवाहालादेखील या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.

माझ्यापेक्षा ‘तिचा’ होकार ठरला महत्त्वपूर्णअपघातामुळे उजव्या पायाला दिव्यांगत्व आलेले विलास गायके यांचा वर्षभरापूर्वी गायत्री यांच्यासोबत विवाह झाला. विलास गायके म्हणाले, जेव्हा माझ्या लग्नासाठी स्थळ पाहणी सुरू झाली, तेव्हा मी माझ्या होकारापेक्षा मुलीच्या होकाराला अधिक महत्त्व देण्याचा निश्चय केला होता. माझ्या दिव्यांगत्वाची कल्पना असूनही, गायत्रीने लग्नासाठी होकार दिला. तेव्हा तिने शरीर सक्षम असण्यापेक्षा विचार सक्षम पाहिजेत, असे म्हटले होते. हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे मला वाटते. आज आमचा संसार आनंदात सुरू आहे. माझे शिक्षण एम.ए.पर्यंत झालेले असून, मी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याचे विलास गायके यांनी सांगितले.

शासनाचीही मदतदिव्यांगांसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये शासनाने दिव्यांग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहांना प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केली. यात दिव्यांगाशी सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास ५० हजार रुपये मदत केली जाते.४दिव्यांगांच्या सामाजिक सुरक्षेचा एक भाग म्हणून आणि दिव्यांगांना कौटुंबिक जीवन सुलभ पार पाडता यावे यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात ही योजना राबविली जात आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३३ जणांनी दिव्यांगांसोबत विवाह केला, तर यावर्षी आतापर्यंत १३ जणांचा विवाह झाला. ४यामध्ये ८ जणांना योजनेचा लाभ मिळण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आली. या योजनेची अनेकांना आजही कल्पना नाही. त्यामुळे दिव्यांगांसोबत केलेल्या विवाहांची संख्या अधिक असण्याची शक्यताही वर्तविण्यात येते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDivyangदिव्यांगmarriageलग्न