शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘रमजान ईद’च्या दिनी मनपाचा पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: July 6, 2016 23:54 IST

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असून, वीजपुरवठा बंद झाल्याने बेलकुंड व माळकोंडजी येथून होणारे पाणी संकलन ठप्प झाले आहे.

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असून, वीजपुरवठा बंद झाल्याने बेलकुंड व माळकोंडजी येथून होणारे पाणी संकलन ठप्प झाले आहे. तसेच डोंगरगाव बॅरेजेसच्या रस्त्यावर चिखल झाल्यामुळे येथील पाणी संकलनही बंद करण्यात आले आहे. परिणामी, ‘रमजान ईद’च्या ऐन सणात लातूर शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. शहरातील सर्वच जलकुंभ कोरडेठाक पडले असून, आऊट पोस्ट लाईनवरील पाणीही बंद झाले आहे. मनपाचे प्रशासन आणि पदाधिकारी मात्र बेफिकीर आहेत.लातूर शहराला दररोज रेल्वेने २५ लाख लिटर आणि निम्न तेरणा प्रकल्पातून २० ते २५ तसेच डोंगरगाव बॅरेजेसमधून १५ ते २० लाख लिटर असे एकूण दररोज ६५ ते ७० लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, काल मंगळवारी वादळी वाऱ्यात झालेल्या पावसामुळे निम्न तेरणावरील मोटारीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी उपसा बंद आहे. डोंगरगाव उच्चस्तरीय बंधाऱ्याच्या रस्त्यावरही पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे तेथून होणारे १५ ते २० लाख लिटर पाण्याचे संकलन बंद आहे. केवळ मिरजहून येणारे २५ लाख लिटर एवढेच पाणी मनपाकडे आहे. बुधवारी सकाळी मिरजचे पाणी सरस्वती कॉलनी, विवेकानंद चौकातील जलकुंभात साठविले होते. परंतु, दुपारी १ वाजेपर्यंतच ते संपले. परिणामी, शहरातील सरस्वती कॉलनी, नांदेड नाका, गांधी चौक व अन्य सर्वच जलकुंभ कोरडेठाक पडले आहेत. स्टँड पोस्टवरील लाईनवर काही नागरिक पाणी भरत होते. मात्र ती लाईनही कोरडी असल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी, बुधवारी शहरातील कोणत्याच भागामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला नाही. ऐन ‘रमजान ईद’च्या सणादिवशी पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मनपा प्रशासनाने सणानिमित्त पाणी राखीव ठेवायला हवे होते. ज्या प्रभागात मुस्लिम समाजाचा मोहल्ला आहे अशा प्रभागात तरी पाणी वितरणाची सोय करायला हवी होती. परंतु, त्याचे काहीच नियोजन केले नसल्यामुळे ऐन सणात टंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)रमजान ईदचा सण लातूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू-मुस्लिम बांधव भाईचाराने हा सण साजरा करतात. किमान या सणाच्या दिवशी पाणीपुरवठा होणे आवश्यक होते. परंतु, मनपाच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा ताळमेळच नाही. पाणी वितरणात पदाधिकारी एक सांगतात, तर अधिकारी दुसरेच सांगत आहेत. नियोजनाचा अभाव असल्याने लातूरकरांना सणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मिरजहून दररोज जलपरीची २५ लाख लिटर पाण्याची एक खेप होत आहे. हा एकमेव पर्याय सोडला तर स्थानिक स्त्रोतांतील संकलन वारंवार विस्कळीत होत आहे. गेल्या दोन आठवड्यात दोनदा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला.दहा दिवसांपूर्वीच निम्न तेरणातील वीज मोटार जळाली होती. शिवाय, रेल्वेचे पाणी पाच दिवस बंद होते. त्यावेळीही शहराचा पाणीपुरवठा मनपा प्रशासनाने बंद केला होता. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करून मनपा प्रशासन मोकळे झाले होते. आता ऐन सणातही सहकार्याची भाषा करून प्रशासन मोकळे झाले आहे.