शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

आमचं ठरतंय ! महापालिका निवडणुकीत तिन्ही आले तर एकत्र, नाहीतर तिन्ही स्वतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 12:09 IST

Aurangabad Municipal Corporation Election : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या स्थानिक शाखा येथे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून एकत्र लढायचे की वेगवेगळे, याचा विचार होईल.

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीवर पालकमंत्री सुभाष देसाई यांचे स्पष्टीकरणभाजपात ‘पाॅवर’ पेक्षा ‘फूल’ बनविण्याची क्षमता अधिक

औरंगाबाद : आगामी महापालिकेच्या निवडणुकांत ( Aurangabad Municipal Corporation Election ) महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आले तर एकत्र, नाहीतर स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जातील, असे स्पष्टीकरण पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) यांनी शुक्रवारी दिले.

‘लोकमत’ कार्यालयाला शुक्रवारी दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांवर थेट उत्तरे दिली. यावेळी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह संपादकीय सहकारी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या स्थानिक शाखा येथे आहेत. त्यांच्याशी चर्चा करून एकत्र लढायचे की वेगवेगळे, याचा विचार होईल. त्यांना वेगळे लढायचे असेल तर आनंदच आहे. मात्र, एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी आघाडी करून तिकीट वाटप केले तर प्रत्येकाचा लढण्याचा स्कोप कमी होईल. या निवडणुकीत तळागाळातील असंख्य इच्छुक असतात. त्यांना सामावून घ्यावे लागते. एकत्र लढल्यास सर्वांना एकत्र कोंबण्याचा प्रयत्न होईल, त्यातून नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्थानिक परिस्थितीवर सर्व काही अवलंबून आहे.

स्थानिक पातळीवर शिवसेनेचा विस्तार मोठा आहे. अनेक वर्षांपासून शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे यंत्रणा सज्ज आहे. परंतु, महाविकास आघाडीसोबत विरोधाचा अट्टहास नाही. जर जुळले तर तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसावे. चर्चा करून अहवाल द्यावा, निर्णय वरिष्ठ घेतील. हा मत व्यक्त करण्याचा पहिला टप्पा आहे.

भाजपात ‘पाॅवर’ पेक्षा ‘फूल’ बनविण्याची क्षमता अधिकमहापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर भाजपसारखा ‘पाॅवरफुल्ल’ पक्ष आहे. त्याचे आव्हान कसे पेलणार, या प्रश्नावर देसाई म्हणले, त्यांच्या पाॅवरफुल्ल शब्दातील प्रत्यक्ष ‘पाॅवर’ किती आणि ‘फूल’ बनविण्याची क्षमता किती, हा चर्चेचा विषय आहे.

समृद्धी महामार्ग, डीएमआयसी आणि ड्रायपोर्टमुळे कनेक्टिव्हिटीदेसाई म्हणाले, समृद्धी महामार्ग, डीएमआयसी आणि ड्रायपोर्ट सुविधांमुळे मुंबई बंदराच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सुटला आहे. विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होत आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानंतर येथून आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाण करू शकतील. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी यावर पुढील आठवड्यात चर्चा करणार आहे.

पैठणला जाण्यास दीड तासऔरंगाबाद ते पैठण रस्ता खराब आहे. ती कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी एमआयडीसीला प्रयत्न करण्यास सांगितले आहे. बिडकीन इंडस्ट्रीयल पार्क त्याच रस्त्यावर आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनीही रस्त्याला प्राधान्याने करण्याची तयारी दर्शविली आहे. १५० कोटी पहिल्यांदाच शहर रस्ते विकासाला दिले. एमएसआरडीसी, एमआयडीसी, मनपाकडून ती कामे करण्यात आली आहेत, असेही उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले.

जायकवाडी भरलेले असताना शहराला पाणी नाहीयावर पालकमंत्री देसाई म्हणाले, १६८० कोटींच्या योजनेचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. ५२ जलकुंभांचे काम सुरू आहे. या योजनेला अजून अडीच वर्षे लागतील. मग ताेपर्यंत पाण्यासाठी थांबायचे का? यावर उपाय म्हणून दोन महिन्यांत डिसेंबरमध्ये पाण्याच्या दिवसांचे अंतर कमी केले जाणार आहे. त्यासाठी जुन्या पाईपलाईनचे काही पाईप बदलून जास्त पाणी आणण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास दिले आहेत.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईRajendra Dardaराजेंद्र दर्डाAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका