शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘चाललो’ म्हणायला हरकत नाही, पण जायचं कुठं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:07 IST

युतीसाठी मी प्रयत्न केले, अन् मलाच वाऱ्यावर सोडले

ठळक मुद्देमला डावलण्याची भाजप- सेनेची भूमिका अयोग्य कमळ चिन्हावर लढणार नाही जागा सोडल्याशिवाय मी नाही सोडणार तुमचा पिच्छा

औरंगाबाद/जालना : भाजप- शिवसेनेने मला अडचणीत आणलंय. मी त्यांची भूमिका देशभर मांडतोय. पण मला मात्र ते डावलताहेत, हे योग्य नाही. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाखातर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली. आता उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माझ्यासाठी दक्षिण- मध्य मुंबईची जागा सोडली पाहिजे. नाही तर ईशान्य मुंबईमधून मी लढू इच्छितो. ती तरी सोडावी, अशी विनवणी करून रिपाइं (ए) चे राष्ट्रीय  अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी २५ फेब्रुवारी रोजी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी पुढील निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. ‘यांना’ चाललो म्हणायलाही हरकत नाही, पण जायचं कुठं हाही प्रश्न आहेच’ अशी हतबलताही त्यांनी औरंगाबादेत व्यक्त केली. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आठवले हे गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यात गेले होते. तसेच जालना येथे समाजकल्याण खात्यांतर्गत दिव्यांगांना साहित्य वाटप करून ते दुपारी औरंगाबादला आले होते. दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला.

ते म्हणाले, युती करताना मला विश्वासात तर घेतले गेले नाहीच. शिवाय माझ्यासाठी एकही जागा सोडली नाही. ही भूमिका नाराज करण्यासारखी आहे, धक्का देणारी आहे. जास्त जागा मागून युतीला अडचणीत न आणण्याची माझी भूमिका असतानाही मला एकही जागा न सोडण्याचा निर्णय हा अन्याय होय. त्यांच्या सिटिंगच्या जागा सोडायला ते तयार नाहीत. पण फिटिंग करण्याचं काम माझ्याकडे आहे, हे त्यांनी विसरू नये. मागच्या विधानसभा निवडणुकीत आठ जागा रिपाइं (ए) ला देण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. रिपाइंचे उमेदवार थोड्या थोड्या मतांनी पराभूत झाले. आता विधानसभेच्या कुठल्या जागा देणार हे माहीत नाही. आम्हाला टाळून त्यांना चालणार नाही. मग कुणाला निवडायचे व पाडायचे हे आम्ही ठरवू. रिपाइंच्या दोघांना सहा सहा महिने मंत्री करतो म्हणाले होते, तेही झाले नाही. त्यातील सहा महिने निघूनही गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कमळ चिन्हावर लढणार नाही मला एखादी जागा मिळाली तर मी कमळ चिन्हावर लढणार नाही. रिपाइंच्या चिन्हावरच लढेन. तसेच  युतीने वा आघाडीने मला बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात लढा असे सांगितले तरी मी त्यांच्या विरोधात लढणार नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे मतांच्या विभाजनाचा आपल्याला फायदा होणारच आहे, असे युतीच्या नेत्यांना वाटत असावे म्हणूनही मला डावलण्यात येत असावे, असा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला.

...सोडणार नाही तुमचा पिच्छाजालना येथे आपल्या मिश्कील स्वरात रामदास आठवले यांनी चारोळीच्या माध्यमातून युतीवर हल्ला केला. शिवसेना भाजपचे बरे चालले आहे... पण जरा आमचंही बघा. काहीही असले तरी मी नाही सोडणार तुमचा पिच्छा युती झाल्याने तुम्हारा हो गया अच्छा ... पण जागा सोडल्याशिवाय मी नाही सोडणार तुमचा पिच्छा... कारण मलाही लोकसभा लढविण्याची आहे इच्छा...

युतीसाठी मी प्रयत्न केले, अन् मलाच वाऱ्यावर सोडलेशिवसेना, भाजपाची युती व्हावी यासाठी मी प्रयत्न केले. मात्र, मलाच वाऱ्यावर सोडल्याची खंत रामदास आठवले यांनी गुरुवारी जालन्यात व्यक्त केली.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक