शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

किनवटमध्ये पाणीसंकट

By admin | Updated: June 5, 2014 00:13 IST

गोकुळ भवरे, किनवट उन्हाळ्यात भासणार्‍या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ८७ लाख ९६ हजार रुपये किमतीचा आराखडा मंजूर झाला़

गोकुळ भवरे, किनवट उन्हाळ्यात भासणार्‍या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ८७ लाख ९६ हजार रुपये किमतीचा आराखडा मंजूर झाला़ मात्र यात नमूद कामांना अद्याप सुरुवात झाली नसल्याने हा आराखडा कागदावरच आहे़ मारेगाव (वरचे) येथे सहा दिवसांपूर्वी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला़ मात्र टँकरग्रस्त धानोरा (सी़), रामपूर-भामपूर व शिवशक्तीनगर (घोगरवाडी) या तीन गावांचा टँकरचा प्रस्ताव प्रस्तावित आहे़ आता पावसाळ्यात टँकर सुरू करणार का? असा प्रश्न टंचाईग्रस्त गावचे नागरिक विचारत आहेत़ किनवट या डोंगराळ तालुक्यात १९१ गावे १०५ वाडीतांडे आहेत़ २०१३ च्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात म्हणावी तशी पाणीटंचाई उद्भवली नाही़ तरीपण पावसाचे पडणारे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता येथील जमिनीत नसल्याने दरवर्षी काही गावांना पाणीटंचाईच्या झळा बसताताच़ २०१३ च्या पावसाळ्यात इस्लामपूर भागात केवळ ७५ टक्क्यांच्या आतच पर्जन्यमान झाल्याने एप्रिलनंतर या भागात पाणीटंचाईचे संकट ओढवेल, असा अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाचा होता़ आणि तो खराही ठरला़ कारण मार्लागुंडा, दीपलानातांडा, चंदूनाईक तांडा, मानसिंगनाईकतांडा, गोंडमहागाव, दुर्गानगर, शिवनगाव, रामन्नातांडा, व्यंकटापूर, मलकाजांबतांडा, आमरासिंग नाईकतांडा, दत्तनगर (मलकजांब), पांगरी, इरेगाव, सावरगावतांडा यासह तालुक्यातील वडोली, झेंडीगुडा, नागझरी, नागझरी कॅम्प, बेंदीतांडा, चिंचोलीतांडा, दाभाडी, नागरसवाडी, पेंदा, आंजी, लकडकोट, प्रधानसांगवी, घोटी, रायपूरतांडा, दुर्गापेठ, मोहाडा, लिमगुडा, पिंपळगाव फाटा, पिंपरगाव (की़) या गावांना टंचाईचे चटके बसू लागल्याने विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पं़ स़ च्या पाणीपुरवठा विभागाकडे आले़ विहीर अधिग्रहणाचे एकूण ४० प्रस्ताव आले़ हा आकडा ४७ वर जाण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला़ उल्लेखनीय म्हणजे, गतवर्षीचे पाणीटंचाई काळातील हातपंप दुरूस्तीचे १ लाख ५० हजार रुपये, बैलगाडीचे १ लाख रुपये, विहीर अधिग्रहणाचे २ लाख आणि टँकर चालकाचे ४० हजार रुपये असे ४ लाख ९० हजार रुपये बजेटच नसल्याने अडकूनच असल्याने विहीर अधिग्रहण करायला शेतकरी मागेपुढे पाहत आहेत़ नवीन विंधन विहिरी घेणे यासाठी ४२ प्रस्ताव प्राप्त झाले़ सर्वेक्षणही झाले़ ३२ प्रस्तावाचे आदेश प्राप्त होवून मंजुरी मिळाली़ पण कामांना काही सुरुवात नाही़ पावसाळ्याच्या तोंडी टंचाईची कामे करून निधीची वाट लावली जाते हे दरवर्षीचे चित्र आहे़ पैनगंगा नदीकाठावरील रामपूर-भामपूर, धानोरा (सि़) व अतिदुर्गम भागातील शिवश्क्तीनगर (घोरगवाडी) या टंचाईग्रस्त व टँकरग्रस्त गावांना टँकर केव्हा सुरू होणार, पावसाळा सुरू व्हायला सहाच दिवस शिल्लक असताना टँकर सुरू होण्याचे कोणतेही चिन्ह नसल्याने तशा गावात मात्र पाणीटंचाईची भीषण समस्या उद्भवू लागली आहे़ हदगाव तालुक्यातील चित्र यापेक्षा वेगळे नाही़ संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पंचायत समितीने जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी ८० लाख ६ हजार रुपये किमतीचा आराखडा जिल्हा प्रशसनाकडे पाठविला होता़ तेव्हा २३ लाख ९० हजार रुपये किमतीच्या आराखड्याला मंजुरी दिली़ एप्रिल ते जूनपर्यंत १ कोटी १९ लाख ११ हजार रुपये किमतीचा आराखडा पाठविला होता़ तेव्हा ६४ लाख ६ हजार रुपये मंजुरी मिळाली़ मंजुरी मिळूनही आराखड्यातील कामांना सुरुवातच नसल्याने आराखडा सध्यातरी कागदावरच आहे़