शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

‘चाललो’ म्हणायला हरकत नाही, पण जायचं कुठं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 12:07 IST

युतीसाठी मी प्रयत्न केले, अन् मलाच वाऱ्यावर सोडले

ठळक मुद्देमला डावलण्याची भाजप- सेनेची भूमिका अयोग्य कमळ चिन्हावर लढणार नाही जागा सोडल्याशिवाय मी नाही सोडणार तुमचा पिच्छा

औरंगाबाद/जालना : भाजप- शिवसेनेने मला अडचणीत आणलंय. मी त्यांची भूमिका देशभर मांडतोय. पण मला मात्र ते डावलताहेत, हे योग्य नाही. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाखातर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली. आता उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माझ्यासाठी दक्षिण- मध्य मुंबईची जागा सोडली पाहिजे. नाही तर ईशान्य मुंबईमधून मी लढू इच्छितो. ती तरी सोडावी, अशी विनवणी करून रिपाइं (ए) चे राष्ट्रीय  अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी २५ फेब्रुवारी रोजी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी पुढील निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. ‘यांना’ चाललो म्हणायलाही हरकत नाही, पण जायचं कुठं हाही प्रश्न आहेच’ अशी हतबलताही त्यांनी औरंगाबादेत व्यक्त केली. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आठवले हे गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यात गेले होते. तसेच जालना येथे समाजकल्याण खात्यांतर्गत दिव्यांगांना साहित्य वाटप करून ते दुपारी औरंगाबादला आले होते. दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केला.

ते म्हणाले, युती करताना मला विश्वासात तर घेतले गेले नाहीच. शिवाय माझ्यासाठी एकही जागा सोडली नाही. ही भूमिका नाराज करण्यासारखी आहे, धक्का देणारी आहे. जास्त जागा मागून युतीला अडचणीत न आणण्याची माझी भूमिका असतानाही मला एकही जागा न सोडण्याचा निर्णय हा अन्याय होय. त्यांच्या सिटिंगच्या जागा सोडायला ते तयार नाहीत. पण फिटिंग करण्याचं काम माझ्याकडे आहे, हे त्यांनी विसरू नये. मागच्या विधानसभा निवडणुकीत आठ जागा रिपाइं (ए) ला देण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. रिपाइंचे उमेदवार थोड्या थोड्या मतांनी पराभूत झाले. आता विधानसभेच्या कुठल्या जागा देणार हे माहीत नाही. आम्हाला टाळून त्यांना चालणार नाही. मग कुणाला निवडायचे व पाडायचे हे आम्ही ठरवू. रिपाइंच्या दोघांना सहा सहा महिने मंत्री करतो म्हणाले होते, तेही झाले नाही. त्यातील सहा महिने निघूनही गेले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कमळ चिन्हावर लढणार नाही मला एखादी जागा मिळाली तर मी कमळ चिन्हावर लढणार नाही. रिपाइंच्या चिन्हावरच लढेन. तसेच  युतीने वा आघाडीने मला बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात लढा असे सांगितले तरी मी त्यांच्या विरोधात लढणार नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे मतांच्या विभाजनाचा आपल्याला फायदा होणारच आहे, असे युतीच्या नेत्यांना वाटत असावे म्हणूनही मला डावलण्यात येत असावे, असा अंदाज आठवले यांनी व्यक्त केला.

...सोडणार नाही तुमचा पिच्छाजालना येथे आपल्या मिश्कील स्वरात रामदास आठवले यांनी चारोळीच्या माध्यमातून युतीवर हल्ला केला. शिवसेना भाजपचे बरे चालले आहे... पण जरा आमचंही बघा. काहीही असले तरी मी नाही सोडणार तुमचा पिच्छा युती झाल्याने तुम्हारा हो गया अच्छा ... पण जागा सोडल्याशिवाय मी नाही सोडणार तुमचा पिच्छा... कारण मलाही लोकसभा लढविण्याची आहे इच्छा...

युतीसाठी मी प्रयत्न केले, अन् मलाच वाऱ्यावर सोडलेशिवसेना, भाजपाची युती व्हावी यासाठी मी प्रयत्न केले. मात्र, मलाच वाऱ्यावर सोडल्याची खंत रामदास आठवले यांनी गुरुवारी जालन्यात व्यक्त केली.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक