शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

‘चाललो’ म्हणायला हरकत नाही, पण जायचं कुठं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:07 IST

युतीसाठी मी प्रयत्न केले, अन् मलाच वाऱ्यावर सोडले

ठळक मुद्देमला डावलण्याची भाजप- सेनेची भूमिका अयोग्य कमळ चिन्हावर लढणार नाही जागा सोडल्याशिवाय मी नाही सोडणार तुमचा पिच्छा

औरंगाबाद/जालना : भाजप- शिवसेनेने मला अडचणीत आणलंय. मी त्यांची भूमिका देशभर मांडतोय. पण मला मात्र ते डावलताहेत, हे योग्य नाही. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाखातर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली. आता उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माझ्यासाठी दक्षिण- मध्य मुंबईची जागा सोडली पाहिजे. नाही तर ईशान्य मुंबईमधून मी लढू इच्छितो. ती तरी सोडावी, अशी विनवणी करून रिपाइं (ए) चे राष्ट्रीय  अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी २५ फेब्रुवारी रोजी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी पुढील निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. ‘यांना’ चाललो म्हणायलाही हरकत नाही, पण जायचं कुठं हाही प्रश्न आहेच’ अशी हतबलताही त्यांनी औरंगाबादेत व्यक्त केली. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आठवले हे गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यात गेले होते. तसेच जालना येथे समाजकल्याण खात्यांतर्गत दिव्यांगांना साहित्य वाटप करून ते दुपारी औरंगाबादला आले होते. दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला.

ते म्हणाले, युती करताना मला विश्वासात तर घेतले गेले नाहीच. शिवाय माझ्यासाठी एकही जागा सोडली नाही. ही भूमिका नाराज करण्यासारखी आहे, धक्का देणारी आहे. जास्त जागा मागून युतीला अडचणीत न आणण्याची माझी भूमिका असतानाही मला एकही जागा न सोडण्याचा निर्णय हा अन्याय होय. त्यांच्या सिटिंगच्या जागा सोडायला ते तयार नाहीत. पण फिटिंग करण्याचं काम माझ्याकडे आहे, हे त्यांनी विसरू नये. मागच्या विधानसभा निवडणुकीत आठ जागा रिपाइं (ए) ला देण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. रिपाइंचे उमेदवार थोड्या थोड्या मतांनी पराभूत झाले. आता विधानसभेच्या कुठल्या जागा देणार हे माहीत नाही. आम्हाला टाळून त्यांना चालणार नाही. मग कुणाला निवडायचे व पाडायचे हे आम्ही ठरवू. रिपाइंच्या दोघांना सहा सहा महिने मंत्री करतो म्हणाले होते, तेही झाले नाही. त्यातील सहा महिने निघूनही गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कमळ चिन्हावर लढणार नाही मला एखादी जागा मिळाली तर मी कमळ चिन्हावर लढणार नाही. रिपाइंच्या चिन्हावरच लढेन. तसेच  युतीने वा आघाडीने मला बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात लढा असे सांगितले तरी मी त्यांच्या विरोधात लढणार नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे मतांच्या विभाजनाचा आपल्याला फायदा होणारच आहे, असे युतीच्या नेत्यांना वाटत असावे म्हणूनही मला डावलण्यात येत असावे, असा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला.

...सोडणार नाही तुमचा पिच्छाजालना येथे आपल्या मिश्कील स्वरात रामदास आठवले यांनी चारोळीच्या माध्यमातून युतीवर हल्ला केला. शिवसेना भाजपचे बरे चालले आहे... पण जरा आमचंही बघा. काहीही असले तरी मी नाही सोडणार तुमचा पिच्छा युती झाल्याने तुम्हारा हो गया अच्छा ... पण जागा सोडल्याशिवाय मी नाही सोडणार तुमचा पिच्छा... कारण मलाही लोकसभा लढविण्याची आहे इच्छा...

युतीसाठी मी प्रयत्न केले, अन् मलाच वाऱ्यावर सोडलेशिवसेना, भाजपाची युती व्हावी यासाठी मी प्रयत्न केले. मात्र, मलाच वाऱ्यावर सोडल्याची खंत रामदास आठवले यांनी गुरुवारी जालन्यात व्यक्त केली.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक