शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

उदासीन प्रशासनामुळे पाणचक्की जर्जर

By admin | Updated: July 12, 2017 00:48 IST

औरंगाबाद : जगभरातील पर्यटक आणि अभ्यासकांना मोहिनी घालणारी पाणचक्की आता उत्तरार्धात प्रवेशली असून, अवस्थेने जर्जर झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अचाट अभियांत्रिकीतून जलव्यवस्थापनाचा विस्मयकारक प्रयोग आणि वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पाणचक्की. राज्याच्या पर्यटन राजधानीतील पाणचक्की हे एक ऐतिहासिक; परंतु दुर्लक्षित संचितापैकी एक. तीनशे वर्षांपासून जगभरातील पर्यटक आणि अभ्यासकांना मोहिनी घालणारी पाणचक्की आता उत्तरार्धात प्रवेशली असून, अवस्थेने जर्जर झाली आहे. कधीकाळी सैनिक व अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या शीलेदारांना रसद पुरविणारी ही चक्की आता सांभाळकर्त्या वक्फ बोर्डाच्या उदासीनतेने आपल्याच भोवताली पसरलेली अस्वच्छता व दुर्गंधीने घुसमटते आहे. दूरवरून येणाऱ्या पर्यटकांना तर हे पाहून धक्काच बसतो. शेवाळलेल्या भिंती, दुर्गंधीयुक्त पाणी, कारंजे, प्लास्टरची पडझड झालेल्या भिंती. एकूणच परिसरात प्रवेश करताच दुर्गंधीने नाकाला रुमाल लावल्याशिवाय पर्याय राहत नाही. ‘पाणचक्कीबद्दल खूप ऐकले होते. पाणचक्कीचे तंत्रज्ञान आणि यंत्रणेविषयी ऐकूनच मनात उत्सुकता निर्माण झाली. आम्ही सर्व आठ जण मुंबईहून सहकुटुंब येथे फिरायला आलो. आम्ही मुद्दामहून पाणचक्कीला भेट दिली; मात्र येथे आल्यावर सगळा भ्रमनिरास झाला.’ हे शब्द आहेत मुंबईहून खास पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबाचे. पाणचक्कीच्या हौदातील पाण्यावरील कचरा आणि शेवाळ पाहून त्यांचा पुरता हिरमोड झाला होता.१७ व्या शतकाच्या शेवटी तयार करण्यात आलेली ही वास्तू एकेकाळी दख्खनचे सर्वात महत्त्वाचे ज्ञानकेंद्र होते. बाबा शहा मुसाफिर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या पाणचक्कीचे काम त्यांचे शिष्य बाबा शहा महेमूद यांनी पूर्ण केले. जटवाड्याच्या डोंगरावरून नहरींद्वारे येथे पाणी आणून जलप्रपातामधून निर्माण होणाऱ्या पाण्याच्या दाबाच्या साहाय्याने मोठे दगडी जाते फिरवून त्यामध्ये पीठ दळण्याची अद्भुत अभियांत्रिकी कल्पना येथे उपयोजिली गेली. त्यातून विद्यार्थी, प्रवासी आणि सैन्याची रसद भागविली जाई.शेवाळ आणि दुर्गंधीपाणचक्कीच्या भिंतीवरून खाली हौदात पडणारा धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण आहे. सुमारे १६२ फूट लांब, ३१ फूट रुंद आणि ४ फूट खोल असणाऱ्या या हौदाची सुमारे ४.८ लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. शेवाळ आणि कचऱ्यामुळे हौदातील पाणी काळवंडलेले दिसते. शेवाळलेल्या पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. हौदाच्या मधोमध असलेले कारंजे तर शेवाळाने पूर्णपणे झाकोळून गेले आहेत. पाण्यामध्ये झाडांचा पाला-पाचोळा, प्लास्टिकची वेष्टणे-कप, रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसतात. अशा दृश्याने आपले स्वागत होईल अशी पर्यटकांनी कल्पनाही केलेली नसते. संपूर्ण परिसरात स्वच्छतेचा मोठा प्रश्न आहे. कधीकाळी निर्मल नीर वाहणाऱ्या खाम नदीच्या तीरावर उभी असलेली ही वास्तू आता मात्र एका सांडपाण्याच्या नाल्याच्या शेजारी आहे. बाजूने वाहणाऱ्या नाल्यामुळे येथे कायमच दुर्गंधी असते.