शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
3
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
4
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
5
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
6
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
7
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
8
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
10
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
11
"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...
12
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
13
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
14
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
15
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
16
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
17
Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
18
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
19
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
20
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही पण माणसं आहोत’; जकात नाका परिसरात कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 17:07 IST

नागरिकांना कचऱ्याचा त्रास होतो, मग आम्ही पण माणसंच आहोत ना... अशी संतापजनक आणि उद्विग्न करणारी प्रतिक्रिया मध्यवर्ती जकात नाका परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

औरंगाबाद : मागील १२५ दिवसांपासून आम्ही कचऱ्याच्या दुर्गंधीने ग्रासलो आहोत. एकानंतर एक लहान मुलं आजारी पडू लागली आहेत. जेवायला बसले तर ताटात माशा घोंगावतात, दुर्गंधीने जेवणही जात नाही. इतर नागरिकांना कचऱ्याचा त्रास होतो, मग आम्ही पण माणसंच आहोत ना... अशी संतापजनक आणि उद्विग्न करणारी प्रतिक्रिया मध्यवर्ती जकात नाका परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

कचऱ्याच्या साचलेल्या डोंगरामुळे व त्यावर पडलेल्या पावसाने आता जगणे कठीण झाले आहे. मनपाने कचरा डेपो हटवावा किंवा आम्हाला दुसरीकडे घरकुल द्यावे, अशी मागणीही या परिसरातील नागरिक करू लागले आहेत. शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व कचरा कोंडीमुळे महानगरपालिकेने मध्यवर्ती जकात नाका परिसरात कचरा टाकणे सुरू केले. आता येथे बघता बघता कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. त्याची दुर्गंधी या परिसरात पसरली आहे. त्यातच या परिसरात सायंकाळी मच्छी बाजार भरतो.

दुर्गंधीमुळे शेजारील मनपाच्या घरकुलातील रहिवासी त्रस्त झाले आहेत.  येथील लहान मुले आजारी पडत आहेत. सर्वत्र माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांचा धंदाही निम्म्यावर येऊन ठेपला आहे. एवढेच नव्हे तर कचऱ्याची दुर्गंधी एवढी पसरली आहे की स्मशानभूमीत पार्थिव घेऊन आलेले लोक १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबत नाहीत. विशेष म्हणजे आजूबाजूला कचऱ्याच्या ढिगाने वेढले असतानाही जकात नाक्यामधील मनपाचे कर्मचारी नाईलाजाने दुर्गंधी सहन करीत आपले काम करीत आहेत. सोमवारी सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसाने या परिसरातील कुजलेल्या कचऱ्याची उग्र दुर्गंधी पसरली आहे.

आमच्या प्रतिनिधीने या परिसरातील रहिवासी व व्यावसायिकांशी संवाद साधला असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. शहराच्या मध्य वस्तीतील हा भाग असल्याने येथे जास्त काळ कचरा डेपो  ठेवल्यास साथीचे आजार परिसरात पसरू शकतात, अशी भीतीही काहींनी व्यक्त केली. 

स्मशानभूमीत दुर्गंधीकचऱ्यामुळे स्मशानभूमीत दुर्गंधी पसरली आहे. जिथे लोक पार्थिव आणल्यानंतर अर्ध्या तासात अग्नी संस्कार उरकतात तिथे आता १० मिनिटेही थांबत नाहीत. कधी पार्थिवाला अग्नी देतो आणि या दुर्गंधीतून निघून जातो, असेच लोक बोलून दाखवत आहेत. आम्हालाही स्मशानात राहणे कठीण झाले आहे. -सुनील गायकवाड, स्मशानजोगी

जगणे कठीण झालेमागील १०० दिवसांपासून आम्ही कचऱ्याची दुर्गंधी सहन करीत आहोत. मात्र, सोमवारी झालेल्या पावसाने मध्यवर्ती जकात नाका येथील कचरा सडला आहे. उग्र वासाने जगणे कठीण झाले आहे. - अविनाश पगारे, रहिवासी 

कचरा डेपो हटवाकचऱ्याच्या दुर्गंधीने जगणे कठीण झाले आहे. दुर्गंधीने डोके दुखते, अभ्यासही होत नाही. मनपाने दुसऱ्या भागातील नागरिकांचा विचार केला मग आमच्याही आरोग्याचा विचार करावा व कचरा डेपो येथून शहराबाहेर हलवावा.  -सना हसन मोहंमद

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद