शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आमचं ठरतंय ! महापालिका निवडणुकीत तिन्ही आले तर एकत्र, नाहीतर तिन्ही स्वतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 12:09 IST

Aurangabad Municipal Corporation Election : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या स्थानिक शाखा येथे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून एकत्र लढायचे की वेगवेगळे, याचा विचार होईल.

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांचे स्पष्टीकरणभाजपात ‘पाॅवर’ पेक्षा ‘फूल’ बनविण्याची क्षमता अधिक

औरंगाबाद : आगामी महापालिकेच्या निवडणुकांत ( Aurangabad Municipal Corporation Election ) महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आले तर एकत्र, नाहीतर स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जातील, असे स्पष्टीकरण पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) यांनी शुक्रवारी दिले.

‘लोकमत’ कार्यालयाला शुक्रवारी दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांवर थेट उत्तरे दिली. यावेळी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह संपादकीय सहकारी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या स्थानिक शाखा येथे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून एकत्र लढायचे की वेगवेगळे, याचा विचार होईल. त्यांना वेगळे लढायचे असेल तर आनंदच आहे. मात्र, एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी आघाडी करून तिकीट वाटप केले तर प्रत्येकाचा लढण्याचा स्कोप कमी होईल. या निवडणुकीत तळागाळातील असंख्य इच्छुक असतात. त्यांना सामावून घ्यावे लागते. एकत्र लढल्यास सर्वांना एकत्र कोंबण्याचा प्रयत्न होईल, त्यातून नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्थानिक परिस्थितीवर सर्व काही अवलंबून आहे.

स्थानिक पातळीवर शिवसेनेचा विस्तार मोठा आहे. अनेक वर्षांपासून शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे यंत्रणा सज्ज आहे. परंतु, महाविकास आघाडीसोबत विरोधाचा अट्टहास नाही. जर जुळले तर तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसावे. चर्चा करून अहवाल द्यावा, निर्णय वरिष्ठ घेतील. हा मत व्यक्त करण्याचा पहिला टप्पा आहे.

भाजपात ‘पाॅवर’ पेक्षा ‘फूल’ बनविण्याची क्षमता अधिकमहापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर भाजपसारखा ‘पाॅवरफुल्ल’ पक्ष आहे. त्याचे आव्हान कसे पेलणार, या प्रश्नावर देसाई म्हणले, त्यांच्या पाॅवरफुल्ल शब्दातील प्रत्यक्ष ‘पाॅवर’ किती आणि ‘फूल’ बनविण्याची क्षमता किती, हा चर्चेचा विषय आहे.

समृद्धी महामार्ग, डीएमआयसी आणि ड्रायपोर्टमुळे कनेक्टिव्हिटीदेसाई म्हणाले, समृद्धी महामार्ग, डीएमआयसी आणि ड्रायपोर्ट सुविधांमुळे मुंबई बंदराच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सुटला आहे. विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होत आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानंतर येथून आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाण करू शकतील. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी यावर पुढील आठवड्यात चर्चा करणार आहे.

पैठणला जाण्यास दीड तासऔरंगाबाद ते पैठण रस्ता खराब आहे. ती कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी एमआयडीसीला प्रयत्न करण्यास सांगितले आहे. बिडकीन इंडस्ट्रीयल पार्क त्याच रस्त्यावर आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनीही रस्त्याला प्राधान्याने करण्याची तयारी दर्शविली आहे. १५० कोटी पहिल्यांदाच शहर रस्ते विकासाला दिले. एमएसआरडीसी, एमआयडीसी, मनपाकडून ती कामे करण्यात आली आहेत, असेही उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.

जायकवाडी भरलेले असताना शहराला पाणी नाहीयावर पालकमंत्री देसाई म्हणाले, १६८० कोटींच्या योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. ५२ जलकुंभांचे काम सुरू आहे. या योजनेला अजून अडीच वर्षे लागतील. मग ताेपर्यंत पाण्यासाठी थांबायचे का? यावर उपाय म्हणून दोन महिन्यांत डिसेंबरमध्ये पाण्याच्या दिवसांचे अंतर कमी केले जाणार आहे. त्यासाठी जुन्या पाईपलाईनचे काही पाईप बदलून जास्त पाणी आणण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास दिले आहेत.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईRajendra Dardaराजेंद्र दर्डाAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका