शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाणीपुरवठा मंत्र्यांचा मुंबईत दोनशे कोटींचा बंगला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:54 IST

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिलमध्ये एका इंग्लंडस्थित भारतीयाचा दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी जालना येथे पत्रकार परिषदेत केला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या स्वीय सहायकाने मुंबईतील मलबार हिलमध्ये एका इंग्लंडस्थित भारतीयाचा दोनशे कोटींचा बंगला गैरमार्गाने खरेदी केल्याचा आरोप जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी जालना येथे पत्रकार परिषदेत केला. विकासाच्या नावाखाली विविध योजनांच्या माध्यमातून लोणीकरांनी कोट्यवधींची बेनामी संपत्ती गोळा केली असून, या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी जेथलिया यांनी केली.माजी आ. जेथलिया म्हणाले की, राजकीय विरोधकच राहू नये म्हणून वैयक्तिक द्वेषातून आपल्यासह कुटुंबातील सदस्यांवर राजकीय सूड उगवला जात आहे. पालकमंत्री लोणीकर यांनी केलेल्या अनेक तक्रारींची स्थानिक प्रशासनासह मंत्रालयीन स्तरावरही चौकशी करण्यात आली. त्यातून सर्व अहवाल आपल्या बाजूने आहेत. असे असताना विविध प्रकरणांत आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीच्या नावाखाली ही सरंजामशाही असून विरोधात आवाज उठविणा-यास संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून, यावर योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली आहे. गत तीन वर्षांत पालकमंत्री लोणीकर यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर गुत्तेदारी सुरु केली आहे. मंठा-परतूर मतदार संघात चार-चार हेडखाली एकच जलयुक्त शिवारचे काम करण्यात आले आहे. तेही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जी कामे केली जात आहेत, त्यामध्ये लोणीकर पिता-पुत्र कार्यकर्त्यांच्या नावावर लोणीकर यांनी जेसीबी व इतर यंत्रणा जुंपवली आहे. परतूर व मंठा तालुक्यात दर सहा महिन्यांमध्ये पोलीस अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिका-यांच्या बदल्या केल्या जात आहेत. याचा विकास कामांवर परिणाम होत असून, चांगल्या अधिका-यांना काम करू दिले जात नाही. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही जेथलिया यांनी केली. तसेच मलबारहिल बंगला परिसरात यशवंत कुलकर्णी व दिगंबर सस्ते यांच्या नावे मंत्री लोणीकर यांनी मालमत्ता खरेदी केली असून या मुखत्यारनाम्याची प्रत आपल्याकडे असल्याचा दावा जेथलिया यांनी केला.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची लेखी मागणी मूळ मालक फिरोज दुगन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे यांच्याकडे केली असल्याचे जेथलिया यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे मंठा तालुकाध्यक्ष नीळकंठ वायाळ, जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे आदी उपस्थित होते.जेथलियांचे आरोप राजकीय द्वेषातूनपरतूर मतदारसंघामध्ये आपल्या नेतृत्त्वात विविध विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी योजनांमधील १७६ गावांच्या २३४ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे काम ३५ % पूर्ण झाले आहे. मतदार संघातील दोन मोठे रस्ते राष्ट्रीय महामार्गात मंजूर करून प्रगतिपथावर आहेत. विकासकामांमुळे आगामी काळात जेथलियांसाठी त्यांचे राजकीय भवितव्य अंधारमय दिसत असून आपल्याला आलेल्या अपयशा पोटी खोटे आरोप करीत आहेत. मुंबई येथील जमनादास मेहता लॉन साईड ६, मार्ग क्र.(५) २४२, मलबार हिल डी वॉर्ड, मुंबई -४००००६, या मालमत्तेशी आमचा व आमच्या कार्यालयाचा काहीही संबंध नाही. हा जाणीवपूर्वक चिखलफेक करण्याचा प्रयत्न असून या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा आम्ही विचार करीत आहे. सुरेशकुमार जेथलिया यांनी मानसिक संतुलन ढळू न देता आरोप करावेत, असा खुलासा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे.