शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:23 IST

सध्या आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाळूज महानगर : एमआयडीसी प्रशासनाकडून अघोषित पाणी कपात करण्यात आल्यामुळे वाळूज गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. सध्या आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगामी दोन महिने भीषण टंचाईचे राहणार असल्याने प्रशासनाची परीक्षा ठरणार आहे.

वाळूज ग्रामपंचायतीला सहा महिन्यांपासून एमआयडीसीकडून पाणी पुरवठा सुरु केलेला आहेत. गावात एमआयडीसी प्रशासनाने पाणी पुरवठा सुरु केल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला होता. ग्रामपंचायतीला दररोज एमआयडीसीकडून जवळपास १४ लाख लिटर पाणी मिळत असल्यामुळे गावात नळयोजनेद्वारे ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा सुरु केला होता. मात्र, २७ मार्चपासून एमआयडीसी प्रशासनाने अचानक पाणी कपात केल्याने गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. आजघडीला गावात केवळ ६ लाख लिटरच्या आसपास पाणी मिळत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या तीन सार्वजनिक विहिरी व बोअरच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी नागरिकाकडून ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला जात असून पाणी प्रश्नाकडे पदाधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.

वाढीव पाणी पुरवठ्यासाठी पत्रव्यवहारगावातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन ग्रामपंचायती प्रशासनाने जिल्हाधिकारी व एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करुन पाणीकपात मागे घेण्याची मागणी केल्याचे सरपंच पपीन माने, उपसरपंच मनोज जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे यांनी सांगितले.

जारची मागणी वाढलीगावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यामुळे नागरिकांना जारचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे जारच्या शुद्ध पाण्याला मागणी वाढली आहे. नियोजनाअभावी गावातील नागरिकांना कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे.

टॅग्स :WaterपाणीWalujवाळूजwater scarcityपाणी टंचाई